शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Bihar Politics: जदयूचे १७ आमदार राजदच्या संपर्कात; नितीशकुमारांच्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 17:26 IST

Bihar Politics: गेल्या आठवड्यात बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अरुणाचल प्रदेशचे सहा आमदार भाजपाने फोडल्याने नितीशकुमार नाराज झाले आहेत. यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या आईच्या मृत्यूनंतरही त्यांची घरी जाऊन भेट घेणे टाळले होते.

पटना : बिहारची निवडणूक होऊन महिना लोटत नाही तोच राज्य सरकार पाडण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपाने अरुणाचलमध्ये नितीशकुमारांच्या जदयूचे सहा आमदार फोडल्याने नाराज असलेल्या नितीशकुमारांनी दोन दिवसांतच पक्षाचा अध्यक्ष बदलून भाजप आघाडीच्या जबाबदारीतून हात काढून घेतले आहेत. यातच मंगळवारी ''तेजस्वी सीएम, नितीश पीएम''ची ऑफर आली होती. यानंतर आज नितीशकुमारांची साथ सोडलेल्या राजदच्या नेत्याने जदयूचे 17 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

गेल्या आठवड्यात बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अरुणाचल प्रदेशचे सहा आमदार भाजपाने फोडल्याने नितीशकुमार नाराज झाले आहेत. यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या आईच्या मृत्यूनंतरही त्यांची घरी जाऊन भेट घेणे टाळले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षाच्या बैठकीत नितीशकुमारांनी त्यांच्या राजकीय वारसदाराची घोषणा केली होती. नितीश कुमार यांचे वारसदार हे त्यांच्याच पक्षाचे दिल्लीत बसणारे राज्यसभा खासदार रामचंद्र प्रसाद सिंह आहेत. पटनामध्ये जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु होती. तेव्हा अचानक नितीशकुमारांनी आरपीसी यांच्या नावाची घोषणा केल्याने बैठकीतही सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. नितीशकुमार य़ांनी आरपीसी यांना जदयूचा नवा अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला. याला सर्व सदस्यांनी होकार दिला.

यानंतर लगेचच आरपीसी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाने जे केले ते आघाडीधर्माला साजेसे केले नसल्याचे वक्तव्य केले होते. यानंतरच्या घडामोडींनी नितीशकुमार भाजपाशी फारकत घेणार असल्याचे चर्चिले जात आहे. यातच राजदने शड्डू ठोकायला सुरुवात केली आहे. नितीश यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री आणि राजदमध्ये प्रवेश केलेले नेते श्याम रजक यांनी 17 आमदार राजदच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हे आमदार भाजपाच्या वाढत्या वर्चस्वामुळे नाराज आहेत, असेही ते म्हणाले. यावर नितीशकुमार यांची लगेचच प्रतिक्रिया आली असून हा पोकळ दावा असल्याचे ते म्हणाले. 

किती आमदार हवेत?पक्षांतर बंदी कायद्यानुसार जदयूचे 25 ते 26 आमदार राजदला फोडावे लागणार आहेत. यामुळे रजत यांनी आणखी काही आमदार येत्या काळात राजदमध्ये येतील असा गौप्यस्फोट केला आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBiharबिहारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल