शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपाचं ‘मिशन मुंबई’; आज रणनीती ठरणार

By प्रविण मरगळे | Updated: November 18, 2020 10:50 IST

BJP, Shiv Sena & BMC Election News: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपानं मिशन मुंबई हाती घेतलं आहे.

ठळक मुद्देमुंबईत आज भाजपाच्या कार्यकारणीची बैठकबैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणारमुंबईत अनेक वर्षापासून महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे त्यामुळे ही सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. बिहार निकालाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले, भाजपाच्या यशामागे देवेंद्र फडणवीस यांची उत्तम रणनीती असल्याचं कौतुक भाजपा नेते करत आहेत, तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाचं कौतुक महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. बिहारच्या निकालानंतर आता राज्यातील भाजपा नेत्यांनी आगामी महापालिका निवडणुकांकडे लक्ष केंद्रीत केलं आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपानं मिशन मुंबई हाती घेतलं आहे. मुंबईत आज भाजपाच्या कार्यकारणीची बैठक आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. मुंबईत अनेक वर्षापासून महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे त्यामुळे ही सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे.

मुंबईतील भाजपाची संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुंबईतील भाजपा नगरसेवक, पदाधिकारी, आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शिवसेनेला कोडींत पकडण्यासाठी भाजपा रणनीती आखणार आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची वर्षानुवर्ष सत्ता आहे. अनेक वर्ष पालिकेत शिवसेना-भाजपा युतीची सत्ता होती, मात्र गेल्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली, या निवडणुकीत शिवसेना-भाजपात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. शिवसेनेचे ९२ तर भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले होते, मात्र राज्यातील सत्तेत एकत्र असल्याने भाजपाने मुंबईत महापौर बसवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यावेळी भाजपा पहारेदाराची भूमिका निभावेल असं सांगण्यात आलं.

मुंबई महापालिकेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे. भाजपाने शिवसेनेला ना विरोध ना पाठिंबा अशाप्रकारे भूमिका घेतली होती. त्यामुळे ८२ नगरसेवकांचे संख्याबळ असतानाही विरोधी पक्षनेतेपदावरही भाजपाने दावा केला नाही. परंतु आता चित्र बदललं आहे. राज्यात मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपात बिनसलं, विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपाने एकत्र लढवली, त्यात भाजपाला १०५ आणि शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. मात्र निकालानंतर शिवसेनेने भाजपाची साथ सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आणि इतक्या जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. त्यामुळे शिवसेनेचा हा वार भाजपाच्या जिव्हारी लागला. त्यामुळे आता भाजपाने मुंबई महापालिकेवर झेंडा रोवण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी आव्हानात्मक असणार आहे.

मुंबई महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी अन् मनसेची भूमिका निर्णायक

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. मात्र मुंबई महापालिकेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे. मुंबईत राष्ट्रवादीची इतकी ताकद नसल्याने शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात परंतु काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. मागील निवडणुकांमध्ये भाजपाने स्वबळावर ८२ नगरसेवक निवडून आणले होते, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्र निवडणूक लढवली तर भाजपासमोर मोठं आव्हान असणार आहे. पण त्याचदरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. मनसेने २०१२ च्या निवडणुकीत २७ नगरसेवक निवडून आणले होते, परंतु मागच्या निवडणुकीत अवघे ७ नगरसेवक मनसेचे निवडून आले, या ७ पैकी ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसे यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर लढणार की भाजपासोबत आघाडी होणार हे पाहणंही गरजेचे आहे.  

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक