शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

सणासुदीच्या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांची वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 01:38 IST

पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्यामुळे होळी या सणाच्या दिवशीच महानगरपालिका परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

पिंपरी : पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्यामुळे होळी या सणाच्या दिवशीच महानगरपालिका परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. होळी सणाच्या दिवशीच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. सणाचा दिवस पाण्याच्या प्रतीक्षेत व शोधात गेला.पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. धरणातून नदीत पाणी सोडले जाते. त्यानंतर रावेत येथील बंधाऱ्यातून जलउपसा केला जातो. येथे महापालिकेच्या वतीने जलउपसा केंद्र उभारले आहे. पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला. परिणामी रावेत येथील बंधाऱ्याची पाण्याची पातळी कमी झाली. धरणातून बंधाºयात येणारे पाणी कमी झाल्याने जलउपसा केंद्रातील काही पंप बंद करावे लागले. त्यामुळे शहरातील विविध भागांतील पाण्याच्या टाक्या भरू शकल्या नाही. परिणामी मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. चिंचवड, आकुर्डी, रावेत, वाल्हेकरवाडी परिसरात सायंकाळी सहाला येणारे पाणी रात्री अकरानंतर सोडण्यात आले होते. तर होळीच्या दिवशीही शहर परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन दिवसांचा कालखंड लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले आहे.कमी वेळ पाणी सोडल्याचा परिणामविद्युत निर्मिती करणाºया यंत्रणेत बिघाड झाल्याने दररोज सुमारे सहा ते सात तास पाणी सोडण्यात येते. ते पाणी दोन ते तीन तास सोडण्यात आले. परिणामी रावेत बंधाºयातील पाणीपातळी कमी झाली. धरणातून कमी वेळ पाणी सोडल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. बुधवारी शहराच्या विविध भागांत होणारा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला होता. परिणामी नागरिकांना सणाच्या दिवशीच पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली. सणाच्या दिवशीच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्याने रावेत बंधाºयातील पाणीपातळी कमी झाली होती. त्यामुळे जलउपसा करणारे पंप बंद करावे लागले. त्यामुळे मंगळवारी पाणीपुरवठा विस्कळीत होता. तसेच बुधवारीही याचा परिणाम जाणवला. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे.- रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड