शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

अवाजवी बिलांचा झटका, दिघीकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:54 IST

परिसरातील नागरिक विजेच्या समस्यांनी ग्रासलेले असताना महावितरण कंपनीने आणखी एक नवी समस्या निर्माण करून दिघीकरांच्या समस्येत भर टाकली आहे.

दिघी - परिसरातील नागरिक विजेच्या समस्यांनी ग्रासलेले असताना महावितरण कंपनीने आणखी एक नवी समस्या निर्माण करून दिघीकरांच्या समस्येत भर टाकली आहे. महावितरणच्या कारभाराने आधीच त्रस्त असलेल्या वीज ग्राहकांना योग्य सुविधा मिळत नाहीत.वीजपुरवठा खंडित होणे नित्याचेच झाले आहे. शिवाय तक्रार दाखल केल्यानंतरसुद्धा तत्काळ कारवाई केली जात नसल्याचे सह्याद्री कॉलनीमधील घटना ताजी असताना महावितरणने वीज ग्राहकांना मोठ्या रकमेची बिले आकारून झटका दिला आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांनी महावितरणच्या सावळ्या गोंधळाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.महावितरणचे कार्यकारी अभियंता मदन शेवाळे निवृत्त झाल्याने या विभागाचा कारभार अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. बी. भरणे यांच्याकडे आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, योग्य माहिती घेऊन नेमका प्रकार कशामुळे झाला आहे ते बैठकीमध्ये स्पष्ट होईल. बिलाच्या समस्येबाबत नागरिकांना सहकार्य करून समस्या सोडविल्या जातील. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.दरम्यान दिघी आणि परिसरामध्ये वीजपुरवठ्याबाबत अनेक समस्या आहेत. याबाबत नागरिकांनी महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने तक्रारी केल्या. मात्र, अधिकाºयांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यात वाढीव आणि चुकीच्या बिलांमुळे नागरिकांच्या संतापात भर पडली.दिघीतील वीज ग्राहकांना त्यांच्या चालू बिलामध्ये मागील भरलेले बिल जोडून आले आहे. तर काही नागरिकांच्या बिलावरील चालू रीडिंग व मागील रीडिंग सारखे दाखवले असून अंदाजे दोनशे युनिटचे बिल आकारण्यात आली आहेत.काही बिलावरील मीटर रीडिंगचे फोटो गायब झाले आहेत तर काही फोटो अस्पष्ट दिसून येत आहेत. या सर्व गोंधळामुळे नागरिक मोठ्या पेचात सापडले आहेत.महावितरणच्या कार्यालयात माहिती घेतली असता सॉफ्टवेअरची समस्या झाल्याचे सांगत जबाबदारी झटकण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भरलेली बिले वाढवून परत आल्याने ती कमी होतीलही; परंतु त्या कामाकरिता भोसरी गाठून वेळ द्यावा लागणार. त्यामुळे वेळ व आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ महावितरणने आणली आहे.

टॅग्स :electricityवीजpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड