शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार; फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 20:46 IST

CM Uddhav Thackeray, AAP News: उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यातून राज्यातील प्रामुख्याने ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार असल्याचे वचन दिले होते.

अमरावती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी राज्यातील वीज ग्राहकांना ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या  ग्राहकांसाठी घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार, असे वचन दिले होते. त्याउलट आपत्तीच्याही परिस्थितीत वीजदर वाढवून जनतेची फसवणूक व विश्वासघात केला. त्यांच्यावर फसवणूक व अप्रामाणिकपणाचा गुन्हा नोंदवा, अशी तक्रार आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शहर हद्दीतील सात विविध पोलीस ठाण्यांत नोंदविली. 

मुख्यमंत्र्यावर भारतीय दंड संहिता कलम ४१५ (फसवणूक) आणि ४२० (अप्रामाणिकपणा बेईमानी) तसेच लोकप्रतिनिधी कायदा कलम १२३ (ब) भ्रष्ट व्यवहाराप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आपचे महानगर संयोजक संजय पांडव, जिल्हा सचिव रोशन अर्डक, सहसंयोजक प्रमोद कुचे, किशोर वानखडे, रंजना मामर्डे, प्रवीण काकड, वसंत पाटील, महेश देशमुख, अतुल वानखडे, सुरेश साहू, आशिष देशमुख, पंकज कुऱ्हेकर, संतोष रंगे यांनी   नोंदविली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यातून राज्यातील प्रामुख्याने ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार असल्याचे वचन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून जनतेने शिवसेनेच्या ५६ उमेदवारांना निवडून दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झालेत. मात्र, त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. त्यांच्या वचनाची प्रतही तक्रारकर्त्यांनी तक्रारीला जोडली होती.

चांदूर रेल्वेत मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रारशिवसेनेच्या वचननाम्यातील वीजेच्या मुद्यावर आम आदमी पक्ष आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करून ‘आप’च्यावतीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तक्रार देतेवेळी आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटन मंत्री  नितीन गवळी, गौतम जवंजाळ, विनोद लहाने, चरण जोल्हे, नीलेश कापसे, गोपाल मुरायते, हरिभाऊ जुनघरे, सागर गावंडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेelectricityवीजAAPआपShiv Senaशिवसेना