शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

परदेशी साहित्य वाचले म्हणजे विद्वान का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 4:44 AM

ल. म. कडू : मराठीतील सर्वोत्तम साहित्याचा वाचनानंद घ्यावा...

आपल्याकडे एखाद्या वक्त्याने त्याच्या भाषणात दोन-चार इंग्रजी पुस्तकांचा उल्लेख केला की श्रोता कमालीचा सुखावतो. आता त्या वक्त्याने परदेशी साहित्य वाचलं म्हणजे तो विद्वान झाला का? हा प्रश्न आपण कधी स्वत:ला विचारत नाही. सध्या काय वाचताय असं सहजच कुणाला विचारलं अन् त्याने मी अमूक अशा लेखकाची इंग्रजी कादंबरी वाचतो आहे असे सांगितल्यास आपल्याला त्या व्यक्तीबद्दल कुतूहल वाटते. मुद्दा इंग्रजी वाचनाचा मुळीच नाही. ते वाचन तर हवेच मात्र ते करत असताना आपल्या साहित्याकडे दुर्लक्ष व्हायला नको.दिवसेंदिवस वाचनाचा बेगडीपणा वाढत चालला आहे. मुळात आपल्याकडे वाचन हा एकप्रकारचा वाचनसंस्कार असतो हे कुणी लक्षात घ्यायला तयार नाही. ज्याप्रमाणे मुंजीचा संस्कार आहे तसा वाचनाचा संस्कार का असू नये, हा प्रश्न पडतो. वाचनाचे प्रमाण आजकाल कमी होत चालले आहे हे काही अंशी खरे आहे. तरुण वाचतो आहे ही समाधानकारक बाब म्हणावी लागेल. आपण ज्यापद्धतीने सणवार साजरे करतो, एखाद्याला मंगलप्रसंगी काही भेटवस्तू देतो त्याप्रमाणे पुस्तके भेट देण्यास प्राधान्यक्रम द्यायला हवे. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न व्हायला हवेत. नाहीतर वाचनाबद्दलचे सुविचार, केवळ भाषणापुरतेच मर्यादित राहतील.लोकांपर्यंत पुस्तक पोहोचण्याकरिता वाचक, प्रकाशक म्हणून आपली भूमिका काय, याचा आपण विचार केल्यास वाचनाप्रति अधिक सजगता वाढण्यास मदत होईल. वाचनाबद्दलची जागरूकता वाढण्याकरिता काही उपाय सुचवावेसे वाटतात. खेळण्याच्या वयात मुलांच्या हातात पुस्तके पडल्यास पुढे त्यांना पुस्तके वाचा असे दरवेळी सांगण्याची गरज पडत नाही. मात्र आपल्याकडे याबाबत चित्र उलटे पाहायला मिळते. याकरिता केवळ त्या लहान मुलांना दोष देण्यापेक्षा पालक म्हणून आपण काही करणार आहोत की नाही? हा मुख्य प्रश्न आहे. कुमारवयात सक्तीने म्हणा किंवा शिस्तीने त्या मुलांना वाचण्यास प्रवृत्त केले जाते. परंतु त्यांना वाचनाची गोडी लागत तर नाहीच, दुसरीकडे त्यांच्या मनात वाचनाबद्दल कमालीची नकारात्मकता वाढीस लागते. म्हणूनच लहानपणापासूनच पालकांनी जाणीवपूर्वक वाचनसंस्कारासाठी प्रयत्न केल्यास वाचन हा सवयीचा भाग होऊन जाईल. तो आनंदाचा प्रवास असेल. त्यातूनच उद्याची वाचकाची पिढी तयार होईल. आता झाले असे, की आपण सगळे जण कमालीचे उपयुक्ततावादी झालो आहोत. प्रत्येक गोष्टीत स्वत:करिता महत्त्वाचे काय आहे, याचा विचार प्रथम करतो. कला हे माध्यम आपल्याला आनंदीपणाने जगण्यासाठी आधार देते. आत्मविश्वासाने जगण्याकरिता कला उपयोगी पडते. आता आपण त्याकडे उपयुक्ततावाद म्हणून पाहायला लागल्याने त्याचे महत्त्व कमी झाले आहे. याबद्द्ल सांगायचे झाल्यास, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे ना, मग फक्त त्यासंदर्भात पुस्तके वाचावीत. बाकी वाचून काय उपयोग? ललित वाङ्मय यात काय आहे? हीच बाब शाळेतील अभ्यासक्रमाबाबत सांगता येईल.शाळेत ग्रंथालयाचा विद्यार्थी घेत असलेला लाभ याबाबत अभ्यास व्हायला हवा. अभ्यासक्रमाच्या बाहेरचे काही वाचायचे नाही. मग गाईडसंस्कृती आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर वाढली. इतका कमालीचा उपयुक्ततावाद आपल्यात भिनत चालला आहे. मराठी साहित्यात सुंदर ग्रंथ आहेत. त्याचा आस्वाद घ्यावा, त्याचे वाचन करावे, भाषेविषयी कुठली असूया नाही. इथे इंग्रजी आणि मराठी वाददेखील नाही. जागतिक समग्रता आणि भान येण्यासाठी ते वाचन महत्त्वाचे ठरते. मात्र त्याबरोबर आपल्या साहित्यातील श्रेष्ठत्व समजून घेणे गरजेचे आहे. केवळ परदेशी कथा, कादंंबऱ्या चांगल्या आणि आपल्या भाषेतील साहित्य निरस ठरवणे चुकीचे आहे. आपल्या साहित्यात समृद्धता आहे. त्यासाठी आपण वेळ काढून ते साहित्य वाचण्याचे कष्ट घ्यायला तयार आहोत का? हा प्रश्न आहे. आपल्या भाषेतील वाचनसंस्कृती वाढण्यासाठी वाचक म्हणून आपण काय भूमिका घेणार, याचा विचार वाचकाने करावा.

टॅग्स :world book dayजागतिक पुस्तक दिन