शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

“बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले तर महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही”

By प्रविण मरगळे | Updated: January 22, 2021 18:05 IST

यातच आता काँग्रेसच्या महिल्या नेत्यांनी बाळासाहेब थोरात यांचीच प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड करावी अशी मागणी केली आहे

ठळक मुद्देबाळासाहेब थोरात हेच प्रदेशाध्यक्ष राहिले पाहिजे, तरच पुढील वेळी राज्यात काँग्रेसचं सरकार येऊ शकेलमागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या १२-१३ जागा येतील असं म्हटलं जात होतंअडचणीच्या काळात बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत ४४ जागांचे यश खेचून आणलं

मुंबई- काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून पक्षात दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. एकीकडे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली, त्यात प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी थोरातांनी दर्शवली, सुरूवातीला पक्ष नेतृत्वाने बाळासाहेब थोरातांची मागणी फेटाळली, त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये पक्ष संघटनेत बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. बाळासाहेब थोरात यांच्याजागी दुसऱ्या प्रदेशाध्यक्षाची नेमणूक करण्याची चर्चा आहे.

यात सर्वाधिक आघाडीचं नाव आहे ते म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विदर्भाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मिळावे अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. तर या पदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पटोले इच्छुक आहेत, प्रदेशाध्यक्षपदासाठी पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाची खुर्चीही सोडण्याची तयारी दाखवली आहे. दिल्लीतील नेतृत्वानेही नाना पटोले यांच्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती राजकीय वर्तुळात आहे, परंतु अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही.

यातच आता काँग्रेसच्या महिल्या नेत्यांनी बाळासाहेब थोरात यांचीच प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड करावी अशी मागणी केली आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, बाळासाहेब थोरात हेच प्रदेशाध्यक्ष राहिले पाहिजे, तरच पुढील वेळी राज्यात काँग्रेसचं सरकार येऊ शकेल, ठाकूर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवांकडे आपलं मत व्यक्त केले आहे. काँग्रेसचे सहप्रभारी आशिष दुवा आणि बी एम संदीप यांच्यासमोर हे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

त्याचसोबत मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या १२-१३ जागा येतील असं म्हटलं जात होतं, त्यावेळी कोणीही प्रदेशाध्यक्ष बनण्यास तयार नव्हतं, अडचणीच्या काळात बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत ४४ जागांचे यश खेचून आणलं, त्यामुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले तर पुढीलवेळी काँग्रेसचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

नाना पटोलेंची स्वबळाची भाषा

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची निवड निश्चित झाल्याचं समजलं आहे, त्याच पार्श्वभूमीवर नाना पटोलेंनी काँग्रेसच्या स्वबळाचं विधान केले आहे. राज्यात स्वबळावर काँग्रेस पक्ष सत्तेत येईल, यासाठी प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी सांगितले, नाना पटोले म्हणाले की, आमच्या पक्षामध्ये संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहे. जी जबाबदारी मला मिळेल ती प्रमाणिकपणे पार पाडण्याची तयारी माझी असून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. स्वबळावर महाराष्ट्रात पक्ष सत्तेत कसा येईल आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राला पुन्हा वैभव प्राप्त करुन देण्याचं काम काँग्रेस पक्षाकडून केलं जाईल" असं त्यांनी सांगितले.

नाना पटोलेंचं नाव हायकमांडकडून निश्चित?

राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीव सातव, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची नावं आघाडीवर आहेत. पण यातून नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या निवडीमुळे विधानसभा अध्यक्ष बदलाचा प्रश्न आहे. त्याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतची चर्चा केल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, नाना पटोले यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याने आता महाराष्ट्रात विधानसभेचा नवा अध्यक्ष देखील बदलावा लागणार आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून कोणाची निवड होणार याचीही चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसYashomati Thakurयशोमती ठाकूरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातNana Patoleनाना पटोले