शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, अकाली दलानंतर भाजपाला आणखी एक धक्का; केंद्रीय मंत्र्यांच्या पार्टीने सोडली साथ

By प्रविण मरगळे | Updated: October 4, 2020 19:42 IST

Bihar Assembly Election 2020 News: आज संध्याकाळी लोक जनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देलोक जनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णयबिहार विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्टीने सोडली साथजेडीयू नितीश कुमार यांच्या वैचारिक मतभेद असल्याचा हवाला देत स्वबळावर निवडणूक लढण्याचं केलं जाहीर

पटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना, शिरोमणी अकाली दलापाठोपाठ आता लोक जनशक्ती पार्टीनेही एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच बिहारमध्ये भाजपाला धक्का बसला आहे. नितीश कुमार यांचे नेतृत्व मान्य नसल्याने लोक जनशक्ती पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत लोक जनशक्ती पार्टीने निवेदन जारी करत म्हटलंय की, राष्ट्रीय स्तरावरील लोकसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टी भाजपासोबत कायम असेल. पण राज्यस्तरावर विधानसभा निवडणुकीत जनता दला यूनायटेडसोबत वैचारिक मतभेद असल्याने पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल. त्यामुळे नितीश कुमार आणि भाजपाला धक्का बसू शकतो असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

खरं तर, या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्ष आरजेडी आपल्या पारंपारिक व्होटबँक मुस्लिम आणि यादव तसेच दलित मतदारांना एकत्र करण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. पूर्वी जेडीयूचे दलित नेते श्याम रजकही आरजेडीमध्ये दाखल झाले. अशा परिस्थितीत आणखी एक दलित व्होटबँक असलेला पक्ष एनडीएतून बाहेर पडण्याचा फटका त्यांना सहन करावा लागू शकतो. इतकेच नव्हे तर बरेच लहान पक्षही युतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे मतदारांचा मूड कोणत्या दिशेने आहे हे येणार काळच ठरवेल.

आज संध्याकाळी लोक जनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाने जाहीर केले आहे की, ते स्वबळावर बिहार विधानसभा निवडणूक लढवतील. नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक न लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. राष्ट्रीय पातळीवर आणि लोकसभा निवडणुकांमध्ये एलजेपीची भाजपाशी युती मजबूत असल्याचंही लोक जनशक्ती पार्टीने स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीत जनता दल (युनायटेड) यांच्या युतीमध्ये वैचारिक मतभेदांमुळे बिहारमध्ये एलजेपीने युतीपासून स्वतंत्रपणे लढण्याचं ठरवलं आहे.

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी २८ ऑक्टोबर (७१ जागा), ३ नोव्हेंबर (९४ जागा) आणि ७ नोव्हेंबर (७८ जागा) अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होईल. पहिल्या टप्प्यातील अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020BJPभाजपा