शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पवनानगर परिसरात सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:42 IST

पवना धरणातून सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून ४४५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. शिवली येथील पूल पाण्याखाली गेला आहे.

पवनानगर : पवना धरणातून सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून ४४५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. शिवली येथील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे परिसरातील शिवली, भडवली, काटेवाडी, येवलेवाडी, येलघोल, धनगव्हाण या गावांचा या पुलावरून होणारा संपर्क तुटला आहे.पवना धरण १०० टक्के भरले आहे. शुक्रवारी (दि. १०) धरणाच्या सांडव्यावरून ८०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे सकाळी १५०० क्युसेकने आणि सायंकाळी २२०८ क्युसेकने पाणी सोडण्यात आलेआहे. रात्रभर पावसाचे प्रमाण वाढल्याने रविवारी सकाळी नऊच्या सुमारास ३३८५क्यसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परंतु, पवनमावळ परिसरात पावसाचाजोर वाढल्याने धरणाच्या सहा दरवाजातून ४५७० क्युसेकने पाण्याचा विसर्ग पवना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे ए. एम. गदवाल यांनी दिली.वडिवळे हाऊसफुल्लकामशेत : मावळासह कामशेत शहरात पावसाची संततधार सुरू असून मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. जोरदार पडणाऱ्या या पावसामुळे मावळ परिसरातील शेतकरी सुखावला आहे, तर नाणे मावळातील वडिवळे धरण सोमवारी १०० टक्के भरले आहे. धरणाचे दोन दरवाजे १० सेंमीने उघडले असून, ५५० क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे. आठवडाभरापासून पावसाने पुन्हा चांगला जोर धरला आहे. नाणे मावळ परिसरात सर्वत्र संततधार आहे. गेले दीड ते दोन महिने पडणाºया पावसामुळे वडिवळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन सोमवारी सकाळी धरण १०० टक्के भरले. सकाळी १० वाजल्यापासून धरणाचे दोन दरवाजे १० सेंमीने सुरू केले आणि ५५० क्युसेकने पाणी विसर्ग सुरु करण्यात आला. नदी किनारी गावांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याची माहिती वडिवळे धरण शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.

टॅग्स :Rainपाऊसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड