शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Bihar Election 2020: ‘जीडीएसएफ’च्या माध्यमातून ‘वंचित’चा प्रयोग; बिहारमध्ये दलित व मुस्लिम मतांचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 01:45 IST

पाच पक्षांनी एकत्र येत बनवला फ्रंट, नव्याने आकारास आलेल्या ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंटची जनता दल (स) आणि राष्ट्रीय जनता दल यांना जास्त काळजी लागली आहे.

असीफ कुरणे 

कोल्हापूर : बिहारच्या राजकारणात दलित, महादलित व मुस्लिम मतांना फार महत्त्व असून, या मतांच्या बळावरच एमआयएम, बसपा आणि आरएलएसपीसारख्या पक्षांनी एकत्र येत नवी आघाडी उघडली आहे. या पक्षांनी निवडणुकीसाठी ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंट (जीडीएसएफ) नावाची आघाडी स्थापन करीत मैदानात आव्हान उभे केले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या वंचित बहुजन आघाडीसारखा हा प्रयोग ठरू शकतो. या फ्रंटने सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटात चिंता वाढवली असून, याचा नेमका फटका कोणाला बसणार, हे निकालानंतरच कळेल.

बिहारमधील दलित आणि मुस्लिम मते एकगठ्ठा खेचण्यासाठी मायावती (बहुजन समाज पार्टी) खासदार असदोद्दीन ओवेसी (एमआयएम), उपेंद्रसिंह कुशवाह (राष्ट्रीय लोक समता पार्टी) यांनी जनतांत्रिक पार्टी, समाजवादी जनता दलसह ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंट तयार केला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात असदोद्दीन ओवेसी आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग करीत अनेकांची गणिते बिघडवली होती. जवळपास १३ लोकसभा जागांवर वंचितच्या उमेदवारांनी दखलपात्र मते घेतली होती. अशाच पद्धतीने बिहारमध्ये दलित, मुस्लिम मते एकत्र करीत त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न सुरू आहे. बिहारमध्ये जवळपास १६ टक्के दलित मते, तर १७ टक्के मुस्लिम मते आहेत, तर १४ टक्के यादव मते आहेत. याच दलित, मुस्लिम मतांवर जीडीएसएफचा डोळा आहे. २०१५ च्या निवडणुकीतदेखील एमआयएमने मुस्लिम मतांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यांना बिहारी मतदारांनी नाकारले होते. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमधील एमआयएमच्या उमेदवारांनी लक्षणीय मते घेतली होती. बसपाचा बिहारमध्ये फारसा मतदार नाही; पण उत्तर प्रदेशाला लागून असलेल्या मतदारासंघामधील दलित मतदारांवर मायावतींचा प्रभाव दिसतो.सत्ताधारी, विरोधकांना धाकधूकनव्याने आकारास आलेल्या ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंटची जनता दल (स) आणि राष्ट्रीय जनता दल यांना जास्त काळजी लागली आहे. कारण दलित समाजातील अनेक जाती या नितीश कुमार यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे मागील निकालातून दिसले आहे, तर राष्ट्रीय जनता दलाला मुस्लिम मतदार पसंती दर्शवतात. जीडीएसएफच्या उमेदवारांना दलित, मुस्लिम मतदाराने साथ दिली, तर सत्ताधारी व विरोधकांना थेट फटका बसण्याचा धोका आहे. त्यामुळेच जीडीएसएफचे उमेदवार किती आणि कोणाची मते खातात, यावर सत्तेचा तराजू कोणाकडे झुकणार हे दिसेल.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकmayawatiमायावतीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन