शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

सणासुदीच्या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांची वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 01:38 IST

पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्यामुळे होळी या सणाच्या दिवशीच महानगरपालिका परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

पिंपरी : पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्यामुळे होळी या सणाच्या दिवशीच महानगरपालिका परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. होळी सणाच्या दिवशीच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. सणाचा दिवस पाण्याच्या प्रतीक्षेत व शोधात गेला.पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. धरणातून नदीत पाणी सोडले जाते. त्यानंतर रावेत येथील बंधाऱ्यातून जलउपसा केला जातो. येथे महापालिकेच्या वतीने जलउपसा केंद्र उभारले आहे. पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला. परिणामी रावेत येथील बंधाऱ्याची पाण्याची पातळी कमी झाली. धरणातून बंधाºयात येणारे पाणी कमी झाल्याने जलउपसा केंद्रातील काही पंप बंद करावे लागले. त्यामुळे शहरातील विविध भागांतील पाण्याच्या टाक्या भरू शकल्या नाही. परिणामी मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. चिंचवड, आकुर्डी, रावेत, वाल्हेकरवाडी परिसरात सायंकाळी सहाला येणारे पाणी रात्री अकरानंतर सोडण्यात आले होते. तर होळीच्या दिवशीही शहर परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन दिवसांचा कालखंड लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले आहे.कमी वेळ पाणी सोडल्याचा परिणामविद्युत निर्मिती करणाºया यंत्रणेत बिघाड झाल्याने दररोज सुमारे सहा ते सात तास पाणी सोडण्यात येते. ते पाणी दोन ते तीन तास सोडण्यात आले. परिणामी रावेत बंधाºयातील पाणीपातळी कमी झाली. धरणातून कमी वेळ पाणी सोडल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. बुधवारी शहराच्या विविध भागांत होणारा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला होता. परिणामी नागरिकांना सणाच्या दिवशीच पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली. सणाच्या दिवशीच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्याने रावेत बंधाºयातील पाणीपातळी कमी झाली होती. त्यामुळे जलउपसा करणारे पंप बंद करावे लागले. त्यामुळे मंगळवारी पाणीपुरवठा विस्कळीत होता. तसेच बुधवारीही याचा परिणाम जाणवला. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे.- रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड