शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सणासुदीच्या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांची वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 01:38 IST

पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्यामुळे होळी या सणाच्या दिवशीच महानगरपालिका परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

पिंपरी : पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्यामुळे होळी या सणाच्या दिवशीच महानगरपालिका परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. होळी सणाच्या दिवशीच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. सणाचा दिवस पाण्याच्या प्रतीक्षेत व शोधात गेला.पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. धरणातून नदीत पाणी सोडले जाते. त्यानंतर रावेत येथील बंधाऱ्यातून जलउपसा केला जातो. येथे महापालिकेच्या वतीने जलउपसा केंद्र उभारले आहे. पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला. परिणामी रावेत येथील बंधाऱ्याची पाण्याची पातळी कमी झाली. धरणातून बंधाºयात येणारे पाणी कमी झाल्याने जलउपसा केंद्रातील काही पंप बंद करावे लागले. त्यामुळे शहरातील विविध भागांतील पाण्याच्या टाक्या भरू शकल्या नाही. परिणामी मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. चिंचवड, आकुर्डी, रावेत, वाल्हेकरवाडी परिसरात सायंकाळी सहाला येणारे पाणी रात्री अकरानंतर सोडण्यात आले होते. तर होळीच्या दिवशीही शहर परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन दिवसांचा कालखंड लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले आहे.कमी वेळ पाणी सोडल्याचा परिणामविद्युत निर्मिती करणाºया यंत्रणेत बिघाड झाल्याने दररोज सुमारे सहा ते सात तास पाणी सोडण्यात येते. ते पाणी दोन ते तीन तास सोडण्यात आले. परिणामी रावेत बंधाºयातील पाणीपातळी कमी झाली. धरणातून कमी वेळ पाणी सोडल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. बुधवारी शहराच्या विविध भागांत होणारा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला होता. परिणामी नागरिकांना सणाच्या दिवशीच पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली. सणाच्या दिवशीच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्याने रावेत बंधाºयातील पाणीपातळी कमी झाली होती. त्यामुळे जलउपसा करणारे पंप बंद करावे लागले. त्यामुळे मंगळवारी पाणीपुरवठा विस्कळीत होता. तसेच बुधवारीही याचा परिणाम जाणवला. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे.- रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड