शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 12:42 IST

AAP Congress Alliance breaks in Delhi:हरयाणा, जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी काँग्रेसला झटका दिला आहे. हरयाणात काँग्रेसची गणितं फसली, तर जम्मू काश्मीरमध्येही फारसे चांगले यश मिळवता आले नाही. त्यामुळे आपने दिल्लीत काँग्रेसचे हात सोडण्याबद्दल विधान केले आहे. 

AAP-Congress Delhi Elections: लोकसभा निवडणुकीनंतर उभारी घेण्याचे प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला हरयाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीने जोरदार धक्का दिला. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी एकसंघ राहिल्याने त्याचे परिणाम निकालात दिसले. पण, हरयाणात स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत काँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला. याच मुद्द्यावर बोट ठेवत आम आदमी पक्षाने आता दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे. 

आप सोडणार काँग्रेसचा हाथ 

हरयाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रभावी कामगिरी करू न शकल्याने आपने आता दिल्लीतही एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रियंका कक्कर यांनी याबद्दल मोठं विधान केलं आहे.

आप नेत्या प्रियंका कक्कर म्हणाल्या, "आम्ही दिल्ली (विधानसभा) निवडणूक स्वबळावर लढू. एकीकडे अतिआत्मविश्वास असणारी काँग्रेस आहे, तर दुसरीकडे गर्विष्ठ भाजपा आहे. आम्ही गेल्या १० वर्षात दिल्लीत जे केले आहे, त्या आधारावरच आम्ही निवडणूक लढणार आहोत", असे सांगत कक्कर यांनी दिल्लीत काँग्रेस-आप आघाडी होणार की नाही? हा प्रश्न तूर्तास तरी निकाली काढला आहे. 

काँग्रेसची कामगिरी सुधारली, पण सत्तेपासून दूरच

सलग तिसऱ्यांदा भाजपाने काँग्रेसला हरयाणात धूळ चारली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ३० जागा जिंकल्या होत्या. त्या तुलनेत त्यांची कामगिरी सुधारली आहे. पण, खऱ्या अर्थाने भाजपाने प्रभावित केले आहे. कारण सलग दहा वर्ष सत्तेत राहूनही भाजपाने केवळ सत्ताच राखली नाही, तर गेल्या वेळच्या तुलनेत जास्त जागा निवडून आणल्या आहेत. 

काँग्रेसवर आपची टीका

आपचे खासदार संजय सिंह यांनी काँग्रेसच्या एकट्याने निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. "आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसने प्रतिसादच दिला नाही. त्यांना सत्तेत कुणीही नको होतं म्हणून स्वतंत्र लढले", असे म्हणत संजय सिंह यांनी काँग्रेसला सुनावले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसAAPआपdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालPoliticsराजकारण