शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

१४ जानेवारीनंतर आरजेडीमध्ये पडणार मोठी फूट, भाजपाच्या बड्या नेत्याचे भाकीत

By बाळकृष्ण परब | Updated: January 11, 2021 20:48 IST

Bihar Politics News : आरजेडीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी जेडीयूमध्ये फूट पडण्याचा दावा केला असतानाच आता भाजपाकडूनही त्याला प्रत्युत्तर देताना राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा दावा केला आहे.

ठळक मुद्देबिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधात असलेल्या महाआघाडीच्या जागांमध्ये फारसा फरक नाहीत्यामुळे दोन्हीकडून एकमेकांच्या गोटातील आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेतयेत्या १४ जानेवारीरपर्यंत हा पक्ष फुटणार असल्याचा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांनी केला

पाटणा - अटीतटीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत काठावर जय-पराजयाचा निकाल लागल्यानंतर आता राज्यात राजकीय अस्थिरता आणि फोडाफोडीचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, आरजेडीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी जेडीयूमध्ये फूट पडण्याचा दावा केला असतानाच आता भाजपाकडूनही त्याला प्रत्युत्तर देताना राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा दावा केला आहे. आरजेडीमध्ये मोठी फूट पडणार असून, येत्या १४ जानेवारीरपर्यंत हा पक्ष फुटणार असल्याचा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांनी केला आहे.बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधात असलेल्या महाआघाडीच्या जागांमध्ये फारसा फरक नाही आहे. त्यामुळे दोन्हीकडून एकमेकांच्या गोटातील आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सामंजस्याचा अभाव दिसत आहे. तर दुसरीकडे एनडीएमधील सदस्य एका सुरात महाआघाडीवर हल्लाबोल करत आहेत.दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री आणि बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी मोठे आणि सूचक विधान केले आहे. आरजेडीचे आमदार सातत्याने दुसऱ्या पक्षांत दाखल होत आहेत. आरजेडीच्या नेतृत्वामध्ये जर ताकद असेल तर त्यांनी या आमदारांना रोखून दाखवावे. दरम्यान, १४ जानेवारीनंतर आरजेडीमध्ये फूट पडणार आहे आणि अनेक आमदार हे एनडीएमध्ये दाखल होतील.दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री आणि बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या विधानाला जेडीयूचे ज्येष्ठ नेते ललन सिंह यांनीही पाठिंबा दिला आहे. भूपेंद्र यादव यांना ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आरजेडीचे विलीनीकरण कुठल्याही पक्षात होईल, असे ललन सिंह यांनी म्हटले आहे. निवडणुकीपूर्वीही ललन सिंह यांनी असे विधान केले होते. जेडीयूने दारे उघडली तर आरजेडीचं अस्तित्व संपुष्टात येईल, असा दावा ललन सिंह यांनी त्यावेळी केला होता.आता आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी भूपेंद्र यादव यांच्या विधानावर टीका केली आहे. आरजेडीच्या आमदारांना फोडण्याएवढी पात्रता भाजपामध्ये नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमदारांना फोडून दाखवावं, असे आव्हानही दिले आहे. एनडीएमध्ये सुरू असलेल्या वादावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांकडून असा दावा करण्यात येत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. त्यानंतर भाजपानेही शिवानंद तिवारी यांना प्रत्युत्तर दिले आहे. आज नाही तर उद्या आरजेडीमध्ये फूट पडणार आणि हा पक्ष संपुष्टात येणार हे निश्चित आहे, असे भाजपा प्रवक्ते निखिल आनंद यांनी म्हटले आहे.

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल