शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

पाणीकपातीचे संकट टळले - श्रावण हर्डीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 03:13 IST

पवना धरणात यंदा पाणीसाठा पुरेसा असल्याने पाणीकपात करण्याची गरज नाही. तसेच २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पिंपरी : पवना धरणात यंदा पाणीसाठा पुरेसा असल्याने पाणीकपात करण्याची गरज नाही. तसेच २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नदीतून रावेत येथील बंधाऱ्यातपाणी येते. तेथून जलउपसा केंद्रातून पाणी उचलून जलवाहिनीद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते. दिवसाला ४६० एमएलडी एवढे शहरासाठी पाण्याचे आरक्षण आहे. नागरीकरण वाढू लागल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कमी दाबाने पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण आहेत.उन्हाळा तीव्र असल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाण्याची कपात केली जाईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सूचित केले होते. त्यामुळे दिवसाआड पाण्याचे संकट येणार हे निश्चित होते. मात्र, महापौर नितीन काळजे आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पाणीकपातीला विरोध केला होता. पाण्याचे नियोजन करा, अशा सूचना केल्या होत्या. सध्या पवना धरणात ३४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हा साठा २९ टक्के होता. गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात पाणीकपात झाली होती. दिवसाआड पाण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे महापालिका प्रशासन यंदा कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सुकता होती. या वर्षी पुरेसा साठा असल्याने पाणीकपातीचे संकट या वर्षी नसणार आहे, असे प्रशासनाने सूचित केले आहे.महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाने अर्थात एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. पाणी वापरासंदर्भात एमआयडीसीने महापालिकेस सूचना केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पाणी बचत करा अन्यथा कपात करावी लागेल, असे पत्र महापालिकेला दिले होते. त्यामुळे पाणीवापराचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.पवना धरणात यंदा पाण्याचा साठा पुरेसा आहे. नियमित पाणी पुरवठ्यानुसार सध्याचा पाणीसाठा जुलैपर्यंत पुरणार आहे. त्यामुळे यंदा पाणीकपात करण्याची किंवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची गरज नाही. २४ तास पाणी योजनेचे ४० टक्के भागाचे काम पूर्णत्वास आले आहे. तसेच उर्वरित ६० टक्के भागाचे काम सुरू झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाणीगळती रोखून नागरिकांना पुरेसे पाणी देता येणार आहे. - श्रावण हर्डीकर, आयुक्त

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड