शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

‘’भाजपा ईव्हीएमचा गैरवापर करतो, बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास ‘औकात’ दिसेल’’

By बाळकृष्ण परब | Updated: November 14, 2020 22:23 IST

EVM News : बिहारमधील निवडणूक आणि इतर राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकदा आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमच्या माथ्यावर फोडले आहे. तसेच या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपावर गंभीर आरोप केला आहे.

नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत आणि मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश विधानसभेच्या काँग्रेसची कामगिरी निराशाजनक झाली होती. दरम्यान, या पराभवानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकदा आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमच्या माथ्यावर फोडले आहे. तसेच या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपावर गंभीर आरोप केला आहे.काँग्रेसचे नेते एस एस वर्मा म्हणाले की, मध्य प्रदेशमधील जनतेची देहबोली ही काँग्रेसच्या बाजूने होती. बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या सभेला प्रचंड गर्दी होती. त्या अर्थाने ही निवडणूक एकतर्फी होती. महाआघाडीचा बिहार आणि काँग्रेसचा मध्य प्रदेशमध्ये विजय निश्चित होता. मात्र भाजपाने ईव्हीएमचा गैरवापर केला, असा माझा संशय आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, विकसित देशांनी ईव्हीएमचा वापर थांबवला आहे. मात्र मग आम्ही का ईव्हीअम वापरतोय. याचा वापर थांबवता येणार नाही का? तसेच ज्या दिवशी देशातील निवडणुका बॅलेट पेपरच्या मदतीने घ्यायला सुरुवात होईल त्या दिवशी भाजपाला त्याची औकात समजेल, असे विधान एसएस वर्मा यांनी केले.

नुकत्याच आटोपलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ७४ जागा जिंकल्या होत्या. त्याच्याा जोरावर एनडीए १२५ जागा जिंकून निसटत्या बहुमताने सत्तेत आली. दुसरीकडे बिहारमध्ये ७० जागा लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ १९ जागाच जिंकता आल्या होत्या. मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसला भाजपाकडून पराभव पत्करावा लागला. २८ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला १९ तर काँग्रेसला ९ जागांवर समाधान मानावे लागले होते.

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाEVM Machineएव्हीएम मशीनElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग