शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

दिल्ली, मुंबईच्या संस्थाकडून विधानसभानिहाय सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:30 IST

निवडणूक : विद्यमान आमदारांसह इतर पर्यायांवर शोध

जळगाव : विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर येवून ठेपली आहे. राजकीय पक्षांनी यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात भाजपा व शिवसेनेने दिल्ली, मुंबई येथील बड्या संस्थाकडून सर्वेक्षण सुरु केले आहे. यात आमदारांसह इच्छुक उमेदवार व नव्या पर्यायी उमेदवारांबाबत नागरिकांचे मत जाणून घेतले जात आहे. येत्या पंधरा दिवसात सर्वेक्षण पूर्ण करून पक्षश्रेष्ठींकडे याबाबतचा अहवाल दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आता राजकीय पक्षांनी देखील प्रत्येक निवडणुकीआधी नागरिकांचे मत जाणून घेवून निवडणुकीत योग्य उमेदवार कोण चांगला राहिल याबाबतचे सर्वेक्षण करून उमेदवार देण्यावर भर दिसून येत आहे. यासाठीच निवडणुकीच्या काही महिने अगोदरच मतदारसंघामध्ये सर्व्हे करून योग्य उमेदवाराच्या नावाबाबत माहिती जमा केली जात आहे. जिल्ह्यातील जळगाव शहर, ग्रामीण, चाळीसगाव, एरंडोल, चोपडा, अमळनेर या विधानसभांमध्ये भाजपाभाजपाकडून वर्षभरात तीन वेळा सर्वेक्षणजसा काळ बदलत आहे, त्यानुसार राजकीय पक्षांकडून प्रचाराच्या तंत्रासह निवडणुकीआधीच नागरिकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न आता केला जात आहे. यामध्ये भाजपाने इतर पक्षांच्या तुलनेत आघाडी घेतलेली दिसून येत आहे. भाजपाने गेल्या वर्षभरापासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून वर्षभरात भाजपाचे जिल्ह्यातील ११ विधानसभांमध्ये तीन वेळा सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता निवडणुकीला दोन महिने शिल्लक असताना अंतिम सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. २०१८ मध्ये जून-जुलै व नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये तर यावर्षी एप्रिल-मे महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले होते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचे सर्वेक्षण व विधानसभा निवडणुकीचे सर्वेक्षण हे वेगवेगळ्या पातळीवरच करण्यात आले आहे.अशी आहे प्रश्नावलीशिवसेनेच्या सर्वेक्षणात विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने युती करावी की नाही ?, युती केली तर फायदा कोणाचा ?, पाच वर्षात सत्तेत राहून शिवसेनेने जनतेसाठी भाजपा विरोधात घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य ?, स्थानिक आमदारांचे काम कसे ? याबाबतची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातून सुुरु केलेल्या जनआशिर्वाद दौऱ्याचा आधी व त्यानंतर अशा दोन टप्प्यात हे सर्वेक्षण करण्यात आला.ळगाव, चाळीसगाव, अमळनेरवर लक्षभाजपाच्या सर्वेक्षणात प्रामुख्याने जळगाव शहर, चाळीसगाव, अमळनेर या तीन्ही विधानसभांच्या जागांवर अधिक भर दिला जात आहे. चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील हे आता खासदार झाले असल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेबाबत योग्य उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. तर अमळनेरला देखील अनेकजण भाजपाकडून इच्छुक असल्याने नागरिकांचे मत तपासले जात आहे. जळगाव शहराची जागेसाठी शिवसेनाही आग्रही असून, विद्यमान आमदार भाजपाचा आहे. अशा परिस्थितीत या जागेबाबतचा आढावा घेवून अंतिम अहवाल १० आॅगस्टपर्यंत पक्षश्रेष्ठींना देण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूक