शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

... शेवटी काय तर तुम्ही आहे म्हणून गाव आहे, तेवढं फक्त मतदानाला गावाकडे या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 14:53 IST

आमचा तुम्हाला गावाकडे यायला विरोध नव्हता. पण काही शहाणी लोक आहेत, तेच विरोध करत होते...

ठळक मुद्देइच्छुकांकडून ग्रामपंचायती निवडणुकीसाठी शहरवासीयांसाठी मनधरणी

तेजस टवलारकर -

पिंपरी : मताला गावाकडे या, असे फोन गावाकडून येण्यास सुरुवात झाली आहे. आता आम्ही गावाकडे आलो तर चालेल का, असा प्रश्न शहरवासीयांनी विचारला तर अहो, आमचा तुम्हाला गावाकडे यायला विरोध नव्हता. पण काही शहाणी लोक आहेत, तेच विरोध करीत होते. शेवटी तुम्ही आहे म्हणून गाव आहे, अशी मनधरणी इच्छुकांकडून ग्रामपंचायती निवडणुकीत होत आहे.मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तेव्हा कोरोनाच्या भीतीने गावांमध्ये बाहेरील व्यक्तींना गावबंदी करण्यात आली होती. आता ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे गावातील नेत्यांना शहरी मतदारांची आठवण झाली आहे.

मावळातील ५७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून, १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. रोजगारासाठी गावातील अनेक नागरिक पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, या शहरांत गेले आहेत. अशा मतदारांना फोन करून, मेसेज करून निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन इच्छुक उमेदवार करीत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार हे तुलनेने कमी असतात. निवडणुकीत सर्वच स्थानिक उमेदवार उभे असतात. ग्रामपंचायत निवडणूक ही नेहमीच अटीतटीचे होती. यामुळे प्रत्येक मतदाराला विशेष महत्त्व असते.

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार पॅनलच्या माध्यमातून निवडणुका लढवित असतात.इच्छुक उमेदवारांकडून पॅनल उभे करण्याची तयारी सुरू आहे. कोरोनामुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने प्रशासक नेमण्याची वेळ आली होती. यावरून ग्रामीण भागातील राजकारण तापले होते. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

--सुरुवातीला होती गावबंदी

अनेक गावांमध्ये कोरोनाच्या भीतीने बाहेरील व्यक्तींना गावबंदी करण्यात आली होती. ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर कुंपण करून, बांबूचे अडथळे तयार करून किंवा दगड ठेवून गावचा रस्ता अडवून धरला होता. काही गावांच्या वेशीवर गावातील लोक आळीपाळीने पहारा देत होते. गावात बाहेरील व्यक्तीला येऊ दिले जात नव्हते. त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पण तेच कार्यकर्ते शहरी मतदारांना गावाकडे या, असा आग्रह करीत आहेत.---

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVotingमतदानElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत