शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

“पूर येणे हा दैवी प्रकोप, पीडितांना भेटायला जाणार नाही”; केंद्रीय मंत्र्यांचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 16:03 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही बिहारमध्ये पूरस्थिती बिकट आणि भयावह बनली आहे.

पाटणा: दरवर्षीप्रमाणे यंदाही बिहारमध्ये पूरस्थिती बिकट आणि भयावह बनली आहे. अनेकांना याचा फटका बसलाय. मात्र, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी झालेले केंद्रीय खाद्य आणि प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांनी अजब तर्कट केले असून, पूर येणे हा देवाचा कोप आहे, असे सांगत पूरग्रस्त भागातील पीडितांना भेटायला जाण्यास त्यांनी चक्क नकार दिला. (bihar pashupati paras says he will not meet people suffering from floods)

अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले...

केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर पशुपती कुमार पारस प्रथमच बिहारमध्ये गेले होते. आपला संसदीय मतदारसंघ हाजीपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना पारस म्हणाले की, पूर येणे हा देवाचा प्रकोप आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये पूर येतात. एवढेच नव्हे, तर प्रत्येक वर्षी बिहारमध्ये पूर येतो. पूरग्रस्तांना भेटायला गेले पाहिजे, असे मला वाटत नाही, असे पारस यांनी म्हटले आहे. 

नेपाळशी चर्चा करणे महत्त्वाचे

बिहारमध्ये येणाऱ्या पूराचे मुख्य कारण नेपाळ आहे. बिहारमधील पूरस्थिती नियंत्रणात आणायची असेल, तर नेपाळशी चर्चा करायला हवी. तसेच प्रत्येक वर्षी पूराचा सामना बिहारला करावा लागत असल्याने पीडितांना हरसंभव मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे पारस यांनी स्पष्ट केले. 

“१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय?”; भाजपची विचारणा

दरम्यान, पुतण्या चिराग पासवान याच्याशी मोठे राजकीय मतभेद झाल्यानंतर बिहामधील राजकीय वातावरण तापले होते. यानंतर लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पारस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. चिराग पासवान हे राम विलास पासवान यांच्या संपत्तीचे वारस असू शकतात. मात्र, त्याचा उत्तराधिकारी मीच आहे, असे पारस यांनी म्हटले होते. या घडामोडींनंतर पारस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देत भाजपने घटक पक्षाला खुष ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :BiharबिहारCentral Governmentकेंद्र सरकार