शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Narayan Rane: राणेंच्या यात्रेआड भाजपची निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 08:52 IST

Narayan Rane Jan Ashirwad yatra: स्मृतिस्थळावरील संघर्ष टाळत शिवसेनेने पहिल्या फेरीत राणे यांची एकप्रकारे कोंडी केली होती. मात्र, तथाकथित शुद्धीकरणाचा घाट घालून शिवसेनेने राणे यांना संधी दिली. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद बोलावून राणे यांनी याचा पुरेपूर उपयोग केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दोन दिवसांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण निर्मिती करायला सुरूवात केली आहे. राणे यांच्या यात्रेच्या निमित्ताने पक्षसंघटनेला कामाला लावतानाच शिवसेनेला घेरण्याचा पद्धतशीर प्रयत्न यानिमित्ताने झाला आहे. मराठी पट्ट्यावर या यात्रेचा भर होता. तसेच, सत्ताधारी पक्षातील नाराज मंडळींना भाजपमध्ये मानाचे स्थान आहे, हा संदेश योग्य ठिकाणी पोहचविण्याची तजवीज या निमित्ताने करण्यात आली.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विशेषतः अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरण, दिशा सॅलियान मृत्यू, अभिनेत्री कंगना रनौत विरुद्ध राज्य सरकार अशा मुद्द्यांवर राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. या प्रकरणांमुळे पहिल्या टप्प्यात राज्य सरकारला अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र, याचा एक उलटा परिणामही मुंबईत झाला. भाजप मराठी विरोधी असल्याचे चित्र उभे करण्यात सत्ताधारी शिवसेनेला यश मिळाले होते. ही प्रतिमा बदलण्यात भाजप अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत होते. राणे यांच्या एकाच यात्रेने भाजपची ही समस्या सोडवली. यात्रेच्या मार्गाचीही तशीच आखणी करण्यात आली होती. विमानतळावर शिवरायांना अभिवादन करून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी आणि बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला दिलेली भेट चर्चेत होती. शिवाय, नायगाव येथील सभेत राणे यांनी मुंबईच्या बकालीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. मराठी माणसाला काय मिळाले, शिवसैनिकांना अजूनही खस्ता खाव्या लागत आहेत, मातोश्रीचे एकाचे दोन बंगले झाले, ही राणे यांची विधाने भाजपचा रोख स्पष्ट करणारी ठरली.

स्मृतिस्थळावरील संघर्ष टाळत शिवसेनेने पहिल्या फेरीत राणे यांची एकप्रकारे कोंडी केली होती. मात्र, तथाकथित शुद्धीकरणाचा घाट घालून शिवसेनेने राणे यांना संधी दिली. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद बोलावून राणे यांनी याचा पुरेपूर उपयोग केला. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची दुरवस्था झाल्याचा ठपका ठेवत आधी त्याला जागतिक दर्जाचे बनवा, असा टोला लगावला. 

सारे काही मुंबई महापालिकेसाठीnपालिका निवडणुकांसाठी आपण स्वतः मुंबईभर फिरणार, भाजपच जिंकणार असेही राणे बोलून गेले. मुंबईतील विविध भागात राणे यांचा स्वतःचा समर्थक वर्ग आहे. nमतांच्या टक्केवारी किंवा आकडेवारीच्या दृष्टीने ते अल्प असले तरी वातावरण निर्मितीत राणे यांची उपयुक्तता यानिमित्ताने समोर आली आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv Senaशिवसेना