शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

बारामतीचे पार्सल बारामतीला परत पाठवा- फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 06:57 IST

देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करणाऱ्यांना धडा शिकविण्याचे आवाहन

पनवेल : देशाच्या सीमा कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहेत हे ठरविणारी ही निवडणूक आहे. देश मोदींच्या हातामध्ये सुरक्षित आहे. आता देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाखिचडी आघाडीला धडा शिकवा. या निवडणुकीमध्ये बारामतीसह माढा हादरला आहे. बारामतीचे पार्सल तुमच्याकडे आले आहे ते परत पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.मावळ मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये सभेचे आयोजन केले होते, या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो याचा विचार करणारी ही निवडणूक आहे. या पूर्वी देशावर अतिरेकी हल्ले झाल्यानंतर फक्त बघ्याची भूमिका घेतली जात होती. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशावर झालेल्या हल्ल्याचे जशास तसे उत्तर देण्यात आले. पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले. देशाच्या सैनिकांमध्ये यापूर्वीही ताकद होती; पण तेव्हाच्या सरकारमध्ये ताकद नव्हती, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीची महाखिचडी आघाडी राष्ट्रद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करत आहे. विरोधकांची अवस्था बिकट झाली आहे. शरद पवार यांनी माढाच्या पिचवरून पळ काढला. कॅप्टनच पळ काढत असेल तर चिल्ले-पिल्ले कसे लढणार, या वेळी माढासह बारामतीही हादरणार आहे असे ते म्हणाले....तर रॉकेटसोबत नेता पाठविला असतापाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइक जगातील सर्वांनी मान्य केला. फक्त पाकिस्तान व महाखिचडी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला मान्य नाही. हल्ल्याचे पुरावे मागत आहेत. मी गमतीने त्यांना म्हणालो की, तुम्ही पुरावे मागणार हे माहीत असते तर रॉकेट सोबत तुमचा एखादा नेता बांधून पाठविला असता व प्रत्यक्ष बघा म्हटले असते, असे मतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार