शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांना अभय! परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही, शरद पवारांकडून पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 06:02 IST

Sachin Vaze, Param Bir Singh: परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्यासह पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय देण्याचा निर्णय घेतला

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाच्या कालावधीत गृहमंत्री अनिल देशमुख हे कोरोनावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात भरती होते. त्यामुळे सिंग यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याने देशमुख हे राजीनामा देणार नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्यासह पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय देण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात देशमुखांकडून वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले; परंतु माझ्याकडे जी कागदपत्रे उपलब्ध आहेत त्यानुसार  ५ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत देशमुख हे नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत होते. त्या रुग्णालयाने प्रमाणपत्र दिले आहे. त्यांना १५ फेब्रुवारीला रुग्णालयातून सुटी मिळाली; त्यानंतर १५ दिवस ते घरीच विलगीकरणात होते. देशमुख रुग्णालयात भरती असल्याचा रेकॉर्ड आहे.   २७ फेब्रुवारीपर्यंत त्यांना घरीच आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला होता. त्यामुळे या काळात सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची शक्यता नाही. 

महाराष्ट्र एटीएस योग्य दिशेने तपास करत आहे, त्यांचा तपास विचलित करण्यासाठी असे आरोप होत आहेत. फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्या, असा जर परमबीर सिंग यांचा आरोप आहे. तर मग आरोप करण्यासाठी परमबीर यांना एक महिना का थांबावे लागले? असा सवाल पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

पवार न्यायाधीश नाहीत!  - खा. गिरीश  बापटदेशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची पवार यांनी हवा काढल्यानंतर भाजपचे खा. गिरीश बापट म्हणाले की, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आरोप करणे ही गंभीर बाब आहे. राज्य सरकार नालायक असून कुंपणच शेत खायला निघाले आहे. या प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीन चिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत, असेही ते म्हणाले.

परमबीर केंद्राचा पोपट -शिवसेनापरमबीर सिंग हे केंद्राचा बोलका पोपट असून महाराष्ट्राचे सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकार त्यांचा वापर करून घेत असल्याचा आरोप शिवसेनेचे खा. विनायक राऊत आणि माजी मंत्री अरविंद सावंत यांनी केला. ते महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी बोलत होते.  

राज्यसभेत भाजप सदस्यांचा गोंधळ! राज्यसभेत सोमवारी भाजपच्या सदस्यांनी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींविषयी गोंधळ केला. यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. शून्य तासाच्या शेवटच्या टप्प्यात सत्ताधारी पक्षाच्या अनेक सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी याला परवानगी दिली नाही.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुखParam Bir Singhपरम बीर सिंगShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार