शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

बिहारमध्ये NDA २२० जागा जिंकणार, भाजपाच्या मोठ्या नेत्याचे भाकित

By बाळकृष्ण परब | Published: September 29, 2020 5:58 PM

पाटणा - एकीकडे कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असतानाच निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे बिहारमधील आणि ...

ठळक मुद्दे बिहारच्या जनतेचा नितीश कुमार आणि एनडीएवर विश्वास आम्ही गेल्या १५ वर्षांत जे काम केले आहे. त्या आधारावर मत मागत आहोतएनडीएमध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नाही. बीजेपी, जेडीयू , एलजेपी आणि मांझी यांचा पक्ष एकत्र आहेत

पाटणा - एकीकडे कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असतानाच निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे बिहारमधील आणि देशातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सभा, प्रचार यावर अनेक निर्बंध घातले असले तरी सर्वपक्षीय नेत्यांकडून मोर्चेबांधणी आणि दावे-प्रतिदावे जोरात सुरू आहेत. दरम्यान, बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए २२० जागा जिंकून दणदणीत विजय मिळवेल, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी केला आहे. एनडीए बिहारमधील निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे आणि या निवडणुकीत एनडीएला २२० जागा मिळतील, असे शाहनवाझ हुसेन यांनी म्हटले आहे.शाहनवाझ हुसेन म्हणाले की, बिहार विधानसभेसाठी आता निवडणुकीची घोषणा झालेली आहे. बिहारच्या जनतेचा नितीश कुमार आणि एनडीएवर विश्वास आहे. कोरोनाकाळात राज्य आणि केंद्र सरकारने जे काम केले आहे ते लोकांना दिसत आहे. यावेळी हुसेन यांनी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलावरही जोरदार टीका केली. जे लोक रजिस्ट्रीशिवाय तिकीट देत नव्हते ते आज दहा लाख रोजगार देण्याच्या बाता मारत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.शाहनवाझ हुसेन यांनी सांगितले की आम्ही गेल्या १५ वर्षांत जे काम केले आहे. त्या आधारावर मत मागत आहोत. आम्ही पटणामध्ये एम्स बांधले. चार लाख शिक्षकांची नियुक्ती केली. नर्सिंग कॉलेज सुरू केले. आम्ही वाकासाच्या मुद्द्यावरूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आमची आघाडी चांगली आहे. एनडीएमध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नाही. बीजेपी, जेडीयू , एलजेपी आणि मांझी यांचा पक्ष एकत्र आहेत. आमच्यात लवकरच जागावाटप होणार आहे.मात्र एकीकडे शाहनवाझ हुसेन हे एनडीएमध्ये सारे काही आलबेल असल्याचे सांगत असले तरी दुसरीकडे एलजेपीचे राष्ट्रीय सरचिटणीस शाहनवाझ अहमद यांनी काही वेळापूर्वीच पक्षाकडून चिराग पासवास हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील असा दावा केला आहे. तसेच एलजेपीने एनडीएसमोर ४२ जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र भाजपा-जेडीयूने त्यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020BJPभाजपाBiharबिहारPoliticsराजकारण