शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा आधारवड हरपला, अटलबिहारी वाजपेयी यांना उद्योगनगरीतून श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:21 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पिंपरी-चिंचवड शहरातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. ‘‘पक्षवाढीसाठी अटलजींचे योगदान मोलाचे होते़ भाजपाचा आधारवड हरपला, अशा भावना उद्योगनगरीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या.

पिंपरी  - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पिंपरी-चिंचवड शहरातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. ‘‘पक्षवाढीसाठी अटलजींचे योगदान मोलाचे होते़ भाजपाचा आधारवड हरपला, अशा भावना उद्योगनगरीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या.भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अटलजींच्या आठवणींनी उजाळा दिला. शहरातील राजकीय पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा अटलजींशी थेट संपर्क होता. अशा मान्यवरांनी त्या आठवणी कथन केल्या.शहर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संस्था आणि संघटनांतर्फे अटलजींना श्रद्धांजली वाहण्यात आली. अटलजींच्या निधनाने महापालिकेच्या वतीने होणारे नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. महापालिकेच्या स्वच्छता विषयक प्रदर्शनाचे उद्घाटन होणार नसल्याचे महापालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.वाजपेयी यांच्या निधनामुळे केवळ भाजपाचे नाही तर, संपूर्ण देशाची मोठी हानी झाली आहे. वाजपेयींनी देशात प्रमुख महामार्ग बनवून ती जोडण्याची योजना राबविल्याने वाहतूक सुरळीत होऊन अनेक मोठी शहरे एकमेकांना जोडली गेली आहेत. परिणामी बाजारपेठा जोडल्या जाऊन, देशातील आर्थिक स्थिती बळकट होत गेली. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या वतीने मी त्यांना आदरांजली अर्पण करीत आहे.- राहुल जाधव, महापौरमाझे वडील स्वर्गीय विश्वनाथराव भेगडे यांच्यामुळे मला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना जवळून पाहण्याचे भाग्य मिळाले. देशाचा महान सुपुत्र आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. आपल्या ध्येयांशी प्रामाणिक राहून त्यांनी भारताचे नाव जगात उज्ज्वल केले. विरोधात असताना इंदिरा गांधी यांनी बांगला देशाच्या युद्धात विजय मिळवला. त्या वेळी त्यांचा आवर्जून ‘दुर्गा’ असा उल्लेख करून, ज्या वेळी देशाचा प्रतिष्ठेचा विषय असतो तेव्हा आम्ही एक असतो, असा संदेश अटलजींनी दिला होता. वाजपेयी यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.- संजय भेगडे, आमदारवाजपेयी हे कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी विविध अंगी ओळख असलेले अटलबिहारी वाजपेयी असे मोठं नेतृत्व देशाने गमावले आहे. देशहित हेच त्यांचे पहिले प्राधान्य होते. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशासाठी भरीव योगदान दिले. १९९१ मध्ये भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि वाजपेयींच्या काळात त्याला गती देण्यात आली. पंतप्रधान म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले.- महेश लांडगे, आमदारअटलबिहारी वाजपेयी यांचे वक्तृत्व, मनमोहक हास्य लोकांना आपलं करून जायचे़ त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात हिंदीत भाषण केले होते. हिंदीत भाषण करणारे ते भारताचे पहिले विदेश मंत्री होते. तसेच भारत व पाकिस्तान यांच्यातील मतभेद दूर करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली होती. त्यांच्या भाषणातील ‘रग रग से हिंदू हूँ’’ म्हणणारा हिंदुत्ववादाचा हुंकार असो, किंवा सर्वधर्माच्या नागरिकांना समान वागणूक देणारा राजधर्म पाळण्याचा सर्वधर्मसमभावाचा विचार असो, अटलबिहारी वाजपेयी जीवनाच्या प्रत्येक सतरावर अग्रणी राहिले.- लक्ष्मण जगताप, आमदारवाजपेयी हे दैवदुर्लभ नेतृत्व होते. त्याच्या पंतप्रधान काळातील कामांमुळे आज भाजपा या स्थितीत आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ते भाजपाचे उमेदवार विराज काकडे यांच्या प्रचारसभेला भोसरीत आले होते. त्यांच्या सभेला तब्बल एक लाख लोकांनी गर्दी केली होती. त्या वेळी पक्ष कार्यकर्ते म्हणून प्रचाराची जबाबदारी आमच्यावर होती. सभेत त्यांची भेट झाली होती़ त्यांच्या निधनामुळे भारताची मोठी हानी झाली असून, भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर राहील.- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड