शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पिंपरीत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे पाणी टंचाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 13:01 IST

आयुक्तांचा प्रशासनावर वचक नाही आणि सत्ताधारी म्हणून आम्ही आयुक्तांवर वचक निर्माण करण्यात कमी पडत आहोत...

ठळक मुद्देमहापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा : सत्ताधारी सदस्यांचा सभात्याग चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सदस्यांनी निष्क्रिय प्रशासनामुळे पाणी टंचाई

पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पाणी पश्नावरून वादळी चर्चा झाली. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सदस्यांनी निष्क्रिय प्रशासनामुळे पाणी टंचाई होत आहे. पाणीटंचाईला प्रशासनच जबाबदार आहे, असल्याचे जाहिरपणे सांगितले. पाणीपुरठा विभागावर आयुक्तांचा वचक कमी झाला आहे. आणि आमचाही प्रशासनावरील वचक कमी झाला आहे, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. आयुक्तांचा प्रशासनावर वचक नाही आणि सत्ताधारी म्हणून आम्ही आयुक्तांवर वचक निर्माण करण्यात कमी पडत आहोत. आयुक्त मलई मिळणारी कामे करण्यात दंग आहेत. त्यांना जनतेच्या हिताच्या कामाचे काही देणेघेणे नाही, असे सांगून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी हतबलता प्रकट करून सभात्याग केला. महापालिकेच्या स्थायी समितीची तहकूब साप्ताहिक सभा आज झाली. स्थायी समितीत पाणी प्रश्न पेटला होता. सुरुवातीला चिंचवड विधानसभा मतदार संघातील नगरसेवक सागर आंगोळकर यांनी पाणी टंचाईवर प्रकाश टाकला. भोसरी विधानसभेतील नगरसेवक विकास डोळस हेही आक्रमक झाले. आंगोळकर म्हणाले, विस्कळीत पाणीपुरवठा, विकास कामे केली जात नाही. सत्ताधारी पक्षात असूनही कामे होत नाहीत. पाणीपुरवठ्यावर आवाज उठविल्यास केवळ चार दिवस पाणी सुरळीत होते. चार दिवसानंतर जैसे थे परिस्थिती असते. आमदार वास्तव्यास आहेत, त्याच परिसरात पाणी पुरवठा होत नसेल तर पिंपळेगुरव परिसरात पाण्याची मोठी टंचाई आहे. तसेच या परिसरात विकास कामे देखील केली जात नाहीत. प्रभागात विकासकामांना ब्रेक लावला जात आहे. प्रशासन आम्हाला चालविता येत नाही. भाजपला बदनाम करण्याची आयुक्तांनी सुपारी घेतली की काय? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.डोळस म्हणाले, ह्यह्यदिघी-बोपखेल परिसरात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. चार दिवस पाणी येते, चार दिवस पाणी येत नाही. त्यामुळे दिघी, बोपखेलकर हैराण झाले आहेत.  निवडून आल्यापासून पाणीपुरवठ्याबाबत सातत्याने आवाज उठवित आहे. तरीदेखील प्रशासन त्याकडे गांभीयार्ने पाहत नाही. केवळ पाण्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगितले जाते. पंरतु, प्रत्यक्षात कारवाई शून्य आहे. निष्क्रिीय अधिकाºयांवरही कारवाई व्हायला हवी.प्रशासन मलईदार कामांत व्यस्त सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांची कामे होत नसल्याबद्दल भाजपा सदस्य डोळस यांनी आयुक्तांवर टीका केली. ते म्हणाले, प्रशासन मलईदार कामे करण्यात दंग आहे. त्यांना जनतेशी निगडीत कामाचे काही देणे घेणे राहिले नाही. आयुक्तांचा प्रशासनावर कसलाही वचक नाही. सत्ताधारी म्हणून आम्ही त्यांच्यावर वचक निर्माण करण्यात कमी पडत आहोत. प्रशासनात सगळा सावळा गोंधळ सुरु असून बजबजपुरी माजली आहे. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. आयुक्तांच्या निष्क्रियतेमुळेच शहरात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास अधिका-याला घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. डोळस आणि आंगोळकर यांनी प्रशासनावर टीका करून सभात्याग केला. त्यानंतर सभा गुंडाळण्यात आली. प्रशासनाच्या वतीने सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रश्नावर कोणताही खुलासा केला नाही.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीcollectorजिल्हाधिकारी