शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’ची संघटना मजबूत; शीला दीक्षितांना गटातटांची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 06:18 IST

दिल्लीमध्ये सीलिंगची समस्या सोडवण्यात अपयशी ठरलेल्या सत्ताधारी भाजपासमोर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर व्यापाऱ्यांची निर्णायक मते टिकवण्याचे आव्हान आहे.

- टेकचंद सोनवणेसर्व महापालिकांमध्ये सत्ता असली तरीही दिल्लीमध्ये सीलिंगची समस्या सोडवण्यात अपयशी ठरलेल्या सत्ताधारी भाजपासमोर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर व्यापाऱ्यांची निर्णायक मते टिकवण्याचे आव्हान आहे. शिवाय कोट्यवधींच्या पक्षनिधीला कात्री लागण्याची शक्यता आहे. काँग्रेस व आम आदमी पक्षाची आघाडी न झाल्याने मोठा दिलासा मिळालेल्या भाजपाने दिल्लीत मेळावे, आंदोलनांची मालिका सुरू केली आहे.पाच वर्षांत भाजपा व आपने संघटना मजबूत केली. काँग्रेसला मात्र दोनदा प्रदेशाध्यक्ष बदलावा लागला. माजी प्रदेशाध्यक्ष अरविंदरसिंह लवली यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पार धुव्वा झाला. अपयशाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिल्यावर अजय माकन यांच्या हाती धुरा आली.पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून लवली भाजपामध्ये दाखल झाले. तेथे पद व सन्मान न मिळाल्याने ते पुन्हा स्वगृही परतले. बिघडलेले आरोग्य व आम आदमी पक्षाशी आघाडी करण्याच्या आग्रहामुळे अजय माकन यांनाही प्रदेशध्यक्षपदाचाराजीनामा द्यावा लागला. नव्या प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या काळात दिल्लीचा झालेला विकास व संघटनेवर त्यांची पकड मजबूत असली तरी सुस्तावलेल्या संघटनेला अवघ्या पाच महिन्यांत त्या कितपत सक्रिय करू शकतील, हा प्रश्नच आहे.आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल संघटनात्मक निर्णयांमध्ये दोन्ही पक्षांपेक्षा सरस ठरले. सातही जागांच्या लोकसभा निरीक्षकपदी गतवर्षीच संभाव्य उमेदवारांची नियुक्ती त्यांनी केली. शिवाय स्वत: लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत दुसºया क्रमांकाची मते घेणाºया ‘आप’ने त्यानंतर अकरा महिन्यांत विधानसभेत भाजपाचा धुव्वा उडवला होता. बिहार, उत्तर प्रदेशमधून दिल्लीत रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात आलेल्या कष्टकरी मतदारांसाठी मेळावे, आरोग्य शिबिरे, कल्याणकारी योजनांचा थेट लाभ, अशी पूर्वतयारी ‘आप’ने आरंभली आहे. मात्र नायब राज्यपालांवरील आरोप-प्रत्यारोपांवरून वाढलेली सहानुभूती मतांमध्ये परावर्तित होईल की नाही याची शंका अरविंद केजरीवाल यांना आहे.भाजपाची मदार बिहारी मतदारांवर आहे. पूर्वांचलवासी मतदारांसाठी प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते व प्रदेशाध्यक्ष खासदार मनोज तिवारी अतोनात कष्ट घेत आहेत. ऐनवेळी या मतदारांना भेटण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचीही सभा घ्यावी लागेल, असा इशारा बैठकीत देऊन त्यांनी पक्षाध्यक्षांचीही नाराजी ओढवून घेतली होती.अमित शहांच्या कानउघडणीनंतर चुरा भोज, छट महोत्सव, लिट्टी चोखा महोत्सव, समरसता खिचडीचे प्रयत्न त्यांनी राबविले. मात्र सीलिंगची समस्या, सुरक्षा व्यवस्था केंद्राकडे असतानाही वाढणारी गुन्हेगारी, महिलांना वाटणारी असुरक्षितता यावर ठोस स्पष्टीकरण देण्यास प्रदेश भाजपाचे नेते अपयशी ठरले आहेत. लोकसभेत मोदीलाटेत ४६.४० टक्के मते मिळवून सातही जागा जिंकणाºया भाजपाचे विधानसभेत तीनच आमदार निवडून आले होते, याचेही भान पक्षाला राखावे लागेल.>मते कायम राखण्याचे ‘आप’समोरही आव्हान>32.9०%मते लोकसभा निवडणुकीत 'आप'ला मिळाली होती. दलित, मुस्लीम, नवमतदार, असंघटित कामगार व राज्य सरकारमधील नोकरदारांची ही मते कायम राखण्याचे मोठे आव्हान 'आप'समोर आहे. भाजपाचे खासदार व दलित नेते उदित राज यांनी अनेकदा स्वपक्षावर केलेल्या टीकेचाही वापर 'आप' प्रचारात करणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९