शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

Bihar Politics: जदयूचे १७ आमदार राजदच्या संपर्कात; नितीशकुमारांच्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 17:26 IST

Bihar Politics: गेल्या आठवड्यात बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अरुणाचल प्रदेशचे सहा आमदार भाजपाने फोडल्याने नितीशकुमार नाराज झाले आहेत. यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या आईच्या मृत्यूनंतरही त्यांची घरी जाऊन भेट घेणे टाळले होते.

पटना : बिहारची निवडणूक होऊन महिना लोटत नाही तोच राज्य सरकार पाडण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपाने अरुणाचलमध्ये नितीशकुमारांच्या जदयूचे सहा आमदार फोडल्याने नाराज असलेल्या नितीशकुमारांनी दोन दिवसांतच पक्षाचा अध्यक्ष बदलून भाजप आघाडीच्या जबाबदारीतून हात काढून घेतले आहेत. यातच मंगळवारी ''तेजस्वी सीएम, नितीश पीएम''ची ऑफर आली होती. यानंतर आज नितीशकुमारांची साथ सोडलेल्या राजदच्या नेत्याने जदयूचे 17 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

गेल्या आठवड्यात बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अरुणाचल प्रदेशचे सहा आमदार भाजपाने फोडल्याने नितीशकुमार नाराज झाले आहेत. यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या आईच्या मृत्यूनंतरही त्यांची घरी जाऊन भेट घेणे टाळले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षाच्या बैठकीत नितीशकुमारांनी त्यांच्या राजकीय वारसदाराची घोषणा केली होती. नितीश कुमार यांचे वारसदार हे त्यांच्याच पक्षाचे दिल्लीत बसणारे राज्यसभा खासदार रामचंद्र प्रसाद सिंह आहेत. पटनामध्ये जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु होती. तेव्हा अचानक नितीशकुमारांनी आरपीसी यांच्या नावाची घोषणा केल्याने बैठकीतही सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. नितीशकुमार य़ांनी आरपीसी यांना जदयूचा नवा अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला. याला सर्व सदस्यांनी होकार दिला.

यानंतर लगेचच आरपीसी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाने जे केले ते आघाडीधर्माला साजेसे केले नसल्याचे वक्तव्य केले होते. यानंतरच्या घडामोडींनी नितीशकुमार भाजपाशी फारकत घेणार असल्याचे चर्चिले जात आहे. यातच राजदने शड्डू ठोकायला सुरुवात केली आहे. नितीश यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री आणि राजदमध्ये प्रवेश केलेले नेते श्याम रजक यांनी 17 आमदार राजदच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हे आमदार भाजपाच्या वाढत्या वर्चस्वामुळे नाराज आहेत, असेही ते म्हणाले. यावर नितीशकुमार यांची लगेचच प्रतिक्रिया आली असून हा पोकळ दावा असल्याचे ते म्हणाले. 

किती आमदार हवेत?पक्षांतर बंदी कायद्यानुसार जदयूचे 25 ते 26 आमदार राजदला फोडावे लागणार आहेत. यामुळे रजत यांनी आणखी काही आमदार येत्या काळात राजदमध्ये येतील असा गौप्यस्फोट केला आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBiharबिहारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल