शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

बारामतीचे पार्सल बारामतीला परत पाठवा- फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 06:57 IST

देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करणाऱ्यांना धडा शिकविण्याचे आवाहन

पनवेल : देशाच्या सीमा कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहेत हे ठरविणारी ही निवडणूक आहे. देश मोदींच्या हातामध्ये सुरक्षित आहे. आता देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाखिचडी आघाडीला धडा शिकवा. या निवडणुकीमध्ये बारामतीसह माढा हादरला आहे. बारामतीचे पार्सल तुमच्याकडे आले आहे ते परत पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.मावळ मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये सभेचे आयोजन केले होते, या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो याचा विचार करणारी ही निवडणूक आहे. या पूर्वी देशावर अतिरेकी हल्ले झाल्यानंतर फक्त बघ्याची भूमिका घेतली जात होती. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशावर झालेल्या हल्ल्याचे जशास तसे उत्तर देण्यात आले. पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले. देशाच्या सैनिकांमध्ये यापूर्वीही ताकद होती; पण तेव्हाच्या सरकारमध्ये ताकद नव्हती, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीची महाखिचडी आघाडी राष्ट्रद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करत आहे. विरोधकांची अवस्था बिकट झाली आहे. शरद पवार यांनी माढाच्या पिचवरून पळ काढला. कॅप्टनच पळ काढत असेल तर चिल्ले-पिल्ले कसे लढणार, या वेळी माढासह बारामतीही हादरणार आहे असे ते म्हणाले....तर रॉकेटसोबत नेता पाठविला असतापाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइक जगातील सर्वांनी मान्य केला. फक्त पाकिस्तान व महाखिचडी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला मान्य नाही. हल्ल्याचे पुरावे मागत आहेत. मी गमतीने त्यांना म्हणालो की, तुम्ही पुरावे मागणार हे माहीत असते तर रॉकेट सोबत तुमचा एखादा नेता बांधून पाठविला असता व प्रत्यक्ष बघा म्हटले असते, असे मतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार