शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

बेशिस्त वाहनचालक, व्यावसायिकांच्या अतिक्रमणाने कोंडतोय बाजारपेठेचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 01:08 IST

पिंपरी कॅम्पातील कराची चौक ते भाटनगर दरम्यानच्या रिव्हर रोडवर वाहतूककोंडीची दररोजची समस्या आहे. पिंपरीतील मुख्य बाजारपेठ असल्याने कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

- शीतल मुुंडेपिंपरी : पिंपरी कॅम्पातील कराची चौक ते भाटनगर दरम्यानच्या रिव्हर रोडवर वाहतूककोंडीची दररोजची समस्या आहे. पिंपरीतील मुख्य बाजारपेठ असल्याने कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मुळातच रस्ता अरुंद असताना दुतर्फा होणाऱ्या अवैध आणि बेशिस्त पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात रस्ता व्यापला जातो. परिणामी पादचा-यांनाही या रस्त्याचा वापर करणे शक्य होत नाही. तसेच वाहतूककोंडीत भर पडते. लोकमत पाहणीतून ही बाब निदर्शनास आली.रिव्हर रोडची रुंदी सुमारे १२ मीटर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुचाकी आणि चारचाकीचे पार्किंग असते. टेम्पो, बस आणि अवजड वाहने आल्यास येथे वाहतूककोंडी होते. काही व्यावसायिक दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवतात. काही विक्रेते रस्त्यातच हातगाडी थांबवून व्यवसाय करतात. त्यामुळेही कोंडी होते. सुटीच्या दिवशी ग्राहकांची संख्या जास्त असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा वेळीही बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडी होते. मोकाट जनावरेही या रस्त्यावर ठाण मांडून असतात. कराची चौकातून भाटनगरकडे जाण्यासाठी रिव्हर रोडवर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. असे असतानाही काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवितात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांमुळेही या समस्येत भर पडते.शगुन चौकातून कराची चौक आणि रिव्हर रोडकडे जाताना एकेरी वाहतूक आहे. मात्र, अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने जातात. पिंपरी रेल्वे स्टेशन येथील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलावरून शगुन चौकाकडे येण्यासाठी एकेरी वाहतूक आहे. असे असतानाही बहुतांश वाहनचालक शगुन चौकातून या उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने वाहने चालवूनजातात. त्यामुळे शगुन चौकातआणि उड्डाणपुलावरही वाहतूक कोंडी होते. कॅम्प परिसर, बाजारपेठ आणि मंडईत येणाºया वाहनचालकांसाठी उड्डाणपुलालगत मंडईजवळ वाहनतळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. असे असतानाही बहुतांश वाहनचालक त्याचा वापर न करता भर रस्त्यावर वाहने उभी करतात.शनिवार आणि रविवारी शगुन चौकात आणि रिव्हर रोडवर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शगुन चौकातून पिंपरीगाव आणि काळेवाडीकडे जाण्यासाठी वाहतूककोंडीतून मार्ग काढावा लागतो. यात वाहनचालकांचा मोठा वेळ खर्च होतो. तसेच इंधन जळून प्रदूषणही होते. रिव्हर रोडवर भाटनगर येथेही अशीच परिस्थिती असते. भाटनगर येथून इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलावर जाणाºया वाहनांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याने येथे कोंडी होते. उड्डाणपुलावर जातानाच वळण असल्याने या कोंडीत भर पडते. उड्डाणपुलावरून चिंचवड लिंकरोडकडे जाणारी वाहने आणि उड्डाणपुलावर जाणारी वाहने यांचा खोळंबा होतो.- दीपक हाडबे, नागरिककॉलेजसाठी अर्धा तास लवकर निघावे लागते. वाहतूककोंडीतून रस्ता काढता काढता वेळ जातो. अनेक वेळा तर वाहने मोठ्या प्रमाणात उभी असतात. पायी जाण्यासाठीही रस्ता मिळत नाही. या वाहतुकीच्या समस्येमुळे अनेक वेळा कॉलेजला जाण्यासाठी उशीर होतो.- अभिजित करपे, महाविद्यालयीन विद्यार्थीरस्त्यावरच बेशिस्तपणे वाहने उभी असतात. रस्त्याच्या बाजूला देखील वाहने लावली जातात. त्यामुळे आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना शगुन चौकातून चालणे अवघड होते. रस्त्याने चालताना वाहनाचा धक्का लागण्याची भीती वाटते. रस्त्याच्या बाजूला सर्व दुचाकी लावलेल्या असतात. आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी कसे चालावे, असा प्रश्नच उपस्थित होतो.- प्रवीण देवकर, ज्येष्ठ नागरिकशगुन चौकात नेहमीच वाहतूककोंडीतून मार्ग काढत जावे लागते. रस्त्यावर हातगाड्या लावल्या जातात. मुख्य रस्त्यावर जनावरे ठाण मांडून असतात. या सर्वातून मार्ग काढावा लागतो. जनावरे पादचाºयांच्या अंगावरही धावून जातात.- शकुंतला शिंदे, गृहिणी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड