शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

...तेव्हा आम्ही राज्यात सरकार देऊ; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'वेळ'

By कुणाल गवाणकर | Updated: November 11, 2020 18:50 IST

बिहारमधील विजयात पंतप्रधान मोदींचा मोलाचा वाटा; फडणवीस यांच्याकडून पंतप्रधानांचं कौतुक

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं आहे. अतिशय चुरशीच्या लढतीनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (एनडीए) बिहारमध्ये सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलापेक्षा (जेडीयू) अधिक जागा जिंकत भाजप बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे. या निवडणुकीत भाजपनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर प्रभारीपदाची जबाबदारी दिली होती. त्यात फडणवीस यशस्वी ठरले. या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर भाष्य केलं.राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे दावे भाजप नेत्यांकडून अनेकदा केले जातात. बिहारमधील विजयानंतर आता महाराष्ट्रातही भाजपचं सरकार येईल, असं ट्विट कालच भाजप आमदार नितेश राणेंनी केलं. मात्र फडणवीस यांनी राज्यातल्या सत्तापरिवर्तनाबद्दल वेगळी भूमिका मांडली. 'आम्ही राज्यातल्या सत्तांतराकडे लक्ष ठेवून काम करत नाही. राज्यातलं सरकार एके दिवशी स्वत:च्याच ओझ्यामुळे कोलमडून पडेल.कारण अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ज्या दिवशी हे सरकार कोसळेल, त्या दिवशी आम्ही पर्यायी सरकार देऊ,' असं फडणवीस म्हणाले.बिहारमधील राजकीय परिस्थितीवरही फडणवीस यांनी भाष्य केलं. प्रत्येक निवडणूक वेगळी असते आणि प्रत्येक निवडणूक तुम्हाला काहीतरी शिकवून जात असते. बिहारमधील मतदार अतिशय प्रगल्भ आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला. कोरोना संकट काळात काही सरकारं केवळ टीका करत होती. त्यावेळी मोदींनी विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला, असं फडणवीस यांनी सांगितलं.बिहारमध्ये भाजपला मित्रपक्ष असलेल्या जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळाल्या असल्यानं मुख्यमंत्रिपद भाजपला मिळावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांनीच याबद्दल विधानं केली आहेत. त्यावर फडणवीस यांनी आम्ही दिलेला शब्द पाळतो, असं म्हणत शिवसेनेला टोला लगावला. नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, हे पंतप्रधान मोदींपासून अनेक नेत्यांनी सांगितलं आहे. तसा शब्दच आम्ही त्यांना दिलेला आहे. तो शब्द आम्ही पाळणारच, असं फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी