शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पिंपरीत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे पाणी टंचाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 13:01 IST

आयुक्तांचा प्रशासनावर वचक नाही आणि सत्ताधारी म्हणून आम्ही आयुक्तांवर वचक निर्माण करण्यात कमी पडत आहोत...

ठळक मुद्देमहापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा : सत्ताधारी सदस्यांचा सभात्याग चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सदस्यांनी निष्क्रिय प्रशासनामुळे पाणी टंचाई

पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पाणी पश्नावरून वादळी चर्चा झाली. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सदस्यांनी निष्क्रिय प्रशासनामुळे पाणी टंचाई होत आहे. पाणीटंचाईला प्रशासनच जबाबदार आहे, असल्याचे जाहिरपणे सांगितले. पाणीपुरठा विभागावर आयुक्तांचा वचक कमी झाला आहे. आणि आमचाही प्रशासनावरील वचक कमी झाला आहे, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. आयुक्तांचा प्रशासनावर वचक नाही आणि सत्ताधारी म्हणून आम्ही आयुक्तांवर वचक निर्माण करण्यात कमी पडत आहोत. आयुक्त मलई मिळणारी कामे करण्यात दंग आहेत. त्यांना जनतेच्या हिताच्या कामाचे काही देणेघेणे नाही, असे सांगून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी हतबलता प्रकट करून सभात्याग केला. महापालिकेच्या स्थायी समितीची तहकूब साप्ताहिक सभा आज झाली. स्थायी समितीत पाणी प्रश्न पेटला होता. सुरुवातीला चिंचवड विधानसभा मतदार संघातील नगरसेवक सागर आंगोळकर यांनी पाणी टंचाईवर प्रकाश टाकला. भोसरी विधानसभेतील नगरसेवक विकास डोळस हेही आक्रमक झाले. आंगोळकर म्हणाले, विस्कळीत पाणीपुरवठा, विकास कामे केली जात नाही. सत्ताधारी पक्षात असूनही कामे होत नाहीत. पाणीपुरवठ्यावर आवाज उठविल्यास केवळ चार दिवस पाणी सुरळीत होते. चार दिवसानंतर जैसे थे परिस्थिती असते. आमदार वास्तव्यास आहेत, त्याच परिसरात पाणी पुरवठा होत नसेल तर पिंपळेगुरव परिसरात पाण्याची मोठी टंचाई आहे. तसेच या परिसरात विकास कामे देखील केली जात नाहीत. प्रभागात विकासकामांना ब्रेक लावला जात आहे. प्रशासन आम्हाला चालविता येत नाही. भाजपला बदनाम करण्याची आयुक्तांनी सुपारी घेतली की काय? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.डोळस म्हणाले, ह्यह्यदिघी-बोपखेल परिसरात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. चार दिवस पाणी येते, चार दिवस पाणी येत नाही. त्यामुळे दिघी, बोपखेलकर हैराण झाले आहेत.  निवडून आल्यापासून पाणीपुरवठ्याबाबत सातत्याने आवाज उठवित आहे. तरीदेखील प्रशासन त्याकडे गांभीयार्ने पाहत नाही. केवळ पाण्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगितले जाते. पंरतु, प्रत्यक्षात कारवाई शून्य आहे. निष्क्रिीय अधिकाºयांवरही कारवाई व्हायला हवी.प्रशासन मलईदार कामांत व्यस्त सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांची कामे होत नसल्याबद्दल भाजपा सदस्य डोळस यांनी आयुक्तांवर टीका केली. ते म्हणाले, प्रशासन मलईदार कामे करण्यात दंग आहे. त्यांना जनतेशी निगडीत कामाचे काही देणे घेणे राहिले नाही. आयुक्तांचा प्रशासनावर कसलाही वचक नाही. सत्ताधारी म्हणून आम्ही त्यांच्यावर वचक निर्माण करण्यात कमी पडत आहोत. प्रशासनात सगळा सावळा गोंधळ सुरु असून बजबजपुरी माजली आहे. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. आयुक्तांच्या निष्क्रियतेमुळेच शहरात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास अधिका-याला घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. डोळस आणि आंगोळकर यांनी प्रशासनावर टीका करून सभात्याग केला. त्यानंतर सभा गुंडाळण्यात आली. प्रशासनाच्या वतीने सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रश्नावर कोणताही खुलासा केला नाही.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीcollectorजिल्हाधिकारी