शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

“...नाहीतर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही”; अजित पवारांच्या ‘त्या’ निर्णयावर गोपीचंद पडळकरांचा इशारा

By प्रविण मरगळे | Updated: March 5, 2021 15:23 IST

Maharashtra Budget Session, BJP MLC Gopichand Padalkar Target DCM Ajit Pawar: १६ तारखेला बैठक होते आणि १८ तारखेला निर्णय होतो, एका बैठकीत काय केले हे अजित पवारांनी सांगावं असंही आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागलं आहेएसी, एसटी, ओबीसी समाजाचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम सरकारकडून केलं जातंयएकाच बैठकीनंतर थेट निर्णय घेतल्याने त्याचा फटका दीड लाख कर्मचाऱ्यांना बसला आहे

मुंबई – मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षणावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर(BJP MLC Gopichand Padalkar) यांनी ठाकरे सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला मागासवर्गीयांवर अन्याय करायचा आहे, मंत्रिगटाची एक बैठक होते आणि दुसऱ्याच दिवशी निर्णय घेतला जातो, हे सगळं ठरवून केलं जातंय, अजित पवारांनी(DCM Ajit Pawar) या बैठकीत काय केले ते राज्याला सांगाव असं पडळकरांनी म्हटलं आहे.(BJP MLC Gopichand Padalkar Warning to Thackeray Government over Reservation in Government Promotion)

याबाबत गोपीचंद पडळकर म्हणाले की, मागासवर्गीय पदोन्नतीबाबत सरकारचं धोरण चुकीचं आहे, १८ फेब्रुवारीला शासनाने आदेश काढला, आरक्षणाचा कोणताही विचार न करता १०० टक्के जागा भरल्या जातील असं सांगितले, मग आरक्षित ३३ टक्के जागांवर घाला घालण्याचं काम या सरकारकडून केलं जातंय, मंत्रिगट समितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत, त्यांनी ओबीसींसाठी काय केले हे सांगावं, एकाच बैठकीनंतर थेट निर्णय घेतल्याने त्याचा फटका दीड लाख कर्मचाऱ्यांना बसला आहे असा आरोप त्यांनी केला, टीव्ही ९ शी ते बोलत होते.

इतकंच नाही तर महाविकास आघाडी सरकार  मागासवर्गीय लोकांनी अन्याय करतंय, महापुरूषांच्या नावानं राजकारण करायचं आणि वंचित घटकांना लाभापासून दूर ठेवायचं हे सरकारचं धोरण आहे. संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार मागासवर्गीयांना पदोन्नती दिली जात नाही, १६ तारखेला बैठक होते आणि १८ तारखेला निर्णय होतो, एका बैठकीत काय केले हे अजित पवारांनी सांगावं असंही आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागलं आहे, राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा फटका मागासवर्गीयांना बसला आहे, एसी, एसटी, ओबीसी समाजाचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम सरकारकडून केलं जातंय, त्यामुळे हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा अन्यथा या सरकारमधील एकाही मंत्र्याला गावात फिरू देणार नाही असा गंभीर इशाराही आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना दिला आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरOBCअन्य मागासवर्गीय जाती