शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

‘’भाजपा ईव्हीएमचा गैरवापर करतो, बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास ‘औकात’ दिसेल’’

By बाळकृष्ण परब | Updated: November 14, 2020 22:23 IST

EVM News : बिहारमधील निवडणूक आणि इतर राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकदा आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमच्या माथ्यावर फोडले आहे. तसेच या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपावर गंभीर आरोप केला आहे.

नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत आणि मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश विधानसभेच्या काँग्रेसची कामगिरी निराशाजनक झाली होती. दरम्यान, या पराभवानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकदा आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमच्या माथ्यावर फोडले आहे. तसेच या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपावर गंभीर आरोप केला आहे.काँग्रेसचे नेते एस एस वर्मा म्हणाले की, मध्य प्रदेशमधील जनतेची देहबोली ही काँग्रेसच्या बाजूने होती. बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या सभेला प्रचंड गर्दी होती. त्या अर्थाने ही निवडणूक एकतर्फी होती. महाआघाडीचा बिहार आणि काँग्रेसचा मध्य प्रदेशमध्ये विजय निश्चित होता. मात्र भाजपाने ईव्हीएमचा गैरवापर केला, असा माझा संशय आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, विकसित देशांनी ईव्हीएमचा वापर थांबवला आहे. मात्र मग आम्ही का ईव्हीअम वापरतोय. याचा वापर थांबवता येणार नाही का? तसेच ज्या दिवशी देशातील निवडणुका बॅलेट पेपरच्या मदतीने घ्यायला सुरुवात होईल त्या दिवशी भाजपाला त्याची औकात समजेल, असे विधान एसएस वर्मा यांनी केले.

नुकत्याच आटोपलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ७४ जागा जिंकल्या होत्या. त्याच्याा जोरावर एनडीए १२५ जागा जिंकून निसटत्या बहुमताने सत्तेत आली. दुसरीकडे बिहारमध्ये ७० जागा लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ १९ जागाच जिंकता आल्या होत्या. मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसला भाजपाकडून पराभव पत्करावा लागला. २८ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला १९ तर काँग्रेसला ९ जागांवर समाधान मानावे लागले होते.

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाEVM Machineएव्हीएम मशीनElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग