शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पाणीकपातीचे संकट टळले - श्रावण हर्डीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 03:13 IST

पवना धरणात यंदा पाणीसाठा पुरेसा असल्याने पाणीकपात करण्याची गरज नाही. तसेच २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पिंपरी : पवना धरणात यंदा पाणीसाठा पुरेसा असल्याने पाणीकपात करण्याची गरज नाही. तसेच २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नदीतून रावेत येथील बंधाऱ्यातपाणी येते. तेथून जलउपसा केंद्रातून पाणी उचलून जलवाहिनीद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते. दिवसाला ४६० एमएलडी एवढे शहरासाठी पाण्याचे आरक्षण आहे. नागरीकरण वाढू लागल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कमी दाबाने पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण आहेत.उन्हाळा तीव्र असल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाण्याची कपात केली जाईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सूचित केले होते. त्यामुळे दिवसाआड पाण्याचे संकट येणार हे निश्चित होते. मात्र, महापौर नितीन काळजे आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पाणीकपातीला विरोध केला होता. पाण्याचे नियोजन करा, अशा सूचना केल्या होत्या. सध्या पवना धरणात ३४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हा साठा २९ टक्के होता. गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात पाणीकपात झाली होती. दिवसाआड पाण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे महापालिका प्रशासन यंदा कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सुकता होती. या वर्षी पुरेसा साठा असल्याने पाणीकपातीचे संकट या वर्षी नसणार आहे, असे प्रशासनाने सूचित केले आहे.महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाने अर्थात एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. पाणी वापरासंदर्भात एमआयडीसीने महापालिकेस सूचना केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पाणी बचत करा अन्यथा कपात करावी लागेल, असे पत्र महापालिकेला दिले होते. त्यामुळे पाणीवापराचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.पवना धरणात यंदा पाण्याचा साठा पुरेसा आहे. नियमित पाणी पुरवठ्यानुसार सध्याचा पाणीसाठा जुलैपर्यंत पुरणार आहे. त्यामुळे यंदा पाणीकपात करण्याची किंवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची गरज नाही. २४ तास पाणी योजनेचे ४० टक्के भागाचे काम पूर्णत्वास आले आहे. तसेच उर्वरित ६० टक्के भागाचे काम सुरू झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाणीगळती रोखून नागरिकांना पुरेसे पाणी देता येणार आहे. - श्रावण हर्डीकर, आयुक्त

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड