शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

... शेवटी काय तर तुम्ही आहे म्हणून गाव आहे, तेवढं फक्त मतदानाला गावाकडे या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 14:53 IST

आमचा तुम्हाला गावाकडे यायला विरोध नव्हता. पण काही शहाणी लोक आहेत, तेच विरोध करत होते...

ठळक मुद्देइच्छुकांकडून ग्रामपंचायती निवडणुकीसाठी शहरवासीयांसाठी मनधरणी

तेजस टवलारकर -

पिंपरी : मताला गावाकडे या, असे फोन गावाकडून येण्यास सुरुवात झाली आहे. आता आम्ही गावाकडे आलो तर चालेल का, असा प्रश्न शहरवासीयांनी विचारला तर अहो, आमचा तुम्हाला गावाकडे यायला विरोध नव्हता. पण काही शहाणी लोक आहेत, तेच विरोध करीत होते. शेवटी तुम्ही आहे म्हणून गाव आहे, अशी मनधरणी इच्छुकांकडून ग्रामपंचायती निवडणुकीत होत आहे.मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तेव्हा कोरोनाच्या भीतीने गावांमध्ये बाहेरील व्यक्तींना गावबंदी करण्यात आली होती. आता ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे गावातील नेत्यांना शहरी मतदारांची आठवण झाली आहे.

मावळातील ५७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून, १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. रोजगारासाठी गावातील अनेक नागरिक पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, या शहरांत गेले आहेत. अशा मतदारांना फोन करून, मेसेज करून निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन इच्छुक उमेदवार करीत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार हे तुलनेने कमी असतात. निवडणुकीत सर्वच स्थानिक उमेदवार उभे असतात. ग्रामपंचायत निवडणूक ही नेहमीच अटीतटीचे होती. यामुळे प्रत्येक मतदाराला विशेष महत्त्व असते.

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार पॅनलच्या माध्यमातून निवडणुका लढवित असतात.इच्छुक उमेदवारांकडून पॅनल उभे करण्याची तयारी सुरू आहे. कोरोनामुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने प्रशासक नेमण्याची वेळ आली होती. यावरून ग्रामीण भागातील राजकारण तापले होते. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

--सुरुवातीला होती गावबंदी

अनेक गावांमध्ये कोरोनाच्या भीतीने बाहेरील व्यक्तींना गावबंदी करण्यात आली होती. ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर कुंपण करून, बांबूचे अडथळे तयार करून किंवा दगड ठेवून गावचा रस्ता अडवून धरला होता. काही गावांच्या वेशीवर गावातील लोक आळीपाळीने पहारा देत होते. गावात बाहेरील व्यक्तीला येऊ दिले जात नव्हते. त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पण तेच कार्यकर्ते शहरी मतदारांना गावाकडे या, असा आग्रह करीत आहेत.---

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVotingमतदानElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत