शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

“पूर येणे हा दैवी प्रकोप, पीडितांना भेटायला जाणार नाही”; केंद्रीय मंत्र्यांचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 16:03 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही बिहारमध्ये पूरस्थिती बिकट आणि भयावह बनली आहे.

पाटणा: दरवर्षीप्रमाणे यंदाही बिहारमध्ये पूरस्थिती बिकट आणि भयावह बनली आहे. अनेकांना याचा फटका बसलाय. मात्र, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी झालेले केंद्रीय खाद्य आणि प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांनी अजब तर्कट केले असून, पूर येणे हा देवाचा कोप आहे, असे सांगत पूरग्रस्त भागातील पीडितांना भेटायला जाण्यास त्यांनी चक्क नकार दिला. (bihar pashupati paras says he will not meet people suffering from floods)

अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले...

केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर पशुपती कुमार पारस प्रथमच बिहारमध्ये गेले होते. आपला संसदीय मतदारसंघ हाजीपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना पारस म्हणाले की, पूर येणे हा देवाचा प्रकोप आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये पूर येतात. एवढेच नव्हे, तर प्रत्येक वर्षी बिहारमध्ये पूर येतो. पूरग्रस्तांना भेटायला गेले पाहिजे, असे मला वाटत नाही, असे पारस यांनी म्हटले आहे. 

नेपाळशी चर्चा करणे महत्त्वाचे

बिहारमध्ये येणाऱ्या पूराचे मुख्य कारण नेपाळ आहे. बिहारमधील पूरस्थिती नियंत्रणात आणायची असेल, तर नेपाळशी चर्चा करायला हवी. तसेच प्रत्येक वर्षी पूराचा सामना बिहारला करावा लागत असल्याने पीडितांना हरसंभव मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे पारस यांनी स्पष्ट केले. 

“१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय?”; भाजपची विचारणा

दरम्यान, पुतण्या चिराग पासवान याच्याशी मोठे राजकीय मतभेद झाल्यानंतर बिहामधील राजकीय वातावरण तापले होते. यानंतर लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पारस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. चिराग पासवान हे राम विलास पासवान यांच्या संपत्तीचे वारस असू शकतात. मात्र, त्याचा उत्तराधिकारी मीच आहे, असे पारस यांनी म्हटले होते. या घडामोडींनंतर पारस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देत भाजपने घटक पक्षाला खुष ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :BiharबिहारCentral Governmentकेंद्र सरकार