शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

मोबाईलचोरांचा सुळसुळाट

By admin | Updated: August 5, 2015 03:16 IST

तळेगावात रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईलचोरांनी उच्छाद मांडला आहे. चोरांना पकडून मोबाईलचा शोध लावण्यास

तळेगाव स्टेशन : तळेगावात रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईलचोरांनी उच्छाद मांडला आहे. चोरांना पकडून मोबाईलचा शोध लावण्यास पोलीसच हतबलता दाखवत असल्याने, नागरिकांनी हरवलेल्या, चोरी झालेल्या मोबाईलबाबत तक्रारी देणेही बंद केले आहे.आठवडे बाजार व रेल्वे स्टेशनसारख्या गर्दीच्या ठिकाणी महागडा मोबाईल घेऊन जाणे आता नागरिकांना चांगलेच महागात पडत आहे. कारण, गर्दीच्या ठिकाणी बाजार करण्यात व्यस्त असताना कधी तुमचा मोबाईल मारला जाईल, याची शाश्वती नाही. तळेगावच्या बाजारात तुम्ही प्रवेश केला की, लगेच मोबाईलचोरीचे विषय आपल्या कानी पडतील. परंतु, यात नवल वाटावे असे काहीच नवीन नाही. कारण, गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोबाईलचोरी ही नित्याचीच झाली आहे. एवढेच नव्हे, तर काही सुजाण विक्रेते आपणास याबाबतीत मोबाईल सांभाळून ठेवण्याचा इशाराही देतात. हे आता ग्राहकांच्या अंगवळणी पडले आहे.आपला मोबाईल जपून वापरा, या सूचनेव्यातिरिक्त पोलीस तक्रारदारास काहीच बोलत नाहीत. मोबाईल कंपनीच्या मदतीने आधुनिक यंत्रणेद्वारे काम करून आयएमइआय नंबर किंवा ट्रॅकरद्वारे चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध लावणे पोलिसांसाठी जिकिरीचे नक्कीच नाही. पण, तळेगावचे पोलीस या संदर्भात हलायला तयार नाहीत. त्यामुळेच आता मोबाईलचोरांचे मनोबल आणि मुजोरी वाढली असून, ते बिनधास्तपणे वावरत आहेत.काल, रविवारी आठवडे बाजारात फिरल्यावर पाच-सहा मोबाईल चोरीस गेल्याची माहिती मिळाली. पण, याबाबतीत तळेगाव पोलीस ठाण्यात चौकशी केली असता सोमवारी दुपारपर्यंत तरी एकही तक्रार आली नसल्याचे कळाले. चोरी केल्यावर मोबाईल हँडसेट त्वरित स्विच आॅफ करून चोर तेथून पोबारा करतात. त्यामुळे गर्दीत बिचारा पीडित बारीक तोंड करून नाइलाजाने घरी निघून जातो. पोलिसांनी काही तरुण समाजसेवक युवकांच्या मदतीने जर मोबाईल चोरी जाण्याच्या संवेदनशील ठिकाणी बाजारदिवशी साध्या वेशात ‘वॉच’ ठेवला, तर मोबाईलचोरीचे मोठे रॅकेट किंवा टोळी हाती येण्याची दाट शक्यता आहे. परंतु, सध्या तरी ती तसदी घ्यायला पोलीस तयार नसल्याने नागरिकांना मोबाईल चोरीला गेल्यावर गप्प बसण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. मोबाईलचोर हे सराईत व यंत्रणेलाही चकवा देणारे असल्याने सर्वच चोऱ्यांचा शोध लागणे कठीण आहे. पण, निदान चोरांचा व काहीअंशी चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध लागला, तरी नागरिकांचा पोलीस खात्यावरील विश्वास दृढ होण्यास मदत होईल, असे तळेगावकरांचे मत आहे. (वार्ताहर)