शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"जे घडले त्याचे अचूक वार्तांकन केले"; जयंत पाटलांनी सांगितला लोकमतच्या 'त्या' बातमीचा किस्सा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 07:13 IST

‘लोकमत ट्रेंड सेटर्स’ पुरस्कार सोहळा : समर्पित भावनेने केलेली कामे माेठी हाेतात

मुंबई : स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांची समाजाप्रती, देशाप्रती जी समर्पणाची भावना होती, तिच्यामुळेच आज ‘लोकमत’ खऱ्या अर्थाने लोकांचे मत बनले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी काढले.

सहारा स्टार येथे ‘लोकमत ट्रेंड सेटर्स पुरस्कार सोहळ्या’त राज्यपाल बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, उद्योजिका उषा काकडे, दिग्दर्शक नागनाथ मंजुळे, हिरे व्यापारी किरीट भन्साळी आणि लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘ट्रेंड सेंटर्स काॅफी टेबल बुक’चे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांतील ट्रेंड सेटर्सना सन्मानित करण्यात आले. 

एका ध्येयाने, देशासाठी समर्पित भावनेने काम सुरू केल्यास ती कामे मोठी होतात. स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांनी जेव्हा ‘लोकमत’ सुरू केले तेव्हा मी ‘लोकमत’ सुरू करेन, माझी मुले तो नंबर एकचा बनवतील, असा त्यांचा विचार नव्हता. त्यांच्या डोळ्यांसमोर तर केवळ भारताच्या स्वातंत्र्याचा विचार होता. त्यासाठी बलिदानाची त्यांची तयारी होती. त्यांच्यासह अनेकांनी त्यासाठी त्याग केला आहे. बलिदान दिले. त्यांची ही प्रेरणा, समाज-देशाप्रतीची समर्पणाची भावना महत्त्वाची होती. त्यामुळे आज देश स्वतंत्र आहेच; ‘लोकमत’सुद्धा खऱ्या अर्थाने ‘लोकांचे मत’ बनल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी ‘लोकमत’च्या बातमीदारीचे विशेष कौतुक केले. ‘लोकमत’ योग्य आणि अचूक बातम्या देतो. आक्रस्ताळ्या बातम्या देत नाही. काही दिवसांपूर्वी माझ्या गावी मी एक छोटी मुलाखत दिली. त्याचे विपर्यस्त वृत्त काही वृत्तपत्रांनी दिले. वाहिन्यांनी ते दिवसभर चालविले. ‘लोकमत’ने मात्र जे घडले त्याचे अचूक वार्तांकन केले. मी ते ट्विटही केले होते. माझ्या आजवरच्या राजकीय जीवनात एखादी छोटी बात किती मोठी बातमी बनते, याचा अनुभव मी यानिमित्ताने घेतला. आज छोटी बातमी मोठी करून लावण्याचा ट्रेंड; पण ‘लोकमत’ मात्र जे योग्य आहे तेच देण्याची आपली परंपरा जपत आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

जे घडले त्याचे अचूक वार्तांकन केले - जयंत पाटील‘लोकमत’ योग्य आणि अचूक बातम्या देतो. आक्रस्ताळ्या बातम्या देत नाही. काही दिवसांपूर्वी माझ्या गावी मी एक छोटी मुलाखत दिली. त्याचे विपर्यस्त वृत्त काही वृत्तपत्रांनी दिले. वाहिन्यांनी ते दिवसभर चालविले. ‘लोकमत’ने मात्र जे घडले त्याचे अचूक वार्तांकन केले. मी ते ट्विटही केले होते. माझ्या आजवरच्या राजकीय जीवनात एखादी छोटी बात किती मोठी बातमी बनते, याचा अनुभव मी यानिमित्ताने घेतला, असे या वेळी जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :LokmatलोकमतJayant Patilजयंत पाटील