शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

Bihar Assembly Election Results: बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार?; नितीश कुमारांचं सूचक उत्तर

By कुणाल गवाणकर | Updated: November 12, 2020 20:33 IST

Bihar Assembly Election Results: नितीश कुमारांचं मुख्यमंत्रिपदाबद्दल सूचक वक्तव्य

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीत बिहारच्या जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) कौल दिला. एनडीएची सत्ता आल्यास नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, असं भाजपकडून निवडणूक प्रचारादरम्यान वारंवार स्पष्ट करण्यात आलं. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील नितीशच मुख्यमंत्री असतील, हे स्पष्ट केलं. मात्र दस्तुरखुद्द नितीश कुमार यांनी दिलेल्या उत्तरामुळे संभ्रम वाढला आहे.विधानसभा निवडणूक निकालानंतर आज पहिल्यांदाच नितीश कुमार संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) कार्यालयात पोहोचले. त्यावेळी त्यांनी पक्षाचे आमदार आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी कधी होणार याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. एनडीएच्या बैठकीत तारीख ठरेल, असं नितीश यांनी सांगितलं.पुढील मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर 'मी दावा सांगितलेला नाही. याबद्दलचा निर्णय एनडीए घेईल,' असं सूचक उत्तर त्यांनी दिलं. एनडीएच्या निर्णयानुसार पुढील गोष्टी ठरतील, असंही ते म्हणाले. राज्यात एनडीएची सत्ता आल्यानंतर नितीश कुमारच नेतृत्त्व करतील, असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. मात्र काही भाजप नेत्यांनी मुख्यमंत्रिपद भाजपला मिळावं, अशी आग्रही मागणी केली आहे.मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारच राहणार असल्याचा शब्द भाजपकडून जेडीयूला निवडणुकीपूर्वी देण्यात आला. मात्र निवडणुकीनंतर परिस्थिती प्रचंड बदलली आहे. निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या जेडीयूची मोठी घसरण झाली आहे. २०१५ मध्ये जेडीयूचे ७१ आमदार निवडून आले होते. आता त्यांचे ४३ आमदार निवडून आले आहेत. तर २०१५ मध्ये ५३ जागा जिंकणाऱ्या भाजपनं यंदा ७४ जागा जिंकत मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजप पहिल्यांदाच बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपा