शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वर्षातच ‘फेस्टिव्हल’वर ‘विघ्न’; महापालिकेचा उत्सव यंदा नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 01:05 IST

संस्कृती व सांस्कृतिक रक्षक भाजपाला पडला विसर

पिंपरी : महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हलचे गतवर्षी पुनरुज्जीवन केले. सोळा वर्षांनंतर पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल या नावाने नव्याने उत्सव सुरू झाला. मात्र, संस्कृती आणि सांस्कृतिक रक्षणाचे गोडवे गाणाऱ्या महापालिकेत वर्षभरातच फेस्टिव्हल गुंडाळला आहे. यंदाचे उत्सवाचे कोणतेही नियोजन केले नसल्याने सर्वच स्तरांतून टीका होत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर आर. एस. कुमार यांच्या कालखंडात १९९६ मध्ये पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हल सुरू केला होता. या अंतर्गत लोकसंगीतापासून शास्त्रीय संगीतापर्यंत असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत होते. हा महोत्सव निगडी प्राधिकरण, चिंचवड, पिंपरी, भोसरी अशा विविध ठिकाणी होत असे. स्वरभास्कर भारतरत्न भीमसेन जोशी, उदित नारायण, सोनू निगम, साधना सरगम अशा विविध मान्यवर कलावंतांचा कलाविष्कार शहरवासीयांना अनुभवयास मिळाला. तसेच सुरेखा पुणेकर यांच्या लावणीनेही बहार आणली होता. पुढे प्रकाश रेवाळे महापौर असताना गणेश फेस्टिव्हल बंद केला.त्यानंतर एक वर्ष पिंपरी-चिंचवड उत्सव, सांस्कृतिक संस्था आणि पालिकेच्या सहकार्याने एक वर्ष महोत्सव झाला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड सोशल क्लबच्या वतीने २०१३ पर्यंत महोत्सव होत होता.या महोत्सवाचे गेल्या वर्षी पुनरुज्जीवन महापौर नितीनकाळजे यांनी केले होते. महापालिकेच्या वतीने एक ते तीन सप्टेंबरला पिंपरी-गणेश फेस्टिव्हल झाला होता. या फेस्टिव्हलमधून महाराष्ट्रीय लोककला आणि शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली होती.नव्या महापौरांना नाही माहितीनितीन काळजे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर हा उत्सव वर्षभरातच बंद पडला आहे. गेल्या वर्षी हा महोत्सव आयोजित करणारे पदाधिकारी या वर्षी नसल्याने कोणालाही महोत्सवाची आठवण झालेली नाही. संस्कृती आणि सांस्कृतिक रक्षणाचे गोडवे गाणाºया भाजपाच्या नेत्यांना आणि महापालिकेतील पदाधिकाºयांना विसर पडला आहे. विद्यमान महापौर राहुल जाधव यांनाही महोत्सवाबाबत काहीही माहिती नसल्याचे दिसून आले.पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल या शहराची सांस्कृतिक ओळख करणारा उत्सव होता. त्यातून गणेशभक्तांचे मनोरंजन व्हावे, हाच उद्देश होता. त्यासाठी गेल्या वर्षी महोत्सवाची खंडित परंपरा सुरू केली. गेल्या वर्षी तीन दिवसीय फेस्टिव्हल झाला. ही परंपरा कायम ठेवावी,अशी सूचना केली होती. पद सोडल्यानंतर एकाच वर्षात महोत्सव बंद करणे ही चांगली गोष्ट नाही.- नितीन काळजे, माजी महापौर

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपा