शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

१४ जानेवारीनंतर आरजेडीमध्ये पडणार मोठी फूट, भाजपाच्या बड्या नेत्याचे भाकीत

By बाळकृष्ण परब | Updated: January 11, 2021 20:48 IST

Bihar Politics News : आरजेडीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी जेडीयूमध्ये फूट पडण्याचा दावा केला असतानाच आता भाजपाकडूनही त्याला प्रत्युत्तर देताना राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा दावा केला आहे.

ठळक मुद्देबिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधात असलेल्या महाआघाडीच्या जागांमध्ये फारसा फरक नाहीत्यामुळे दोन्हीकडून एकमेकांच्या गोटातील आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेतयेत्या १४ जानेवारीरपर्यंत हा पक्ष फुटणार असल्याचा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांनी केला

पाटणा - अटीतटीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत काठावर जय-पराजयाचा निकाल लागल्यानंतर आता राज्यात राजकीय अस्थिरता आणि फोडाफोडीचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, आरजेडीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी जेडीयूमध्ये फूट पडण्याचा दावा केला असतानाच आता भाजपाकडूनही त्याला प्रत्युत्तर देताना राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा दावा केला आहे. आरजेडीमध्ये मोठी फूट पडणार असून, येत्या १४ जानेवारीरपर्यंत हा पक्ष फुटणार असल्याचा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांनी केला आहे.बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधात असलेल्या महाआघाडीच्या जागांमध्ये फारसा फरक नाही आहे. त्यामुळे दोन्हीकडून एकमेकांच्या गोटातील आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सामंजस्याचा अभाव दिसत आहे. तर दुसरीकडे एनडीएमधील सदस्य एका सुरात महाआघाडीवर हल्लाबोल करत आहेत.दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री आणि बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी मोठे आणि सूचक विधान केले आहे. आरजेडीचे आमदार सातत्याने दुसऱ्या पक्षांत दाखल होत आहेत. आरजेडीच्या नेतृत्वामध्ये जर ताकद असेल तर त्यांनी या आमदारांना रोखून दाखवावे. दरम्यान, १४ जानेवारीनंतर आरजेडीमध्ये फूट पडणार आहे आणि अनेक आमदार हे एनडीएमध्ये दाखल होतील.दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री आणि बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या विधानाला जेडीयूचे ज्येष्ठ नेते ललन सिंह यांनीही पाठिंबा दिला आहे. भूपेंद्र यादव यांना ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आरजेडीचे विलीनीकरण कुठल्याही पक्षात होईल, असे ललन सिंह यांनी म्हटले आहे. निवडणुकीपूर्वीही ललन सिंह यांनी असे विधान केले होते. जेडीयूने दारे उघडली तर आरजेडीचं अस्तित्व संपुष्टात येईल, असा दावा ललन सिंह यांनी त्यावेळी केला होता.आता आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी भूपेंद्र यादव यांच्या विधानावर टीका केली आहे. आरजेडीच्या आमदारांना फोडण्याएवढी पात्रता भाजपामध्ये नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमदारांना फोडून दाखवावं, असे आव्हानही दिले आहे. एनडीएमध्ये सुरू असलेल्या वादावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांकडून असा दावा करण्यात येत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. त्यानंतर भाजपानेही शिवानंद तिवारी यांना प्रत्युत्तर दिले आहे. आज नाही तर उद्या आरजेडीमध्ये फूट पडणार आणि हा पक्ष संपुष्टात येणार हे निश्चित आहे, असे भाजपा प्रवक्ते निखिल आनंद यांनी म्हटले आहे.

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल