देहूगाव: संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या आगमनापूर्वी मुख्य प्रवेशद्वारातून सोडण्यात येणाऱ्या दिंड्या पोलिसांनी अडवल्या होत्या. मानाचे अश्वही पोलीस यंत्रणेने अडवलेले वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूगाव येथे मोठ्या प्रमाणावर वारकऱ्यांची गर्दी झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोहळ्याला उपस्थित राहणार असलेले दुपारी एक वाजल्यापासूनच मंदिर आवारातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी तपासणी नाके उभारले आहे. दुपारी अडीचच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा येणार असल्याने मुख्य प्रवेशद्वारातून दिंड्यांना जाणे थांबवले होते. सोहळ्यातील मानाचे अश्व आणि माई दिंडी प्रवेशद्वारावर आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले नाही. पोलीस आणि वारकरी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. सुमारे 15 ते 20 मिनिटं अश्वांना मंदिराच्या प्रवेशद्वारावरच थांबून ठेवले होते. त्यामुळे वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मंदिर दर्शनही थांबवले
पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी देहू देऊन मुख्य मंदिरात दर्शन घेत असतात त्यानुसार आज सकाळपासूनच या ठिकाणी दर्शनाला गर्दी झाली होती. मात्र अडीचच्या सुमारास पोलिसांनी मंदिरात येणाऱ्या दिंड्या आणि वारकरी यांना थांबवले होते. विश्वस्त आणि गावकऱ्यांनी मध्यस्थी केलेले पोलिसांनी अर्जदासांनी अश्वांना मंदिराच्या आवारात सोडले.