शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

"बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार, निम्याहून अधिक आमदार पक्ष सोडणार", काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 11:23 IST

bihar politics : काँग्रेसच्या हायकंमाडने भरत सिंह यांचा दावा फेटाळून लावला आहे.

ठळक मुद्दे काँग्रेस विधीमंडळाचे नेते अजित शर्मा सुद्धा अशा लोकांमध्ये सामील आहेत, जे पक्षात फूट पाडू पाहत आहेत, असे काँग्रेस नेते भरत सिंह यांनी म्हटले आहे.

पटना : बिहारच्याराजकारणात नवा भूकंप आला आहे. जवळपास ११ काँग्रेसचे आमदार पक्ष सोडणार असल्याचा दावा, येथील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार भरत सिंह यांनी केला आहे. पक्षामध्ये लवकरच मोठी फूट पडणार असून ११ आमदार पक्ष सोडणार आहे, असे भरत सिंह यांनी म्हटले आहे. मात्र, काँग्रेसच्या हायकंमाडने भरत सिंह यांचा दावा फेटाळून लावला आहे.

१९ आमदारांपैकी ११ आमदार असे आहेत की, जे काँग्रेस पक्षाचे नाहीत. मात्र, निवडणुका जिंकल्या आहेत. या लोकांनी पैसे देऊन तिकीट खरेदी केले आणि आता आमदार बनले आहेत. संख्याबळाने स्वत:ला मजबूत करण्यासाठी एनडीएमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे. काँग्रेस विधीमंडळाचे नेते अजित शर्मा सुद्धा अशा लोकांमध्ये सामील आहेत, जे पक्षात फूट पाडू पाहत आहेत, असे काँग्रेस नेते भरत सिंह यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, जे ११ काँग्रेस आमदार पक्ष सोडणार आहेत. त्यांचे मार्गदर्शक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा, राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह आणि वरिष्ठ काँग्रेस नेते सदानंद सिंह हे आहेत.  राज्यपाल नियुक्त आमदारांचे नामाकंन अद्याप बाकी आहे. त्यामुळे सदानंद सिंह आणि मदन मोहन झा हे राज्यपाल कोठ्यातून आमदार होण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप भरत सिंह यांनी केला. तसेच, सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या आरजेडीसोबत असलेल्या महाआघाडीला विरोध केला आहे. अनेक वर्षांपासून मी आरजेडीसोबतच्या महाआघाडीचा विरोध केला आहे, असे भरत सिंह म्हणाले. 

दरम्यान, याआधी बिहारच्या प्रभारी पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती बिहारमधील काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल यांनी काँग्रेसच्या हायकमांडकडे केली होती. यानंतर काँग्रेस हायकमांडने शक्ती सिंग गोहिल यांना बिहारच्या प्रभारी पदाच्या जबाबदारीतून मुक्त केले होते.पक्षाने जारी केलेल्या पत्रानुसार, भक्तम चरण दास यांना शक्ती सिंह गोहिल जागी बिहारचे काँग्रेस प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणBiharबिहार