शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

भाजपाचा आधारवड हरपला, अटलबिहारी वाजपेयी यांना उद्योगनगरीतून श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:21 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पिंपरी-चिंचवड शहरातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. ‘‘पक्षवाढीसाठी अटलजींचे योगदान मोलाचे होते़ भाजपाचा आधारवड हरपला, अशा भावना उद्योगनगरीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या.

पिंपरी  - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पिंपरी-चिंचवड शहरातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. ‘‘पक्षवाढीसाठी अटलजींचे योगदान मोलाचे होते़ भाजपाचा आधारवड हरपला, अशा भावना उद्योगनगरीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या.भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अटलजींच्या आठवणींनी उजाळा दिला. शहरातील राजकीय पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा अटलजींशी थेट संपर्क होता. अशा मान्यवरांनी त्या आठवणी कथन केल्या.शहर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संस्था आणि संघटनांतर्फे अटलजींना श्रद्धांजली वाहण्यात आली. अटलजींच्या निधनाने महापालिकेच्या वतीने होणारे नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. महापालिकेच्या स्वच्छता विषयक प्रदर्शनाचे उद्घाटन होणार नसल्याचे महापालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.वाजपेयी यांच्या निधनामुळे केवळ भाजपाचे नाही तर, संपूर्ण देशाची मोठी हानी झाली आहे. वाजपेयींनी देशात प्रमुख महामार्ग बनवून ती जोडण्याची योजना राबविल्याने वाहतूक सुरळीत होऊन अनेक मोठी शहरे एकमेकांना जोडली गेली आहेत. परिणामी बाजारपेठा जोडल्या जाऊन, देशातील आर्थिक स्थिती बळकट होत गेली. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या वतीने मी त्यांना आदरांजली अर्पण करीत आहे.- राहुल जाधव, महापौरमाझे वडील स्वर्गीय विश्वनाथराव भेगडे यांच्यामुळे मला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना जवळून पाहण्याचे भाग्य मिळाले. देशाचा महान सुपुत्र आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. आपल्या ध्येयांशी प्रामाणिक राहून त्यांनी भारताचे नाव जगात उज्ज्वल केले. विरोधात असताना इंदिरा गांधी यांनी बांगला देशाच्या युद्धात विजय मिळवला. त्या वेळी त्यांचा आवर्जून ‘दुर्गा’ असा उल्लेख करून, ज्या वेळी देशाचा प्रतिष्ठेचा विषय असतो तेव्हा आम्ही एक असतो, असा संदेश अटलजींनी दिला होता. वाजपेयी यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.- संजय भेगडे, आमदारवाजपेयी हे कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी विविध अंगी ओळख असलेले अटलबिहारी वाजपेयी असे मोठं नेतृत्व देशाने गमावले आहे. देशहित हेच त्यांचे पहिले प्राधान्य होते. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशासाठी भरीव योगदान दिले. १९९१ मध्ये भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि वाजपेयींच्या काळात त्याला गती देण्यात आली. पंतप्रधान म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले.- महेश लांडगे, आमदारअटलबिहारी वाजपेयी यांचे वक्तृत्व, मनमोहक हास्य लोकांना आपलं करून जायचे़ त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात हिंदीत भाषण केले होते. हिंदीत भाषण करणारे ते भारताचे पहिले विदेश मंत्री होते. तसेच भारत व पाकिस्तान यांच्यातील मतभेद दूर करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली होती. त्यांच्या भाषणातील ‘रग रग से हिंदू हूँ’’ म्हणणारा हिंदुत्ववादाचा हुंकार असो, किंवा सर्वधर्माच्या नागरिकांना समान वागणूक देणारा राजधर्म पाळण्याचा सर्वधर्मसमभावाचा विचार असो, अटलबिहारी वाजपेयी जीवनाच्या प्रत्येक सतरावर अग्रणी राहिले.- लक्ष्मण जगताप, आमदारवाजपेयी हे दैवदुर्लभ नेतृत्व होते. त्याच्या पंतप्रधान काळातील कामांमुळे आज भाजपा या स्थितीत आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ते भाजपाचे उमेदवार विराज काकडे यांच्या प्रचारसभेला भोसरीत आले होते. त्यांच्या सभेला तब्बल एक लाख लोकांनी गर्दी केली होती. त्या वेळी पक्ष कार्यकर्ते म्हणून प्रचाराची जबाबदारी आमच्यावर होती. सभेत त्यांची भेट झाली होती़ त्यांच्या निधनामुळे भारताची मोठी हानी झाली असून, भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर राहील.- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड