शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
3
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
4
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
5
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
6
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
7
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
8
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
9
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
10
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
11
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
12
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
13
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
14
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
15
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
16
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
17
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
18
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
19
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
20
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार

पिंपरीत अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळेच पाणीटंचाई : सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचा हल्लाबोल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 18:58 IST

मागील काही महिन्यांपासून महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य व भोंगळ कारभारामुळे शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देशहरातील करदात्या नागरिकांना समान, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे हे कर्तव्य

पिंपरी : पाणीटंचाईप्रश्नी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेवर हल्लाबोल केले आहे. शहरात प्रशासनाकडूनच कृत्रिम पाणीटंचाई असल्याने अकार्यक्षम,कामचुकार अधिकारी व ठेकेदारांमुळे पाणी नियोजन कोलमडले. पाणी समस्येला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नगरसवेक उत्तम केंदळे यांनी केला आहे.महापालिकेचे शहरातील करदात्या नागरिकांना समान, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे हे कर्तव्य आहे. मागील काही महिन्यांपासून महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य व भोंगळ कारभारामुळे शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाले आहे. पवना धरण क्षेत्रात मुबलक पाणीसाठा असतानादेखील अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. शहरात नागरिकांना समान पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक सल्लागार महापालिकेने आतापर्यंत नेमले. स्काडा आणि चोवीस पाणीपुरवठा योजना राबविली. दरवर्षी पाणीपुरवठा करण्यासाठी करोडो रुपये महापालिका तिजोरीतून खर्ची पडत आहेत. नगरसेवक केंदळे म्हणाले, शहरवासीयांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. यावरून महानगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करत आहे. पुढे विधानसभा निवडणूक असल्याने अकार्यक्षम, कामचुकार अधिकारी व ठेकेदार संगनमताने पाणीपुरवठा नियोजनात गोंधळ घालतात. वेळच्या वेळी दुरुस्ती कामे करत नाही आणि त्यामुळे अशा समस्याना तोंड द्यावे लागते़ आता सणासुदीचे दिवस सुरू झालेले असताना नागरिकांना या प्रकारे पाण्यासाठी वेठीस धरण्याचा सगळा उद्योग सुरू आहे.

ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे संगनमत पाणीपुरवठा नियोजनाच्या नावाखाली दरवर्षी करोडो रुपये खर्च केले जातात. कामे काढली जातात. मग ही कामे कोणासाठी काढली जातात व कुठे जातात अधिकारी आणि ठेकेदार संगंमताने कामामध्ये गोंधळ घालतात. केवळ लोकसंख्या वाढ आणि तांत्रिक कारणे सांगून प्रशासन दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी नकार देत आहे.  नियोजनाअभावी आता पुन्हा महानगरपालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व बाबींवरून पाणीपुरवठा नियोजनात ज्या पद्धतीने घोळ घातला जात आहे. त्याच पद्धतीने पाणीपुरवठा विभागाच्या कारभारातही आहे. त्यामुळे आयुक्तांनी लक्ष्य घालून पाणीपुरवठा विभागातील सर्व अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार यांची चौकशी करावी. स्मार्ट सिटीमध्ये समावेश असणारी महानगरपालिका नागरिकांची मूलभूत गरज भागवू शकत नाही तर आयुक्तांनी बाकीच्या प्रकल्पांऐवजी पाणी पुरवठ्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यामध्ये दोषी व कामचुकार आढळून येणाºयांवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी केंदळे यांनी केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीshravan hardikarश्रावण हर्डिकर