शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

चऱ्होलीला पाणीटंचाईच्या झळा; वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 03:16 IST

टँकरसाठी पाणी येते कोठून, सर्वसामान्यांचा प्रश्न

भोसरी : परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी कपातीचे ढग दाटले आहेत. याबाबतचा निर्णय महापालिका स्तरावर होणार असतानाच चºहोलीसह लगतच्या वाड्या-वस्त्यांमध्ये आत्तापासूनच तीव्र पाणी टंचाई सुरु झाली आहे. येथील सोसायट्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नळाला पाणी नसताना टँकरसाठी पाणी येते कोठून, असा सवाल चºहोलीकर करीत आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या चºहोलीने विकासाच्या बाबतीत गेली अनेक वर्षे वनवास भोगला आहे. हा वनवास दूर करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने नितीन काळजे यांना पहिले महापौरपद दिले. त्यांनी चºहोलीच्या विकासासाठी चांगला निधी मिळविण्यात यश मिळवले असले, तरी चºहोलीचा पाणीप्रश्न सोडविण्यात त्यांनाही अपयश आल्याचे वास्तव आहे. चºहोलीसह लगतच्या वाड्या-वस्त्यांवर गणेशोत्सवापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तर काही ठिकाणी टॅँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे. प्रतिमाणसी १३५ लिटर पाण्याऐवजी १५० लिटर पाणी दिले जात असल्याचा दावा पिंपरी-चिंचवड महापालिका करत असली, तरी चºहोलीतील काही भागात हंडाभर पाणी मिळत नाही.चºहोली परिसरात बांधकामे जोरात आहेत. या प्रकल्पांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. सुमारे अडीच ते तीन हजार रुपये दर आकारून बांधकामांना टँकरद्वारे पाणी मिळते. तर खासगी सोसायट्यांमध्ये पाणी पुरवण्यासाठी दोन हजार रुपये आकारले जात आहेत. नद्या, विहिरींमधून टँकरमध्ये पाणी उचलून काळाबाजार करणाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. पाणीटंचाईचा येथील काही राजकीय लोकांनी फायदा घेतला आहे. टँकरने पाणी पुरवल्याचे श्रेय घेणारे राजकीय पुढारी चºहोलीला पुरेसे पाणी मिळवून देण्यात मागे पडल्याचे वास्तव आहे.उन्हाळ्यात भीषणता वाढण्याची भीतीचºहोली गावठाणासह वडमुखवाडी, चोविसावाडी, काळजेवस्ती, पठारेमळा, ताजणेवस्ती, बुर्डेवस्ती, दाभाडे वस्ती, साईनगर, जगताप वस्ती, काटे वस्ती या भागात पाणी समस्या तीव्र आहे. पालिकेतर्फे दिवसातून एकदाच पाणी मिळते. तेसुद्धा कमी दाबाने फक्त १५ ते २० मिनिटेच असते. उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीषणता वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नियोजन न झाल्याने ही परिस्थिती उद््भवली आहे. या भागात टँकर व्यावसायिकांना सुगीचे दिवस आहेत. त्यांच्यासाठीच हा प्रश्न लोंबकळत ठेवला जात नाही ना, अशी साशंकता चºहोलीकर व्यक्त करीत आहेत.मी महापौर झाल्यावर लगेच भामा आसखेड प्रकल्प तातडीने राबवला पाहिजे यासाठी आग्रही होतो. शहराची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पाण्यावर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही. याशिवाय दिवसाआड पाणीपुरवठा करावा, तरच सर्वांना पाणी पोहोचेल. चार टप्पे पार करून पाणी येत असल्याने पाणी पुरेसे मिळत नाही. लवकरात लवकर भामा आसखेड व आंद्रा प्रकल्प राबवावा यासाठी प्रशासनाकडे आग्रह आहे. - नितीन काळजे, माजी महापौरगेले वर्षभर पाण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. कधी पाणीच कमी आहे, तर कधी तांत्रिक कारणे सांगून टाळाटाळ केली जात आहे. पुरेसे मिळणे गरजेचे आहे. रावेत बंधारा, निगडी, गवळीमाथा व त्यानंतर मोशी असे चार टप्पे पार करून पाणी चºहोलीत येत आहे. त्यामुळे चºहोलीला कधीच पुरेसे पाणी मिळत नाही. महापालिका पाणीपुरवठा विभाग सहकार्य करत नाही. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागते. कमी दाबाने पाणी व तेही दररोज नाही अशी परिस्थिती चºहोलीची झाली आहे. - सुवर्णा बुर्डे, नगरसेविका

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड