शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

शिवसेना, अकाली दलानंतर भाजपाला आणखी एक धक्का; केंद्रीय मंत्र्यांच्या पार्टीने सोडली साथ

By प्रविण मरगळे | Updated: October 4, 2020 19:42 IST

Bihar Assembly Election 2020 News: आज संध्याकाळी लोक जनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देलोक जनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णयबिहार विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्टीने सोडली साथजेडीयू नितीश कुमार यांच्या वैचारिक मतभेद असल्याचा हवाला देत स्वबळावर निवडणूक लढण्याचं केलं जाहीर

पटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना, शिरोमणी अकाली दलापाठोपाठ आता लोक जनशक्ती पार्टीनेही एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच बिहारमध्ये भाजपाला धक्का बसला आहे. नितीश कुमार यांचे नेतृत्व मान्य नसल्याने लोक जनशक्ती पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत लोक जनशक्ती पार्टीने निवेदन जारी करत म्हटलंय की, राष्ट्रीय स्तरावरील लोकसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टी भाजपासोबत कायम असेल. पण राज्यस्तरावर विधानसभा निवडणुकीत जनता दला यूनायटेडसोबत वैचारिक मतभेद असल्याने पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल. त्यामुळे नितीश कुमार आणि भाजपाला धक्का बसू शकतो असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

खरं तर, या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्ष आरजेडी आपल्या पारंपारिक व्होटबँक मुस्लिम आणि यादव तसेच दलित मतदारांना एकत्र करण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. पूर्वी जेडीयूचे दलित नेते श्याम रजकही आरजेडीमध्ये दाखल झाले. अशा परिस्थितीत आणखी एक दलित व्होटबँक असलेला पक्ष एनडीएतून बाहेर पडण्याचा फटका त्यांना सहन करावा लागू शकतो. इतकेच नव्हे तर बरेच लहान पक्षही युतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे मतदारांचा मूड कोणत्या दिशेने आहे हे येणार काळच ठरवेल.

आज संध्याकाळी लोक जनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाने जाहीर केले आहे की, ते स्वबळावर बिहार विधानसभा निवडणूक लढवतील. नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक न लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. राष्ट्रीय पातळीवर आणि लोकसभा निवडणुकांमध्ये एलजेपीची भाजपाशी युती मजबूत असल्याचंही लोक जनशक्ती पार्टीने स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीत जनता दल (युनायटेड) यांच्या युतीमध्ये वैचारिक मतभेदांमुळे बिहारमध्ये एलजेपीने युतीपासून स्वतंत्रपणे लढण्याचं ठरवलं आहे.

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी २८ ऑक्टोबर (७१ जागा), ३ नोव्हेंबर (९४ जागा) आणि ७ नोव्हेंबर (७८ जागा) अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होईल. पहिल्या टप्प्यातील अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020BJPभाजपा