शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाणीकपातीचे संकट टळले - श्रावण हर्डीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 03:13 IST

पवना धरणात यंदा पाणीसाठा पुरेसा असल्याने पाणीकपात करण्याची गरज नाही. तसेच २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पिंपरी : पवना धरणात यंदा पाणीसाठा पुरेसा असल्याने पाणीकपात करण्याची गरज नाही. तसेच २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नदीतून रावेत येथील बंधाऱ्यातपाणी येते. तेथून जलउपसा केंद्रातून पाणी उचलून जलवाहिनीद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते. दिवसाला ४६० एमएलडी एवढे शहरासाठी पाण्याचे आरक्षण आहे. नागरीकरण वाढू लागल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कमी दाबाने पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण आहेत.उन्हाळा तीव्र असल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाण्याची कपात केली जाईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सूचित केले होते. त्यामुळे दिवसाआड पाण्याचे संकट येणार हे निश्चित होते. मात्र, महापौर नितीन काळजे आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पाणीकपातीला विरोध केला होता. पाण्याचे नियोजन करा, अशा सूचना केल्या होत्या. सध्या पवना धरणात ३४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हा साठा २९ टक्के होता. गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात पाणीकपात झाली होती. दिवसाआड पाण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे महापालिका प्रशासन यंदा कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सुकता होती. या वर्षी पुरेसा साठा असल्याने पाणीकपातीचे संकट या वर्षी नसणार आहे, असे प्रशासनाने सूचित केले आहे.महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाने अर्थात एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. पाणी वापरासंदर्भात एमआयडीसीने महापालिकेस सूचना केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पाणी बचत करा अन्यथा कपात करावी लागेल, असे पत्र महापालिकेला दिले होते. त्यामुळे पाणीवापराचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.पवना धरणात यंदा पाण्याचा साठा पुरेसा आहे. नियमित पाणी पुरवठ्यानुसार सध्याचा पाणीसाठा जुलैपर्यंत पुरणार आहे. त्यामुळे यंदा पाणीकपात करण्याची किंवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची गरज नाही. २४ तास पाणी योजनेचे ४० टक्के भागाचे काम पूर्णत्वास आले आहे. तसेच उर्वरित ६० टक्के भागाचे काम सुरू झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाणीगळती रोखून नागरिकांना पुरेसे पाणी देता येणार आहे. - श्रावण हर्डीकर, आयुक्त

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड