शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे पाणी टंचाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 13:01 IST

आयुक्तांचा प्रशासनावर वचक नाही आणि सत्ताधारी म्हणून आम्ही आयुक्तांवर वचक निर्माण करण्यात कमी पडत आहोत...

ठळक मुद्देमहापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा : सत्ताधारी सदस्यांचा सभात्याग चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सदस्यांनी निष्क्रिय प्रशासनामुळे पाणी टंचाई

पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पाणी पश्नावरून वादळी चर्चा झाली. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सदस्यांनी निष्क्रिय प्रशासनामुळे पाणी टंचाई होत आहे. पाणीटंचाईला प्रशासनच जबाबदार आहे, असल्याचे जाहिरपणे सांगितले. पाणीपुरठा विभागावर आयुक्तांचा वचक कमी झाला आहे. आणि आमचाही प्रशासनावरील वचक कमी झाला आहे, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. आयुक्तांचा प्रशासनावर वचक नाही आणि सत्ताधारी म्हणून आम्ही आयुक्तांवर वचक निर्माण करण्यात कमी पडत आहोत. आयुक्त मलई मिळणारी कामे करण्यात दंग आहेत. त्यांना जनतेच्या हिताच्या कामाचे काही देणेघेणे नाही, असे सांगून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी हतबलता प्रकट करून सभात्याग केला. महापालिकेच्या स्थायी समितीची तहकूब साप्ताहिक सभा आज झाली. स्थायी समितीत पाणी प्रश्न पेटला होता. सुरुवातीला चिंचवड विधानसभा मतदार संघातील नगरसेवक सागर आंगोळकर यांनी पाणी टंचाईवर प्रकाश टाकला. भोसरी विधानसभेतील नगरसेवक विकास डोळस हेही आक्रमक झाले. आंगोळकर म्हणाले, विस्कळीत पाणीपुरवठा, विकास कामे केली जात नाही. सत्ताधारी पक्षात असूनही कामे होत नाहीत. पाणीपुरवठ्यावर आवाज उठविल्यास केवळ चार दिवस पाणी सुरळीत होते. चार दिवसानंतर जैसे थे परिस्थिती असते. आमदार वास्तव्यास आहेत, त्याच परिसरात पाणी पुरवठा होत नसेल तर पिंपळेगुरव परिसरात पाण्याची मोठी टंचाई आहे. तसेच या परिसरात विकास कामे देखील केली जात नाहीत. प्रभागात विकासकामांना ब्रेक लावला जात आहे. प्रशासन आम्हाला चालविता येत नाही. भाजपला बदनाम करण्याची आयुक्तांनी सुपारी घेतली की काय? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.डोळस म्हणाले, ह्यह्यदिघी-बोपखेल परिसरात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. चार दिवस पाणी येते, चार दिवस पाणी येत नाही. त्यामुळे दिघी, बोपखेलकर हैराण झाले आहेत.  निवडून आल्यापासून पाणीपुरवठ्याबाबत सातत्याने आवाज उठवित आहे. तरीदेखील प्रशासन त्याकडे गांभीयार्ने पाहत नाही. केवळ पाण्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगितले जाते. पंरतु, प्रत्यक्षात कारवाई शून्य आहे. निष्क्रिीय अधिकाºयांवरही कारवाई व्हायला हवी.प्रशासन मलईदार कामांत व्यस्त सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांची कामे होत नसल्याबद्दल भाजपा सदस्य डोळस यांनी आयुक्तांवर टीका केली. ते म्हणाले, प्रशासन मलईदार कामे करण्यात दंग आहे. त्यांना जनतेशी निगडीत कामाचे काही देणे घेणे राहिले नाही. आयुक्तांचा प्रशासनावर कसलाही वचक नाही. सत्ताधारी म्हणून आम्ही त्यांच्यावर वचक निर्माण करण्यात कमी पडत आहोत. प्रशासनात सगळा सावळा गोंधळ सुरु असून बजबजपुरी माजली आहे. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. आयुक्तांच्या निष्क्रियतेमुळेच शहरात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास अधिका-याला घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. डोळस आणि आंगोळकर यांनी प्रशासनावर टीका करून सभात्याग केला. त्यानंतर सभा गुंडाळण्यात आली. प्रशासनाच्या वतीने सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रश्नावर कोणताही खुलासा केला नाही.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीcollectorजिल्हाधिकारी