शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती

By admin | Updated: May 4, 2017 01:41 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे. अनेकवेळा

दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे. अनेकवेळा टँकरची मागणी करूनही टँकर सुरू होत नाही. येत्या दोन दिवसांत टँकर सुरू न झाल्यास खेड पंचायत समितीवर ‘हंडा मोर्चा’ काढण्याचा इशारा महिलांनी दिला आहे .पूर्व भागात आंबेगाव व खेड तालुक्याच्या सीमेवर चिंचबाईवाडी गाव आहे. या परिसरात दर वर्षी जानेवारी महिन्यात पाणीटंचाई निर्माण होते. महिलांना व लहान मुलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. या जलयुक्त शिवार अंतर्गत अनेक कामे झाली आहेत. मात्र, यांचा उन्हाळ्यात काही उपयोग होत नाही. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्या आहेत. रोज सकाळी सकाळी दोन १५ हंडे मिळतील एवढेच पाणी मिळत आहे. नंतर येणाऱ्यांना गाळमिश्रित पाणी मिळत आहे. तसेच महिलांना जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी काढावे लागत आहे. जनावरांना पाणी पिण्यास मिळत नाही. या परिसरात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे, यासाठी महिन्यापूर्वी टँकरचा प्रस्ताव खेड पंचायत समितीत गावाने दिला आहे. प्रस्ताव पाठविला आहे, तहसीलदार व गटविकास अधिकारी आम्ही पाहणी करण्यासाठी येऊ, अशी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे चिंचबाईवाडी माजी सरपंच संतोष गार्डी यांनी सांगितले. दोन दिवसांत या परिसरात टँकर सुरू न झाल्यास पंचायत समितीवर हंडा मोर्चा नेणार असल्याचे बबाबाई रणपिसे, भारती कोरडे, शांताबाई रणपिसे, शाकुबाई रणपिसे, प्रियंका रणपिसे यांच्यासह गावातील महिलांनी सांगितले. चिंचबाईवाडी येथे टँकर सुरू करावा, यासाठी दि.४ एप्रिल रोजी प्रस्ताव दिला आहे. त्यानंतर अनेक वेळा पाठपुरावा गटविकास अधिकारी यांच्याकडे केला आहे. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. आमच्या गावाला पाण्याचा टँकर आला नाही. गावामध्ये भीषण पाणीटंचाई निमार्ण झाली असून, ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहे. गाळ मिश्रित, गढूळ पाणी प्यायल्यामुळे लहान मुले आजारी पडत आहे. तसेच, पशुधन धोक्यात आले आहे. दोन दिवसांत पाण्याचा टँकर सुरू न झाल्यास गावातून खेड पंचायत समितीवर हंडा मोर्चा नेणार आहे.- संतोष गार्डी, माजी सरपंच, चिंचबाईवाडीराजुरी परिसरात विहिरी कोरड्याराजुरी : राजुरी परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी खालावली असून, पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे.राजुरी (ता. जुन्नर) परिसरातील उंचखडक आबाटेक या ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. या परिसरात असलेल्या विहिरी तसेच बोअरवेल आटल्या आहेत. सध्या कडक उन्हाळा चालू असल्याने याचा फटका विहिरीमध्ये असलेल्या पाण्याला बसला आहे. सध्या या परिसरात पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांसाठी असलेला चारादेखील पाण्याअभावी जळू लागला आहे. या ठिकाणाहून जात असलेल्या पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याला गेल्या महिन्यात पाणी सोडले होते. त्यामुळे या परिसरात असलेले बंधारे भरले होते. परंतु उन्हाळ्यामुळे बंधाऱ्यात असलेले पाणीदेखील आटले आहे. या परिसरात पाण्याचे टँकर सुरू करावे, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)