शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

Bihar Assembly Election 2020 :बेरोजगारीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 05:05 IST

Bihar Assembly Election 2020 News : बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांनी प्रचारमोहिमेच्या दुसऱ्या फेरीत पश्चिम चंपारण जिल्ह्यातील वाल्मीकीनगर येथे बुधवारी जाहीर सभा घेतली.

वाल्मीकीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांतील समस्यांबद्दल बोलताना दिसतात; पण भारतामधील बेरोजगारी व अन्य समस्यांबद्दल ते आपल्या भाषणांतून अवाक्षरही काढत नाहीत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांनी प्रचारमोहिमेच्या दुसऱ्या फेरीत पश्चिम चंपारण जिल्ह्यातील वाल्मीकीनगर येथे बुधवारी जाहीर सभा घेतली. ते म्हणाले की, दसऱ्याच्या दिवशी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. ते पाहून मनाला वेदना झाल्या. मोदींविषयी युवक व शेतकऱ्यांच्या मनात किती संताप आहे याचेच दर्शन प्रतिमा दहनाच्या निमित्ताने घडले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासमवेत घेतलेल्या प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमध्ये इतर देशांतील समस्यांचा उल्लेख करतात; पण भारतातील समस्यांबद्दल ते काहीच बोलत नाहीत. ही गोष्ट बिहार, पंजाब, उत्तर प्रदेशमधील युवक, शेतकऱ्यांना खटकते आहे. राहुल गांधी म्हणाले की, आपण दोन कोटी नोकऱ्या देणार, असे आता मोदी भाषणांतून सांगत नाहीत. समजा तसे त्यांनी आता सांगितले तर सभेला आलेले श्रोतेच त्यांना रोखतील. तुम्ही नोकऱ्या देण्याबाबत खोटे बोलला आहात, असे लोकच मोदींना सांगतील. देशाचा कारभार कसा करायचा याची काँग्रेसला उत्तम जाण आहे. शेतकरी, युवकांना कशी साथ द्यायची हे आमच्या पक्षाला माहीत आहे. मात्र, खोटे बोलण्याची सवय काँग्रेसला नाही. (वृत्तसंस्था)  

हा तर पायलट प्रोजेक्टराहुल गांधी म्हणाले की, २००६ साली बिहारमध्ये बाजार समित्या रद्द करण्यात आल्या. एक प्रकारे हा निर्णय तीन नवे कृषी कायदे संमत करण्याआधीचा पायलट प्रोजेक्ट असावा. जे नितीशकुमारांनी बिहारमध्ये २००६ साली केले तेच नरेंद्र मोदी आता पंजाबमध्ये करू पाहत आहेत.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी