शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

‘हम दो, हमारे दो’ हेच मोदी यांचे सरकार; राहुल गांधी यांचा लोकसभेत घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 07:08 IST

तुम्ही आपल्या भाषणात फक्त केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दलच मते मांडा, अशी सूचना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना वारंवार केली. पण त्याकडे दुर्लक्ष करून राहुल गांधी यांनी नवे कृषी कायदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टीकेची झोड उठविली.

नवी दिल्ली : पूर्वी हम दो, हमारे दो असा नारा होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार हे ‘हम दो, हमारे दो‘चे सरकार आहे. ते कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत केली.तुम्ही आपल्या भाषणात फक्त केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दलच मते मांडा, अशी सूचना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना वारंवार केली. पण त्याकडे दुर्लक्ष करून राहुल गांधी यांनी नवे कृषी कायदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टीकेची झोड उठविली.राहुल गांधी यांच्या हम दो हमारे दो या उद्गारांवर केंद्रीय संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी आव्हान दिले की, राहुल गांधी यांनी उद्योगपती अदानी व अंबानी यांच्या संदर्भात हम दो, हमारे दो असा उल्लेख केला आहे. हे उद्योगपती व मोदी सरकारबद्दल केलेले आरोप सिद्ध होतील, असे पुरावेही राहुल गांधी यांनी सादर करावेत.राहुल गांधी म्हणाले की, नव्या कृषी कायद्यांमधील पहिला कायदा हा देशातील मंडईव्यवस्था उद्ध्वस्त करणारा आहे. शेतकऱ्यांकडून उद्योजक किंवा कंपन्या अमर्याद स्वरूपात शेतीमाल खरेदी करून त्याची हवा तितका काळ साठवणूक करू शकतील, अशी मुभा दुसऱ्या कृषी कायद्याद्वारे मिळाली आहे. शेतकऱ्यांना हक्काच्या गोष्टी कॉपोर्रेट कंपन्यांकडून मागण्यास तिसऱ्या कृषी कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला आहे.शेतकऱ्यांपुढे तीन पर्याय भूक, बेकारी, आत्महत्याराहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांपुढे भूक, बेकारी, आत्महत्या हे तीनच पर्याय शिल्लक ठेवले आहेत. नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी