शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

“एका 'युवराजला' वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय?”; भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला

By प्रविण मरगळे | Updated: November 6, 2020 08:37 IST

Arnab Goswami Arrested, BJP Ashish Shelar, Shiv Sena News: त्याचसोबत खरी नौटंकी तर हीच आहे. एका "युवराजला" वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? पत्रपंडित हो,अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत? असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देसोनियाजी गांधी, राहुलजी गांधी आणि महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या सुडबुध्दीचा, असहिष्णुतेचा पर्दाफाश न्यायालयाने केलाआता न्यायालयालच महाराष्ट्र द्रोही आहे म्हणून फटाके फोडणार का? आता अग्रलेख न्यायालयावर..?इतिहासातील शब्दांवर उगाच सगळा भार! उडवा उडवा, शब्दांचे फुलबाजे उडवा! रोज उघडे पडा!

मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक करून अलिबाग न्यायालयात हजर केले, त्यावेळी कोर्टाने पुराव्याअभावी पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत अर्णब गोस्वामींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या निर्णयावरुन भाजपाने शिवसेनेला टोला लगावला आहे. रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा अशा शब्दात भाजपा नेते आशिष शेलार यांनी समाचार घेतला आहे

याबाबत आशिष शेलार म्हणाले की, अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करुन तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करुन "दिशा सालीयन" बाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय? बात और भी निकलेगी...त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांना खोटे ठरवून आता एका "सिंह" यांना "परमवीर" का देताय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्याचसोबत खरी नौटंकी तर हीच आहे. एका "युवराजला" वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? पत्रपंडित हो,अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत? न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेला निवाड्यातील काही मुद्दे असे की, १) २०१८ सालच्या घटनेबाबत कोणताही ठोस पुरावा आलेला नाही त्यामुळे "अ" समरी अहवाल (क्लोजर रिपोर्ट) स्विकारला गेला. २) पोलीस कोठडीचे सर्थन करणारे कोणतेही योग्य, संयुक्तिक व कायदेशीर कारण आढळत नाही. ३) पोलिसांना मोघमपणे तपास करता येणार नाही असं म्हटलं आहे. सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी आणि महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या सुडबुध्दीचा, असहिष्णुतेचा पर्दाफाश न्यायालयाने असा केला असा घणाघात आशिष शेलारांनी केला.

दरम्यान, आता न्यायालयालच महाराष्ट्र द्रोही आहे म्हणून फटाके फोडणार का? आता अग्रलेख न्यायालयावर..? खंजीर, तलवार, इतिहासातील शब्दांवर उगाच सगळा भार! उडवा उडवा, शब्दांचे फुलबाजे उडवा! रोज उघडे पडा!! असा चिमटाही शेलारांनी शिवसेनेला आणि खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.

अर्णबला सामान्य कैद्याप्रमाणेच वागणूक  

आलिशान स्टुडिओमध्ये बसून ‘पुछता है भारत’ असा सवाल उपस्थित करणाऱ्या अर्णब गोस्वामी यांना सध्या न्यायालयीन कोठडीची हवा खावी लागत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर येथील नगर परिषदेच्या मराठी शाळेमध्ये उपकारागृह निर्माण केले आहे. त्यातील एका खोलीमध्ये गोस्वामी यांना राहावे लागत आहे. नियमानुसार आरोपींना जी वागणूक दिली जाते तीच वागणूक गोस्वामी यांना मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.  कारागृहाच्या नियमांनुसारच गोस्वामी यांना वागणूक दिली जात आहे. कोविडच्या नियमांमुळे नातेवाइकांच्या मुलाखतीही बंद केल्या आहेत. त्यामुळे गोस्वामी यांना नातेवाइकांना भेटता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. याच कारागृहामध्ये अन्य गुन्ह्यांतील ४२ आरोपींना ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गोस्वामी यांच्याजवळ मोबाइलही देण्यात आलेला नाही. त्यामुळे नेहमीच जगाच्या संपर्कात असलेल्या गोस्वामी यांचा संपर्क तुटल्याचे बोलले जाते. त्यांना बाहेरूनदेखील जेवण देण्याला कोविडचा नियम आडवा आला. जेवणामध्ये डाळ, भात, भाजी, चपाती असे साधेच जेवण असते, त्याचप्रमाणे नियमानुसार जे पाणी अन्य आरोपींना पिण्यासाठी दिले जाते तेच पाणी गोस्वामी यांना दिले जात आहे. एक कॉट, ट्युबलाईट आणि डोक्यावर गरगरणारा पंखा अशा सुविधा असल्याचेही सूत्रांनी सांगितले. गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीची आजची दुसरी रात्र आहे.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीShiv SenaशिवसेनाCourtन्यायालयSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलार