शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 18:26 IST

RSS on Batenge To Katenge: लोकसभा निवडणुकीनंतर भाजपकडून 'बटेंगे तो कटेंगे' असा नारा देत प्रचार केला जात आहे. त्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय आहे, याबद्दल आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी भाष्य केले.

Batenge To Katenge RSS: हरियाणा विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा आणि उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत ही घोषणा भाजपच्या नेत्यांकडून दिली जाताना दिसत आहे. या घोषणेबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी कारण सांगत या घोषणेचे समर्थन केले. 

दत्तात्रेय होसबळे म्हणाले, "स्फूर्ती हीच आहे की, समाजाची एकता, एकामत्मा. आपण जाती, भाषा, प्रांतावरून भेद केला, तर आपण विभागले जाऊ. त्यामुळे एकता आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी की, आपण हे कायम ठेवलं तर समाजात केवळ उपदेश असता, तर झालं असतं. प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी हे कृतीत आणावं लागेल", असे भाष्य त्यांनी केले.  

इतर क्षेत्रातील लोक हे समजत आहेत, ही चांगली गोष्ट -दत्तात्रेय होसबळे

"आज खूप सारे धार्मिक आणि इतर क्षेत्रातील लोक हे अनुभवातून समजत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्याचं स्वागत करत आहेत. हिंदू समाजाची एकता हे संघाचे जीवन व्रत आहे. आम्ही आग्रहाने सांगू आणि कृतीही करू", असे दत्तात्रेय होसबळे प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. 

"हिंदू एकता लोक कल्याणासाठी आहे. हिंदू सगळ्यांना सुख प्रदान करेल. जगातील कोणत्याही देशातील संकटात. त्यासाठी हिंदू एकता आवश्यक आहे. स्वतःला जगवणं आणि जगाचं भलं करणं, यासाठी आम्हाला हिंदू एकता हवी आहे, यात कोणतेही दूमत नाही", असे त्यांनी सांगितले. 

हिंदूंना तोडण्यासाठी अनेक शक्ती काम करत आहेत -होसबळे

"हिंदूमध्ये फूट पाडण्यासाठी शक्ती काम करत आहेत. त्याबद्दल सावध करावं लागतं. त्याबद्दल सावधगिरी बाळगावी लागते. त्या अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. त्या हिंदूंना जातीच्या नावावर, विचारधारांच्या नावावर तोंडत आहेत. त्यामुळे आम्हाला सावध राहावं लागतं", अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी मांडली.