शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत ठरणार पूररेषा

By admin | Updated: April 16, 2016 03:52 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून महापालिकेने नोटीस बजावलेल्या नदीपात्रातील वसाहतींच्या संदर्भात आयुक्त कुणाल कुमार यांच्या कार्यालयात पाटबंधारे खात्यांच्या अधिकाऱ्यांसह

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून महापालिकेने नोटीस बजावलेल्या नदीपात्रातील वसाहतींच्या संदर्भात आयुक्त कुणाल कुमार यांच्या कार्यालयात पाटबंधारे खात्यांच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त बैठक झाली. त्यात संपूर्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवड पूररेषा प्रत्यक्ष नदीपात्रात जाऊन मार्किंग करून निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या तीन महिन्यांत पाटंबधारे खाते अन्य खात्यांच्या सहकार्याने हे काम पूर्ण करणार आहे.पालिकेने नदीपात्र बांधलेल्या रस्त्याच्या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादात दाखल झालेल्या याचिकेत पालिकेच्या विरोधात निर्णय लागला. तो सर्वोच्च न्यायालयात कायम झाला. त्यामुळे पालिकेला तो रस्ता तर उखडावा लागलाच, शिवाय पूररेषेच्या आत बांधकाम झालेल्या सर्व वसाहतींनाही नोटीस बजवावी लागली. सुमारे २५ वसाहतींमधील ४५० कुटुंबांच्या घरांवर त्यामुळे टांगती तलवार निर्माण झाली आहे. या कुटुंबांच्या मते, आमची जागा पूररेषेच्या बाहेर आहे, अशा पाटबंधारे खात्याने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रानंतरच इमारतींचे बांधकाम झाले आहे. पाटबंधारे खात्याला मात्र ते अमान्य आहे. याच संदर्भात आयुक्त कुणाल कुमार यांच्या पुढाकाराने त्यांच्या कार्यालयात पाटबंधारे खात्याचे वरिष्ठ अभियंते, या वसाहतींनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या एकता नगर रहिवासी संघटनेचे पदाधिकारी व महापालिकेचे काही अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली.पूररेषा पाटबंधारे खात्याच्या नकाशात असली, तरी पालिकेच्या विकास आराखडा नकाशावर नसल्याचे या वेळी निदर्शनास आले. मागणी झाली की, त्या त्या परिसराची पूररेषा निश्चित केली जाते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे माजी महापौर धनकवडे यांनी सांगितले. असे न करता संपूर्ण शहराची पूररेषा एकदाच निश्चित करावी व नकाशाबरोबरच प्रत्यक्ष जागेवर जाऊन संपूर्ण नदीपात्रातही या पूररेषेचे मार्किंग करावे, असे त्यांनी सुचवले. आयुक्त कुणाल कुमार यांनी ही सूचना मान्य केली. (प्रतिनिधी)संपूर्ण शहरातील पूररेषेचे असे मार्किंग प्रत्यक्ष नदीपात्रात झाले, तर त्यातून कोणती बांधकामे धोक्याच्या रेषेच्या आत आहेत, ते स्पष्ट होणार आहे. त्यातून त्यांचाही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. येत्या तीन महिन्यांत हे काम पूर्ण करायचा निर्णयही बैठकीत झाला.