शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

चोवीस तास पाणीपुरवठा डिसेंबरपर्यंत, पिंपरी-चिंचवड महापालिकेची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 03:15 IST

स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडची पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून, सत्ताधाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली आहे. चोवीस तास पाणीपुरवठ्यातील चाळीस टक्के भागाचे काम प्रगतिपथावर असून डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

पिंपरी - स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडची पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून, सत्ताधाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली आहे. चोवीस तास पाणीपुरवठ्यातील चाळीस टक्के भागाचे काम प्रगतिपथावर असून डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच, मार्चपर्यंत ही योजना नागरिकांसाठी कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट टळण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी आतापर्यंत सुमारे चाळीस कोटी खर्च झाला आहे.पुणे आणि मुंबई अशा दोन मेट्रोसिटीच्या मध्यावर असणाºया पिंपरी-चिंचवड महापालिकेची लोकसंख्या २१ लाखांवर पोहोचली़ नागरीकरण वाढल्याने एकमेव स्रोत असणाºया पवना धरणातील साठा कमी पडत आहे. गेल्या दहा वर्षांपासून बंदीस्त जलवाहिनी प्रकल्प लांबला आहे. तसेच भामा आसखेड आणि आंध्रा धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पालाही गती मिळालेली नाही. त्यामुळे चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीची आवश्यकता आहे.पवना धरणातून नदीत पाणी सोडून रावेत येथील जल उपसा केंद्रातून जलवाहिन्यांच्या माध्यमातून शहरात पाणीपुरवठा केला जातो. दिवसाला ४६० एमएलडी पाण्याचे आरक्षण आहे. मात्र, लोकसंख्या वाढीचे प्रमाण पाहता पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. एक मेपासून दिवसाआड पाण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले होते. मात्र, महापौर नितीन काळजे यांनी दिवसाआड पाण्यास विरोध केला आहे. त्यामुळे पाणी कपात होणार की नाही, याबाबत लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी यांच्यात एकमत नसल्याचे दिसून येते. केंद्राच्या जेएनएनयुआरएम अंतर्गत चोवीस तास पाणीपुरवठ्याची योजना सुरू झाली. पहिला प्रयोग यमुनानगर प्राधिकरणात करण्यात आला होता. मात्र, महापालिकेत भाजपाची सत्ता आल्याने शिवसेनेचे वर्चस्व असणाºया वॉर्डातील प्रकल्प प्रशासनाने गुंडाळला होता. त्यास नागरिकांनी विरोधही केला होता. त्यानंतर पहिल्या टप्प्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले होते. या योजनेत या भागातील जलवाहिन्या आणि नळजोड बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. एचडीपी पाईप आणि नळजोडांसाठी एमडीपी वापरले जाणार आहे.समान पाणीवाटपनियोजनाचा अभाव्ताामुळे महापालिका परिसरात पिण्याच्या पाण्याच्या गळतीचे प्रमाण हे चाळीस टक्के आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी आणि समान पाणी वाटपासाठी चोवीस तास पाणी योजना राबविली जात आहे. त्यातील चाळीस टक्के भागातील काम दीड वर्षांपासून सुरू आहे.चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील चाळीस टक्के भागाचे काम दीड वर्षांपूर्वी सुरू झाले. ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. सध्या पाणीपुरवठ्यावर येणारा ताण कमी होणार आहे. तसेच गळती रोखून समान पाणीवाटप होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर दुसºया टप्प्यात उर्वरित साठ टक्के भागाचेही काम केले जाणार आहे. त्यातील काही भागांचे काम सुरूही करण्यात आले आहे.- प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभागदाट लोकवस्तीला होणार फायदा४चोवीस तास पाणी योजनेच्या पहिल्या टप्प्यात मोशी, दिघी, भोसरी, प्राधिकरण, चिंचवड, सांगवी या भागात कामे सुरू आहेत. संबंधित भाग हा दाट लोकवस्तीचा असल्याने तसेच या भागात पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी अधिक आहेत. पहिल्या टप्प्यातील चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम पहिल्या टप्प्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे या भागांना फायदा होणार आहे. त्यासाठी सुमारे चाळीस कोटी खर्च अपेक्षित असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी