शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

स्थायी समितीची सभा वेळेवरच होणार? नदीसुधारला गती द्या, स्थायीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 23:59 IST

महापालिका स्थायी समितीची सभा आज झाली.  पिंपरी चिंचवड शहराकरीता भामा आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर पाणी पुन्हा आरक्षित करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.

पिंपरी :  महापालिकेच्या वतीने नदीसुधार प्रकल्पाला गती द्यावी, अशा सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांनी प्रशासनास दिल्या आहेत. स्थायी समितीची सभा वेळेनुसारच होईल, याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश द्या, अशीही सूचना केली. (Will the Standing Committee meet on time? Accelerate river improvement, order of standing Committee)

महापालिका स्थायी समितीची सभा आज झाली.  पिंपरी चिंचवड शहराकरीता भामा आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर पाणी पुन्हा आरक्षित करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. या बिगर सिंचन पाणी आरक्षणापोटी सिंचन पुनर्स्थापनाचा खर्च शासनाकडे भरावा लागणार आहे. या खर्चाचा पहिला हप्ता ३५ कोटी ५५ लाख पुणे पाटबंधारे विभागास अदा केला जाणार आहे. तर आंद्रा धरणातून ३६.८७ दशलक्ष घनमीटर पाण्याचा पुनर्स्थापना खर्चाचा तिसरा हप्ता २० कोटी १६ लाख पुणे पाटबंधारे विभागास दिला जाणार आहे. याबाबतचा विषय मंजूर करण्यात आला.

महापालिकेतील स्थायी समिती सभेची वेळही विषय पत्रिकेवर असते त्यानुसार ती सुरू होत नाही, कधी अधिकारी वेळेवर येत नाहीत, तर कधी सदस्य त्यामुळे सभा वेळत होत नाही, अ‍ॅड लांडगे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी प्रशासनास सभा वेळेवर घेण्याचे निर्देश दिले. यापुढे वेळेतच सभा होईल, असे सांगण्यात आले.  

भामा आसखेडचे पाणी लवकर आणल्यास पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच महापालिकेच्या वतीने नदीसुधारचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे स्थायी समिती अध्यक्ष अ‍ॅड नितीन लांडगे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे