शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
4
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
5
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
6
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
7
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
8
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
9
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
10
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
11
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
12
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
14
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
15
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
16
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
17
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
18
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
19
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
20
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत

शिवसेना, अकाली दलानंतर भाजपाला आणखी एक धक्का; केंद्रीय मंत्र्यांच्या पार्टीने सोडली साथ

By प्रविण मरगळे | Updated: October 4, 2020 19:42 IST

Bihar Assembly Election 2020 News: आज संध्याकाळी लोक जनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देलोक जनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णयबिहार विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्टीने सोडली साथजेडीयू नितीश कुमार यांच्या वैचारिक मतभेद असल्याचा हवाला देत स्वबळावर निवडणूक लढण्याचं केलं जाहीर

पटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना, शिरोमणी अकाली दलापाठोपाठ आता लोक जनशक्ती पार्टीनेही एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच बिहारमध्ये भाजपाला धक्का बसला आहे. नितीश कुमार यांचे नेतृत्व मान्य नसल्याने लोक जनशक्ती पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत लोक जनशक्ती पार्टीने निवेदन जारी करत म्हटलंय की, राष्ट्रीय स्तरावरील लोकसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टी भाजपासोबत कायम असेल. पण राज्यस्तरावर विधानसभा निवडणुकीत जनता दला यूनायटेडसोबत वैचारिक मतभेद असल्याने पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल. त्यामुळे नितीश कुमार आणि भाजपाला धक्का बसू शकतो असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

खरं तर, या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्ष आरजेडी आपल्या पारंपारिक व्होटबँक मुस्लिम आणि यादव तसेच दलित मतदारांना एकत्र करण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. पूर्वी जेडीयूचे दलित नेते श्याम रजकही आरजेडीमध्ये दाखल झाले. अशा परिस्थितीत आणखी एक दलित व्होटबँक असलेला पक्ष एनडीएतून बाहेर पडण्याचा फटका त्यांना सहन करावा लागू शकतो. इतकेच नव्हे तर बरेच लहान पक्षही युतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे मतदारांचा मूड कोणत्या दिशेने आहे हे येणार काळच ठरवेल.

आज संध्याकाळी लोक जनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाने जाहीर केले आहे की, ते स्वबळावर बिहार विधानसभा निवडणूक लढवतील. नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक न लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. राष्ट्रीय पातळीवर आणि लोकसभा निवडणुकांमध्ये एलजेपीची भाजपाशी युती मजबूत असल्याचंही लोक जनशक्ती पार्टीने स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीत जनता दल (युनायटेड) यांच्या युतीमध्ये वैचारिक मतभेदांमुळे बिहारमध्ये एलजेपीने युतीपासून स्वतंत्रपणे लढण्याचं ठरवलं आहे.

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी २८ ऑक्टोबर (७१ जागा), ३ नोव्हेंबर (९४ जागा) आणि ७ नोव्हेंबर (७८ जागा) अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होईल. पहिल्या टप्प्यातील अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020BJPभाजपा