शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

‘आप’ची संघटना मजबूत; शीला दीक्षितांना गटातटांची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 06:18 IST

दिल्लीमध्ये सीलिंगची समस्या सोडवण्यात अपयशी ठरलेल्या सत्ताधारी भाजपासमोर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर व्यापाऱ्यांची निर्णायक मते टिकवण्याचे आव्हान आहे.

- टेकचंद सोनवणेसर्व महापालिकांमध्ये सत्ता असली तरीही दिल्लीमध्ये सीलिंगची समस्या सोडवण्यात अपयशी ठरलेल्या सत्ताधारी भाजपासमोर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर व्यापाऱ्यांची निर्णायक मते टिकवण्याचे आव्हान आहे. शिवाय कोट्यवधींच्या पक्षनिधीला कात्री लागण्याची शक्यता आहे. काँग्रेस व आम आदमी पक्षाची आघाडी न झाल्याने मोठा दिलासा मिळालेल्या भाजपाने दिल्लीत मेळावे, आंदोलनांची मालिका सुरू केली आहे.पाच वर्षांत भाजपा व आपने संघटना मजबूत केली. काँग्रेसला मात्र दोनदा प्रदेशाध्यक्ष बदलावा लागला. माजी प्रदेशाध्यक्ष अरविंदरसिंह लवली यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पार धुव्वा झाला. अपयशाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिल्यावर अजय माकन यांच्या हाती धुरा आली.पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून लवली भाजपामध्ये दाखल झाले. तेथे पद व सन्मान न मिळाल्याने ते पुन्हा स्वगृही परतले. बिघडलेले आरोग्य व आम आदमी पक्षाशी आघाडी करण्याच्या आग्रहामुळे अजय माकन यांनाही प्रदेशध्यक्षपदाचाराजीनामा द्यावा लागला. नव्या प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या काळात दिल्लीचा झालेला विकास व संघटनेवर त्यांची पकड मजबूत असली तरी सुस्तावलेल्या संघटनेला अवघ्या पाच महिन्यांत त्या कितपत सक्रिय करू शकतील, हा प्रश्नच आहे.आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल संघटनात्मक निर्णयांमध्ये दोन्ही पक्षांपेक्षा सरस ठरले. सातही जागांच्या लोकसभा निरीक्षकपदी गतवर्षीच संभाव्य उमेदवारांची नियुक्ती त्यांनी केली. शिवाय स्वत: लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत दुसºया क्रमांकाची मते घेणाºया ‘आप’ने त्यानंतर अकरा महिन्यांत विधानसभेत भाजपाचा धुव्वा उडवला होता. बिहार, उत्तर प्रदेशमधून दिल्लीत रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात आलेल्या कष्टकरी मतदारांसाठी मेळावे, आरोग्य शिबिरे, कल्याणकारी योजनांचा थेट लाभ, अशी पूर्वतयारी ‘आप’ने आरंभली आहे. मात्र नायब राज्यपालांवरील आरोप-प्रत्यारोपांवरून वाढलेली सहानुभूती मतांमध्ये परावर्तित होईल की नाही याची शंका अरविंद केजरीवाल यांना आहे.भाजपाची मदार बिहारी मतदारांवर आहे. पूर्वांचलवासी मतदारांसाठी प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते व प्रदेशाध्यक्ष खासदार मनोज तिवारी अतोनात कष्ट घेत आहेत. ऐनवेळी या मतदारांना भेटण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचीही सभा घ्यावी लागेल, असा इशारा बैठकीत देऊन त्यांनी पक्षाध्यक्षांचीही नाराजी ओढवून घेतली होती.अमित शहांच्या कानउघडणीनंतर चुरा भोज, छट महोत्सव, लिट्टी चोखा महोत्सव, समरसता खिचडीचे प्रयत्न त्यांनी राबविले. मात्र सीलिंगची समस्या, सुरक्षा व्यवस्था केंद्राकडे असतानाही वाढणारी गुन्हेगारी, महिलांना वाटणारी असुरक्षितता यावर ठोस स्पष्टीकरण देण्यास प्रदेश भाजपाचे नेते अपयशी ठरले आहेत. लोकसभेत मोदीलाटेत ४६.४० टक्के मते मिळवून सातही जागा जिंकणाºया भाजपाचे विधानसभेत तीनच आमदार निवडून आले होते, याचेही भान पक्षाला राखावे लागेल.>मते कायम राखण्याचे ‘आप’समोरही आव्हान>32.9०%मते लोकसभा निवडणुकीत 'आप'ला मिळाली होती. दलित, मुस्लीम, नवमतदार, असंघटित कामगार व राज्य सरकारमधील नोकरदारांची ही मते कायम राखण्याचे मोठे आव्हान 'आप'समोर आहे. भाजपाचे खासदार व दलित नेते उदित राज यांनी अनेकदा स्वपक्षावर केलेल्या टीकेचाही वापर 'आप' प्रचारात करणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९