शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

भाजपाला अजून एक धक्का, एनडीएमधील आणखी एका मित्रपक्षाने सोडली साथ

By बाळकृष्ण परब | Updated: October 21, 2020 21:15 IST

BJP News : भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)मधील अजून एका मित्रपक्षाने भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देगोरखा जनमुक्ती मोर्चाने भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली पश्चिम बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) चे नेते बिमल गुरुंग यांनी केली ही घोषणा २०२१ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल कांग्रेससोबत आघाडी

नवी दिल्ली - एकीकडे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते असलेल्या एकनाथ खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय राजकारणातहीभाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)मधील अजून एका मित्रपक्षाने भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) चे नेते बिमल गुरुंग यांनी ही घोषणा केली आहे.गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेले गोरखा जनमुक्ती मोर्चाचे नेते बिमल गुरुंग आज अचानकपणे कोलकात्यामध्ये प्रकट झाले. त्यानंतर त्यांनी एनडीए सोडत असल्याची घोषणा केली. तसेच २०२१ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल कांग्रेससोबत आघाडी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

बिमल गुरुंग हे आज कोलकात्यामधील सॉल्ट लेक परिसरातील गोरखा भवनमध्ये दिसले. ते प्रथम गोरखा भवनमध्ये गेले. तिथे बाहेरील लोकांना परवानगी नव्हती. त्यानंतर भाजपाने राज्यासाठी काहीच केले नाही, असा आरोप त्यांनी केला. गोरखालँडसाठी आमच्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत, असे ते म्हणाले.भारतीय जनता पक्षाने जे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता केली नाही. मात्र ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता केली. त्यामुळे मी स्वत:ला एनडीएपासून वेगळे करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह बंगालमध्ये गोरख्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे माझ्या पक्षाने एनडीए सोडली आहे, असे त्यांनी सांगितले.२०२१ मध्ये बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवून भाजपाला चोख प्रत्युत्तर देणार आहोत, असेही गुरुंग यांनी सांगितले. दरम्यान, गुरुंग यांच्या या निर्णयानंतर उत्तर बंगालमधील पर्वतीय भागात भाजपाला किमान १० जागांवर फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, सध्या सुरूअसलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एलजेपीने एनडीएपासून वेगळे होऊन स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणwest bengalपश्चिम बंगाल