शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

"जे घडले त्याचे अचूक वार्तांकन केले"; जयंत पाटलांनी सांगितला लोकमतच्या 'त्या' बातमीचा किस्सा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 07:13 IST

‘लोकमत ट्रेंड सेटर्स’ पुरस्कार सोहळा : समर्पित भावनेने केलेली कामे माेठी हाेतात

मुंबई : स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांची समाजाप्रती, देशाप्रती जी समर्पणाची भावना होती, तिच्यामुळेच आज ‘लोकमत’ खऱ्या अर्थाने लोकांचे मत बनले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी काढले.

सहारा स्टार येथे ‘लोकमत ट्रेंड सेटर्स पुरस्कार सोहळ्या’त राज्यपाल बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, उद्योजिका उषा काकडे, दिग्दर्शक नागनाथ मंजुळे, हिरे व्यापारी किरीट भन्साळी आणि लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘ट्रेंड सेंटर्स काॅफी टेबल बुक’चे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांतील ट्रेंड सेटर्सना सन्मानित करण्यात आले. 

एका ध्येयाने, देशासाठी समर्पित भावनेने काम सुरू केल्यास ती कामे मोठी होतात. स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांनी जेव्हा ‘लोकमत’ सुरू केले तेव्हा मी ‘लोकमत’ सुरू करेन, माझी मुले तो नंबर एकचा बनवतील, असा त्यांचा विचार नव्हता. त्यांच्या डोळ्यांसमोर तर केवळ भारताच्या स्वातंत्र्याचा विचार होता. त्यासाठी बलिदानाची त्यांची तयारी होती. त्यांच्यासह अनेकांनी त्यासाठी त्याग केला आहे. बलिदान दिले. त्यांची ही प्रेरणा, समाज-देशाप्रतीची समर्पणाची भावना महत्त्वाची होती. त्यामुळे आज देश स्वतंत्र आहेच; ‘लोकमत’सुद्धा खऱ्या अर्थाने ‘लोकांचे मत’ बनल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी ‘लोकमत’च्या बातमीदारीचे विशेष कौतुक केले. ‘लोकमत’ योग्य आणि अचूक बातम्या देतो. आक्रस्ताळ्या बातम्या देत नाही. काही दिवसांपूर्वी माझ्या गावी मी एक छोटी मुलाखत दिली. त्याचे विपर्यस्त वृत्त काही वृत्तपत्रांनी दिले. वाहिन्यांनी ते दिवसभर चालविले. ‘लोकमत’ने मात्र जे घडले त्याचे अचूक वार्तांकन केले. मी ते ट्विटही केले होते. माझ्या आजवरच्या राजकीय जीवनात एखादी छोटी बात किती मोठी बातमी बनते, याचा अनुभव मी यानिमित्ताने घेतला. आज छोटी बातमी मोठी करून लावण्याचा ट्रेंड; पण ‘लोकमत’ मात्र जे योग्य आहे तेच देण्याची आपली परंपरा जपत आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

जे घडले त्याचे अचूक वार्तांकन केले - जयंत पाटील‘लोकमत’ योग्य आणि अचूक बातम्या देतो. आक्रस्ताळ्या बातम्या देत नाही. काही दिवसांपूर्वी माझ्या गावी मी एक छोटी मुलाखत दिली. त्याचे विपर्यस्त वृत्त काही वृत्तपत्रांनी दिले. वाहिन्यांनी ते दिवसभर चालविले. ‘लोकमत’ने मात्र जे घडले त्याचे अचूक वार्तांकन केले. मी ते ट्विटही केले होते. माझ्या आजवरच्या राजकीय जीवनात एखादी छोटी बात किती मोठी बातमी बनते, याचा अनुभव मी यानिमित्ताने घेतला, असे या वेळी जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :LokmatलोकमतJayant Patilजयंत पाटील