शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती

By admin | Updated: May 4, 2017 01:41 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे. अनेकवेळा

दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे. अनेकवेळा टँकरची मागणी करूनही टँकर सुरू होत नाही. येत्या दोन दिवसांत टँकर सुरू न झाल्यास खेड पंचायत समितीवर ‘हंडा मोर्चा’ काढण्याचा इशारा महिलांनी दिला आहे .पूर्व भागात आंबेगाव व खेड तालुक्याच्या सीमेवर चिंचबाईवाडी गाव आहे. या परिसरात दर वर्षी जानेवारी महिन्यात पाणीटंचाई निर्माण होते. महिलांना व लहान मुलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. या जलयुक्त शिवार अंतर्गत अनेक कामे झाली आहेत. मात्र, यांचा उन्हाळ्यात काही उपयोग होत नाही. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्या आहेत. रोज सकाळी सकाळी दोन १५ हंडे मिळतील एवढेच पाणी मिळत आहे. नंतर येणाऱ्यांना गाळमिश्रित पाणी मिळत आहे. तसेच महिलांना जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी काढावे लागत आहे. जनावरांना पाणी पिण्यास मिळत नाही. या परिसरात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे, यासाठी महिन्यापूर्वी टँकरचा प्रस्ताव खेड पंचायत समितीत गावाने दिला आहे. प्रस्ताव पाठविला आहे, तहसीलदार व गटविकास अधिकारी आम्ही पाहणी करण्यासाठी येऊ, अशी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे चिंचबाईवाडी माजी सरपंच संतोष गार्डी यांनी सांगितले. दोन दिवसांत या परिसरात टँकर सुरू न झाल्यास पंचायत समितीवर हंडा मोर्चा नेणार असल्याचे बबाबाई रणपिसे, भारती कोरडे, शांताबाई रणपिसे, शाकुबाई रणपिसे, प्रियंका रणपिसे यांच्यासह गावातील महिलांनी सांगितले. चिंचबाईवाडी येथे टँकर सुरू करावा, यासाठी दि.४ एप्रिल रोजी प्रस्ताव दिला आहे. त्यानंतर अनेक वेळा पाठपुरावा गटविकास अधिकारी यांच्याकडे केला आहे. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. आमच्या गावाला पाण्याचा टँकर आला नाही. गावामध्ये भीषण पाणीटंचाई निमार्ण झाली असून, ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहे. गाळ मिश्रित, गढूळ पाणी प्यायल्यामुळे लहान मुले आजारी पडत आहे. तसेच, पशुधन धोक्यात आले आहे. दोन दिवसांत पाण्याचा टँकर सुरू न झाल्यास गावातून खेड पंचायत समितीवर हंडा मोर्चा नेणार आहे.- संतोष गार्डी, माजी सरपंच, चिंचबाईवाडीराजुरी परिसरात विहिरी कोरड्याराजुरी : राजुरी परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी खालावली असून, पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे.राजुरी (ता. जुन्नर) परिसरातील उंचखडक आबाटेक या ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. या परिसरात असलेल्या विहिरी तसेच बोअरवेल आटल्या आहेत. सध्या कडक उन्हाळा चालू असल्याने याचा फटका विहिरीमध्ये असलेल्या पाण्याला बसला आहे. सध्या या परिसरात पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांसाठी असलेला चारादेखील पाण्याअभावी जळू लागला आहे. या ठिकाणाहून जात असलेल्या पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याला गेल्या महिन्यात पाणी सोडले होते. त्यामुळे या परिसरात असलेले बंधारे भरले होते. परंतु उन्हाळ्यामुळे बंधाऱ्यात असलेले पाणीदेखील आटले आहे. या परिसरात पाण्याचे टँकर सुरू करावे, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)