शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

‘त्या’ बांधकामांना अच्छे दिन कधी?

By admin | Updated: October 26, 2015 01:48 IST

सत्ता मिळाल्यास अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन देऊन विधानसभा निवडणूक जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे राज्यात सरकार येऊन वर्ष झाले आहे

विश्वास मोरे, पिंपरी सत्ता मिळाल्यास अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन देऊन विधानसभा निवडणूक जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे राज्यात सरकार येऊन वर्ष झाले आहे. मात्र, अजूनही प्रश्न सुटलेला नाही. या प्रश्नी गेल्या दहा वर्षांपासून शहरवासीयांच्या पदरी केवळ आश्वासनेच पडली आहेत. अनधिकृत बांधकामे सुटण्यास मुहूर्त कधी मिळणार? अनधिकृत बांधकामधारकांसाठी ‘अच्छे दिन कधी येणार’ असा प्रश्न सुजाण नागरिकांकडून केला जात आहे. सर्वाधिक वेगाने विकसित झालेले पिंपरी-चिंचवड हे राज्यातील एकमेव शहर आहे. वेगाने विकसित होत असताना बांधकाम नियमावली सुटसुटीत नसल्याने शहरात अनधिकृत बांधकामाचा प्रश्न वाढला आहे. महापालिका, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, एमआयडीसी, म्हाडा, नदीपात्र, रेडझोन असे अनधिकृत बांधकामांचे विविध प्रकार आहे. सुमारे पाच लाख मिळकतींपैकी ८० टक्के मिळकती अनधिकृत आहेत. हा प्रश्न गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असल्याने केवळ आश्वासनांची बोळवण करून सत्ताधाऱ्यांनी पदरात मते पाडून घेतली. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार गेल्यानंतर भाजपा-शिवसेना आघाडीचे सरकार आल्यानंतर हा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती धुळीस मिळाली आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी सरकारला अनधिकृत बांधकामे प्रश्न मुद्द्यावर चिंचवडमधील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाठिंबा दिला होता. वारंवार पाठपुरावाही केला होता. ठोस निर्णय घेतला जात नसल्याने जगताप आणि भोसरीचे आमदार विलास लांडे यांनी आमदारकीचा राजीनामाही दिला होता. ‘अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतील त्यांच्याबरोबर राहू,’ अशी भूमिका जगतापांनी घेतली होती. लोकसभेची निवडणूक शेतकरी कामगार पक्ष आणि मनसेच्या सहकार्याने लढविली होती. त्यात अपयश आल्याने राष्ट्रवादीकडून उमेदवारीची खात्री असतानाही विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षाकडून लढविली होती. त्यात जगताप विजयी झाले. भाजपाचे सरकार येऊन वर्ष झाले, तरी प्रश्न न सुटल्याने भाजपा आमदार जगताप यांची कोंडी झाली आहे. याच मुद्द्यावर भोसरी आणि पिंपरी विधानसभेतील उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. निवडणुकीनंतर भाजपाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार महेश लांडगे यांचीही कोंडी झाली आहे. अशीच अवस्था शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांची आहे.1काँग्रेस, राष्ट्रवादीचे आघाडी सरकार राज्यात सत्तेत असताना अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा निर्णय होत नसल्याने शिवसेना-भाजपाने आंदोलने केली होती. विरोधी पक्षातील शिवसेना सत्तेत आल्यानंतरही अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी शिवसेनेने जनतेबरोबर राहण्याची भूमिका घेतली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी मेळावा घेऊन सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याची भूमिका मांडली आहे.

2आघाडी सरकारची सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अनधिकृत बांधकामप्रश्नी आग्रही राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, वर्षभरात राष्ट्रवादीने ठोस असे कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. दुसरीकडे काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढून निषेध नोंदविण्यापलीकडे काहीही केलेले नाही. निवडणुकीतील अजेंड्यावर असणाऱ्या अनधिकृत बांधकाम प्रश्नावर अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. कोणत्याही पक्षाला याचे गांभीर्य नाही ही दुर्दैवाची बाब आहे.