शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

मोबाईलचोरांचा सुळसुळाट

By admin | Updated: August 5, 2015 03:16 IST

तळेगावात रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईलचोरांनी उच्छाद मांडला आहे. चोरांना पकडून मोबाईलचा शोध लावण्यास

तळेगाव स्टेशन : तळेगावात रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईलचोरांनी उच्छाद मांडला आहे. चोरांना पकडून मोबाईलचा शोध लावण्यास पोलीसच हतबलता दाखवत असल्याने, नागरिकांनी हरवलेल्या, चोरी झालेल्या मोबाईलबाबत तक्रारी देणेही बंद केले आहे.आठवडे बाजार व रेल्वे स्टेशनसारख्या गर्दीच्या ठिकाणी महागडा मोबाईल घेऊन जाणे आता नागरिकांना चांगलेच महागात पडत आहे. कारण, गर्दीच्या ठिकाणी बाजार करण्यात व्यस्त असताना कधी तुमचा मोबाईल मारला जाईल, याची शाश्वती नाही. तळेगावच्या बाजारात तुम्ही प्रवेश केला की, लगेच मोबाईलचोरीचे विषय आपल्या कानी पडतील. परंतु, यात नवल वाटावे असे काहीच नवीन नाही. कारण, गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोबाईलचोरी ही नित्याचीच झाली आहे. एवढेच नव्हे, तर काही सुजाण विक्रेते आपणास याबाबतीत मोबाईल सांभाळून ठेवण्याचा इशाराही देतात. हे आता ग्राहकांच्या अंगवळणी पडले आहे.आपला मोबाईल जपून वापरा, या सूचनेव्यातिरिक्त पोलीस तक्रारदारास काहीच बोलत नाहीत. मोबाईल कंपनीच्या मदतीने आधुनिक यंत्रणेद्वारे काम करून आयएमइआय नंबर किंवा ट्रॅकरद्वारे चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध लावणे पोलिसांसाठी जिकिरीचे नक्कीच नाही. पण, तळेगावचे पोलीस या संदर्भात हलायला तयार नाहीत. त्यामुळेच आता मोबाईलचोरांचे मनोबल आणि मुजोरी वाढली असून, ते बिनधास्तपणे वावरत आहेत.काल, रविवारी आठवडे बाजारात फिरल्यावर पाच-सहा मोबाईल चोरीस गेल्याची माहिती मिळाली. पण, याबाबतीत तळेगाव पोलीस ठाण्यात चौकशी केली असता सोमवारी दुपारपर्यंत तरी एकही तक्रार आली नसल्याचे कळाले. चोरी केल्यावर मोबाईल हँडसेट त्वरित स्विच आॅफ करून चोर तेथून पोबारा करतात. त्यामुळे गर्दीत बिचारा पीडित बारीक तोंड करून नाइलाजाने घरी निघून जातो. पोलिसांनी काही तरुण समाजसेवक युवकांच्या मदतीने जर मोबाईल चोरी जाण्याच्या संवेदनशील ठिकाणी बाजारदिवशी साध्या वेशात ‘वॉच’ ठेवला, तर मोबाईलचोरीचे मोठे रॅकेट किंवा टोळी हाती येण्याची दाट शक्यता आहे. परंतु, सध्या तरी ती तसदी घ्यायला पोलीस तयार नसल्याने नागरिकांना मोबाईल चोरीला गेल्यावर गप्प बसण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. मोबाईलचोर हे सराईत व यंत्रणेलाही चकवा देणारे असल्याने सर्वच चोऱ्यांचा शोध लागणे कठीण आहे. पण, निदान चोरांचा व काहीअंशी चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध लागला, तरी नागरिकांचा पोलीस खात्यावरील विश्वास दृढ होण्यास मदत होईल, असे तळेगावकरांचे मत आहे. (वार्ताहर)