शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

Aasam Assembly Elections: "रिकामी तिजोरी भरण्यासाठी काँग्रेसला कोणत्याही पद्धतीने हवी आहे सत्ता" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 06:58 IST

पंतप्रधान मोदी यांची टीका : राज्यातील विकासाचा वाचला पाढा 

बोकाघाट (आसाम) : देशात आणि राज्यात विविध भागांत प्रभाव कमी होत असलेल्या काँग्रेसची तिजोरी आता रिकामी झाली आहे. त्यामुळे ती भरण्यासाठी ते कोणत्याही प्रकारे सत्तेत येऊ इच्छितात. यासाठी ते कोणाशीही तडजोड करू शकतात, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे विरोधकांवर हल्लाबोल केला. 

रालोआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, जेव्हा केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी काँग्रेसची सरकारे होती तेव्हा आसामकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यावेळी राज्यातील लोकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले नाही. आज केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असल्याने आसाम विकासाच्या मार्गावर आहे. महामार्गांचे काम दुप्पट वेगाने सुरू आहे. कारण, राज्य सरकारही आसामला देशाशी जोडत आहे. आता प्रत्येकाला छत आणि प्रत्येक घरात पाणी असे कामे वेगाने होत आहेत. ते म्हणाले की, या लोकांना खोटे आश्वासने देण्याची, खोटे जाहीरनामे बनविण्याची सवय झाली आहे. काँग्रेस म्हणजे खोट्या जाहीरनाम्याची हमी. काँग्रेस म्हणजे भ्रम, अस्थिरता, बॉम्ब, बंदूक आणि नाकेबंदी यांची हमी. स्वत:ला धर्मनिरपेक्ष सांगणारा हा पक्ष आसाम, प. बंगाल आणि केरळमध्ये धार्मिक आधारावर बनलेल्या पक्षांसोबत मैत्री करत आहे. झारखंड, बिहार, महाराष्ट्रात ज्यांच्यासोबत यांची आघाडी आहे ते प. बंगालमध्ये यांच्याविरुद्ध प्रचार करत आहेत. 

त्यांची मैत्री केवळ खुर्चीशी आहे

मोदी म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वात रालोआ सरकार सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास या धोरणानुसार पुढे जात आहे. मात्र, आजच्या काँग्रेस नेत्यांना केवळ सत्ता हवी आहे. मग ती कोणत्याही प्रकारे मिळाली तरी चालेल. खरे तर काँग्रेसची तिजोरी रिकामी झाली आहे. ती भरण्यासाठी त्यांना कशीही सत्ता हवी आहे. काँग्रेसची मैत्री केवळ खुर्चीशी आहे. त्यांच्याकडे ना नेतृत्व आहे ना दृष्टी. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात आलेल्या पाच आश्वासनांचा उल्लेख करुन ते म्हणाले की, ५० वर्षांपर्यंत आसाममध्ये राज्य करणारे लोक आजकाल राज्याच्या जनतेला पाच आश्वासनांची हमी देत आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी