शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

राष्ट्रवादीच्या हाती अहमदनगरची चावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 06:28 IST

लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असली तरी अहमदनगरमध्ये दोन्ही काँग्रेसपैकी कोण लढणार? हेच अद्याप ठरलेले नाही. दोघांच्या भांडणात आजवर भाजपाने इथे फायदा उठविलेला दिसतो.

- सुदाम देशमुखलोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असली तरी अहमदनगरमध्ये दोन्ही काँग्रेसपैकी कोण लढणार? हेच अद्याप ठरलेले नाही. दोघांच्या भांडणात आजवर भाजपाने इथे फायदा उठविलेला दिसतो. यावेळी मात्र, भाजपची वाटही बिकट दिसते. हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. राष्टÑवादीचे तुकाराम गडाख यांना इथे एकदा संधी मिळाली तर दिलीप गांधींच्या रुपाने सध्या भाजपाचा खासदार आहे. २००४ चा अपवाद वगळता ते सलग तिसऱ्यांदा खासदार आहेत.शिवसेना-भाजपामागे राज्यात ओबीसींची मोठी व्होट बँक आहे. नगरमध्येही भाजपाला याचाच फायदा झाला. १९९८ पर्यंत इथे सेना-भाजपाला शिरकाव करता आला नव्हता. १९९८-९९ मध्ये बाळासाहेब विखे सेनेच्या तिकिटावर खासदार झाले तर १९९९ मध्ये भाजपाचे दिलीप गांधी निवडून आले. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दादा पाटील शेळके व काँग्रेसचे बाबासाहेब भोस यांच्यातील मतविभागणीने गांधी संसदेत पोहचले. २००४ मध्ये भाजपा व राष्टÑवादी यांच्यात झालेल्या सरळ लढतीत भाजपाचे ना. स. फरांदे पराभूत होऊन तुकाराम गडाख विजयी झाले. २००९ साली राष्टÑवादीत बंडखोरी होऊन शिवाजी कर्डिले व राजीव राजळे हे आमनेसामने आले. त्यांच्यातील मतविभागणीचा पुन्हा गांधी यांना फायदा झाला. दोन्ही काँग्रेसमध्ये जेव्हा बिघाडी अथवा बंडखोरी झाली तेव्हा भाजपाला फायदा झाला आहे.२०१४ मध्ये मोदी लाट भाजपाच्या मदतीला आली. आता गांधी पुन्हा लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी भाजपाचेच अनेकजण देव पाण्यात बुडवून बसले आहेत. नगर महापालिकेत गांधींना अपयश येऊनही त्यांनी राष्ट्रवादीच्या बळावर भाजपाचा महापौर केला. लोकसभेत याचा त्यांना फायदा होणार की तोटा हे निवडणुकीत दिसून येईल. गांधींना उमेदवारी नाकारल्यास पालकमंत्री राम शिंदे, आ. मोनिका राजळे, प्रा. भानुदास बेरड यांचीही चर्चा आहे. राष्टÑवादीचे नाव अद्यापही ठरलेले नाही. राष्ट्रवादीने आमदार अरुण जगताप यांच्या विचार सुरु केला होता पण त्यांचे पुत्र आ. संग्राम जगताप यांनी महापालिकेत भाजपाला पाठिंबा दिल्याने जगताप यांचे नाव चर्चेतून बाद झाले आहे. नरेंद्र घुले, दादा कळमकर, अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्यासह माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांचे नाव आहे. पवारांनीही त्यांच्याशी संपर्क साधल्याचे समजते.राष्ट्रवादीसमोर नेहमी बंडखोरीची डोकेदुखी राहिली आहे. याहीवेळी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे हे स्वत: इच्छुक आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी त्यांची मागणी आहे. मतदारसंघ कॉंग्रेसला न सोडल्यास राष्टÑवादीसह कुठल्याही पक्षाच्या तिकीटावर किंवा अपक्ष लढू, अशी सुजय यांनी घोषणा केली आहे. एकतर मतदारसंघ कॉंग्रेसला सोडणे किंवा विखेंशी लढण्याची तयारी ठेवणे हे दोन पर्याय राष्टÑवादीसमोर आहेत.>सध्याची परिस्थितीयुती झाली तर हा मतदारसंघ भाजपाकडे राहील. मात्र, शिवसेनेनेही निवडणुकीची तयारी केली असून; घनश्याम शेलार हे शिवसेनेचे उमेदवार असतील. तसे संकेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे जिल्हाप्रमुखांनी जाहीर केले आहे. इच्छुकांमध्ये नव्या नावांची भर पडते आहे.भाजपचा सहयोगी असलेल्या रासपनेही या जागेवर दावा केला आहे. वंचित बहुजन विकास आघाडीही इथे उमेदवार देण्यासाठी प्रयत्नशील आहे. आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसला न सुटल्यास विखे हे कोणाची उमेदवारी घेणार? यावरही मतदारसंघातील राजकारण ढवळून निघणार आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, गत दोन निवडणुकीत राष्ट्रवादीला इथे विजय मिळविता आलेला नाही. त्यामुळे ही जागा आम्हाला सोडावी, असा काँग्रेसचा आग्रह आहे. ही जागा काँग्रेसला मिळाल्यास सुजय विखे हे उमेदवार असतील. त्यावेळी राष्ट्रवादीची भूमिका काय असेल? विखे यांना राष्ट्रवादीची किती मदत मिळणार आणि त्याचा फायदा कोणाला ? याची गणिते सध्या इथे मांडली जात आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९