शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

शेतकरी संपामुळे भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 02:08 IST

भाजीपाला ही दैनंदिन गरज आहे. त्यामुळे आज कोणती भाजी खरेदी करावी, असा प्रश्न महिलांना दररोज सतावत असतो. परंतु आता भाजीची ‘चॉईस’ राहिली नाही. कारण राज्यात शेतकरीराजाने संप पुकारल्याने बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाली आहे.

रहाटणी - भाजीपाला ही दैनंदिन गरज आहे. त्यामुळे आज कोणती भाजी खरेदी करावी, असा प्रश्न महिलांना दररोज सतावत असतो. परंतु आता भाजीची ‘चॉईस’ राहिली नाही. कारण राज्यात शेतकरीराजाने संप पुकारल्याने बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भाजी खावी तर कोणती, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना सतावत आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे पिंपरी येथील भाजी बाजारात फार कमी व मोजक्याच भाज्यांची आवक झाली़ त्यामुळे ग्राहकांना कोणतीच पसंती राहिली नाही़ सध्या ग्राहक मिळेल ती भाजी खरेदी करीत आहेत; मात्र तीही ‘मुहमांगे’ किमतीला त्यामुळे ग्राहक मोठ्या संकटात सापडला आहे. याचाच फायदा छोटे व्यावसायिक घेत आहेत. भाजी मंडईतील किमतीच्या तीन पटीने भाजी ग्राहकांना विकली जात आहे. भाजी ठेलेवाले, हातगाडीवाले संपाचे भांडवल करून ग्राहकांना लुटण्याचा धंदा सुरूकेला आहे.नाश्त्याला काय करायचे, जेवणात कोणती भाजी करायची आणि रात्रीच्या मेन्यूत कशाचा समावेश करायचा, अशी विवंचना महिलांना असते़ मात्र सकाळीच दारावर आलेला भाजीविक्रेता जेव्हा भाज्यांचे दर सांगतो त्या वेळी मात्र कोणती भाजी घ्यावी, असा प्रश्न महिलांना पडत आहे. या प्रश्नाचे उत्तर सध्या पतिराजाकडेही नाही. हा संप असाच सुरू राहिला तर ग्राहकांचे मोठे हाल होणार आहेत.शहरात काही शाळा सुरू झाल्या आहेत तर उर्वरित शाळा काही दिवसांनी सुरू होतील. भाज्यांचे दर स्थिर झाले नाहीत. दुधाचा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर विद्यार्थ्यांना व पालकांना मोठा त्रास सहन करावा लागेल. सध्या शहरात मोठ्या प्रमाणात दुधाचीही आवक कमी झाल्याने शहराच्या अनेक भागांत दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे, तर स्थानिक दुधवाल्याने अचानक दुधाचे दर वाढवून ग्राहकांची लूट सुरू केली आहे़ यावर सरकार कशा प्रकारे अंकुश ठेवणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.छोट्या मंडईत शुकशुकाटरहाटणी फाटा येथील मंडईत कोणत्याच प्रकारच्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध न झाल्याने अनेक विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवणेच पसंत केले. काही विक्रेत्यांनी आहे तोच माल चढ्या दराने विकला. काही विक्रेत्यांनी उपनगरांतील शेतमाल आणून विकला़ मात्र त्यासाठी तीन ते चार पटीने किंमत आकारण्यात आल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या गावांत आणि उपनगरांत अद्यापही भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जात आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी हा भाजीपाला शेतातून खरेदी करून शहरात विक्री करीत आहेत. यात शेतकऱ्यासही जादा दर मिळत आहे. व्यापाºयालाही जादा नफा मिळत आहे. मात्र त्याबाबत कोणीही विचार करीत नसल्याची खंत ग्राहकांनी व्यक्त केली.आठवडे बाजारही ओसपिंपळे सौदागर, रहाटणीसह परिसरात आणि शहरात आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले होते. राजकीय पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे आठवडे बाजार सुरू केले आहेत. शेतकरीसंपामुळे या आठवडे बाजारांतही भाजीपाल्याची आवक झाली नाही. शेतकºयांनीही या बाजारांकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे बाजार ओस पडले आहेत.सध्याची रोजच सुरू असलेली पेट्रोल दरवाढीमुळे गृहोपयोगी वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जगणे कठीण झाले आहे. त्यात शेतकºयांनी संप सुरू केल्याने आणखी माहागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे महिन्याचे ‘बजेट’ आवाक्या बाहेर गेले आहे. ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा होती; मात्र आम्हा सर्वसामान्य नागरिकांची पूर्ण निराशा झाली आहे. त्यामुळे आम्हाला कुणीच वाली नाही.- उषा कांबळे, गृहिणीसध्या शेतकºयांचा संप सुरू असल्याने भाज्यांची आवक म्हणावी तेवढी होत नाही. त्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. ज्या ठिकाणी भाजी मिळते ती आणून ग्राहकांना काही फार चढ्या दराने विक्री करावी लागत आहे. मात्र संपाचा फटका विक्रेत्यांसह ग्राहकांना ही बसत आहे.- जगदीश नगरकर,भाजी विक्रेते

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजारFarmer strikeशेतकरी संप