शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Bihar Assembly Election Results: बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार?; नितीश कुमारांचं सूचक उत्तर

By कुणाल गवाणकर | Updated: November 12, 2020 20:33 IST

Bihar Assembly Election Results: नितीश कुमारांचं मुख्यमंत्रिपदाबद्दल सूचक वक्तव्य

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीत बिहारच्या जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) कौल दिला. एनडीएची सत्ता आल्यास नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, असं भाजपकडून निवडणूक प्रचारादरम्यान वारंवार स्पष्ट करण्यात आलं. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील नितीशच मुख्यमंत्री असतील, हे स्पष्ट केलं. मात्र दस्तुरखुद्द नितीश कुमार यांनी दिलेल्या उत्तरामुळे संभ्रम वाढला आहे.विधानसभा निवडणूक निकालानंतर आज पहिल्यांदाच नितीश कुमार संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) कार्यालयात पोहोचले. त्यावेळी त्यांनी पक्षाचे आमदार आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी कधी होणार याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. एनडीएच्या बैठकीत तारीख ठरेल, असं नितीश यांनी सांगितलं.पुढील मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर 'मी दावा सांगितलेला नाही. याबद्दलचा निर्णय एनडीए घेईल,' असं सूचक उत्तर त्यांनी दिलं. एनडीएच्या निर्णयानुसार पुढील गोष्टी ठरतील, असंही ते म्हणाले. राज्यात एनडीएची सत्ता आल्यानंतर नितीश कुमारच नेतृत्त्व करतील, असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. मात्र काही भाजप नेत्यांनी मुख्यमंत्रिपद भाजपला मिळावं, अशी आग्रही मागणी केली आहे.मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारच राहणार असल्याचा शब्द भाजपकडून जेडीयूला निवडणुकीपूर्वी देण्यात आला. मात्र निवडणुकीनंतर परिस्थिती प्रचंड बदलली आहे. निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या जेडीयूची मोठी घसरण झाली आहे. २०१५ मध्ये जेडीयूचे ७१ आमदार निवडून आले होते. आता त्यांचे ४३ आमदार निवडून आले आहेत. तर २०१५ मध्ये ५३ जागा जिंकणाऱ्या भाजपनं यंदा ७४ जागा जिंकत मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजप पहिल्यांदाच बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपा