शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बंगालच्या ममतादीदींची एकहाती संघर्ष यात्रा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 05:02 IST

आज विधानसभेत प्रचंड बहुमताने ममता यांचा पक्ष सत्तेवर आहे. लोकसभेत बंगालमधील ४२ पैकी ३६ जागा त्यांनी जिंकून संसदेतील चौथा मोठा पक्ष हे स्थान पटकाविले आहे.

- वसंत भोसलेआज विधानसभेत प्रचंड बहुमताने ममता यांचा पक्ष सत्तेवर आहे. लोकसभेत बंगालमधील ४२ पैकी ३६ जागा त्यांनी जिंकून संसदेतील चौथा मोठा पक्ष हे स्थान पटकाविले आहे. तृणमूल कॉँग्रेस प्रादेक्षिक पक्ष होता. पण आसाम, मणिपूर, त्रिपुरा, केरळ, आदी राज्यांतील मतांच्या जोरावर हा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यताप्राप्तही झाला आहे.‘मा, माटी, मानुश’ या घोषवाक्यासह बंगाली माणसांची अस्मिता २०११ जागृत करून, अखिल भारतीय तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भारतीय राजकारणात इतिहास रचला. लोकशाही मार्गाने सलग ३४ चौतीस वर्षे सत्तेवर राहण्याचा जागतिक विक्रम करणाऱ्या कम्युनिस्टांचा पराभव त्यांनी केला. त्यांचा हा संघर्ष साधा नव्हता. बंगालमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीला पराभूत करण्याचे कॉँग्रेससह सर्व पक्षांचे प्रयत्न संपले होते. सलग सहा निवडणुका जिंकणाºया डाव्या आघाडीचा पश्चिम बंगालमध्ये पराभव होण्यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. २९ वर्षांच्या तरुण ममता बॅनर्जी यांनी १९८४ मध्ये कॉँग्रेसतर्फे लोकसभेची पहिल्यांदा जादवपूर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बॅ. सोमनाथ चॅटर्जी यांचा पराभव केला होता. मात्र १९८९ मध्ये त्या पराभूत झाल्या. त्यामुळे १९९१ मध्ये त्यांनी दक्षिण कोलकत्तामधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि विजयही मिळवला. तेव्हापासून सलग सहावेळा त्या विजयी झाल्या. मात्र, राज्यात व विधानसभा निवडणुकीत माकपशी कॉँग्रेस संघर्ष करीत नव्हता. पर्याय देण्याचा प्रयत्न करीत नव्हता. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा १९९८ मध्ये स्वपक्षाशीच संघर्ष सुरू झाला. अखेरीस त्यांनी कॉँग्रेसचा त्याग केला आणि १ जानेवारी १९९८ रोजी तृणमूल कॉँग्रेसची स्थापना केली. देशात १९९८ ते २००९ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या सात निवडणुका झाल्या. डाव्या आघाडी लढताना तृणमूल कॉँग्रेसच्या पदरी पराभवच पडत होता. २००७ मध्ये डाव्या सरकारने सिंगूर आणि नंदीग्राममध्ये सेझ निर्माण करून औद्योगिक वसाहती स्थापण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसणार होता. त्यांच्या पाठीशी ममतांनी उभे राहून संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. हे दोन्ही प्रकल्प रद्द करावे लागले. त्या आंदोलनात अनेक शेतकरी मारले गेले.मध्यंतरीच्या काळात ममता बॅनर्जी यांनी भाजपशी आघाडी केली. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांचा समावेशही झाला. त्या आघाडीतही संघर्ष झाला. त्यांनी २०११ ची विधानसभा निवडणूक कॉँग्रेसशी आघाडी करून लढविली आणि २९४ पैकी १८४ जागा जिंकून डाव्या आघाडीचा पराभव केला. २० मे २०११ रोजी त्यांचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.

उत्तम कवयित्री आणि चित्रकार असलेल्या ममता बॅनर्जी यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. साधी सुती साडी आणि पायात स्लिपर्स घालूनच त्या वावरतात. त्यांनी आजवर काढलेल्या ३०० चित्रांपैकी काहींची विक्री झाली आणि त्यातून दहा कोटी रुपये त्यांना मिळाले आहेत. त्यांनी २०११ मध्ये ‘मा, माटी मानुष’ ही घोषणा देऊन बंगाली अस्मिता जागृत केली होती. त्यांनी ‘जागो बांगला’ वृत्तपत्रही चालविले आहे. बंगाली अस्मितेच्या आधारे एक नवी राजकीय संस्कृती त्यांनी निर्माण केली. कॉँग्रेस ते तृणमूल कॉँग्रेस, भाजप आघाडी ते कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी असा प्रवास करीत त्यांनी सर्वांशी संघर्ष केला. त्यांनी २०१२ मध्ये यूपीएशी काडीमोड घेतला. आज विधानसभेत प्रचंड बहुमताने त्यांचा पक्ष सत्तेवर आहे.
लोकसभेत बंगालमधील ४२ पैकी ३६ जागा त्यांनी जिंकून संसदेतील चौथा मोठा पक्ष हे स्थान पटकाविले आहे. तृणमूल कॉँग्रेस प्रादेक्षिक पक्ष होता. पण आसाम, मणिपूर, त्रिपुरा, केरळ, आदी राज्यांतील मतांच्या जोरावर हा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यताप्राप्तही झाला आहे. तरीही पक्षाचे खरे बळ पश्चिम बंगालमध्ये आहे. आज विधानसभा आणि लोकसभेबरोबर स्थानिक संस्थांमध्ये तृणमूल कॉँग्रेसचे वर्चस्व आहे. ममता बॅनजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कडाडून विरोध करतात. भाजपने बंगालमध्ये हातपाय पसरण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. या निवडणुकीत एकेकाळी डाव्या आघाडीचा बालेकिल्ला तृणमूलच्या हाती गेलेला त्यांच्याच हाती सुरक्षित राहणार का? याचा निकाल या निवडणुकीत लागणार आहे. त्यासाठीही आता ममतादीदींचा संघर्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चालू आहे. संघर्षमय जीवनाने भरलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या हे बंगाली अस्मितेचे राजकारण आहे.उद्याच्या अंकात : उत्तरेतील बहुजन समाजाचा पक्ष

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपा