शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Assembly Election Results: बिहारमधील भाजपचं यश म्हणजे फडणवीसांचा विजय? शरद पवारांचा मिश्किल टोला; म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Updated: November 10, 2020 18:36 IST

Bihar Assembly Election Results: बिहारच्या निवडणूक निकालावर बोलताना शरद पवारांचा चिमटा

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाला बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचं महागठबंधन सत्ताधारी एनडीएला कडवी टक्कर देत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला मागे पडलेल्या भाजपनं नंतर जोरदार मुसंडी मारली. गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला भाजप यंदा थेट पहिल्या क्रमांकासाठी राजदशी स्पर्धा करताना दिसत आहे. याचं श्रेय भाजप नेते प्रसाद लाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक टोला लगावला आहे.'देवेंद्र फडणवीसांनी नक्कीच इथं बसून बिहारची सुत्रं हलवली असतील'बिहारमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारली आहे. गेल्या निवडणुकीत ५३ जागा जिंकणारा भाजप सध्या ७२ जागांवर पुढे आहे. विशेष म्हणजे भाजपनं घेतलेल्या भरारीमुळे जेडीयू मागे गेला आहे. त्यामुळे भाजप आघाडीमधील मोठा भाऊ ठरला आहे. बिहारमधील निवडणुकीचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे भाजपचं यश म्हणजे फडणवीसांचा विजय असल्याचं भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले.बिहारमध्ये अपेक्षित निकाल लागला नाही, शरद पवारांनी सांगितलं कारणराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बिहारमधील भाजपच्या कामगिरीतील फडणवीस यांच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 'हा चमत्कार आमच्या डोक्यात प्रकाश पाडणारा होता; फार चांगली माहिती सांगितली तुम्ही,' अशी खोचक प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. यावेळी त्यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं. तेजस्वी यांनी अतिशय चांगली लढत दिली. त्यांनी भाजप, जदयू विरोधात चांगली कामगिरी केली, अशी स्तुतीसुमनं पवार यांनी उधळली. बिहारमध्येही ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ होऊ शकतं; शिवसेना मंत्र्याचा मोठा दावाकाय म्हणाले होते प्रसाद लाड?बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएचा धुव्वा उडाल्याचं चित्र एक्झिट पोलमध्ये दाखवलं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात वातावरण असल्याचं दाखवलं. मात्र, बिहारमधील जनतेने भाजपवर, पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला” अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी एका मराठी वृत्त वहिनीला दिलेली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी उचलली. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचंही हे यश आणि विजय आहे. या निवडणुकीत एनडीए १३० च्या वर जाईल आणि महागठबंधन १०० च्या खाली येईल, असा विश्वासही यावेळी प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा